शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘ब्रेकअप’नंतर स्थानिक कार्यकर्त्यांना ‘अच्छे दिन’

By admin | Updated: September 27, 2014 23:08 IST

महायुती पाठोपाठ आघाडीचाही घटस्फोट झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. आतापर्यंतच्या दुहेरी लढती आता बहुरंगी लढतीमध्ये परिवर्तित झाल्यात. याचा फटका उमेदवारांना बसला आहे.

गजानन मोहोड - अमरावतीमहायुती पाठोपाठ आघाडीचाही घटस्फोट झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. आतापर्यंतच्या दुहेरी लढती आता बहुरंगी लढतीमध्ये परिवर्तित झाल्यात. याचा फटका उमेदवारांना बसला आहे. मात्र, यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांचे भाव वधारले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी पितृपक्ष संपल्यानंतर २५ सप्टेंबर म्हणजे घटस्थापनेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली. याच दिवशी सायंकाळी महायुती व आघाडी यांच्यामधील युती फिस्कटली. परिणामी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना यांचे स्वतंत्र उमेदवार सध्या निवडणूक रिंगणात आहेत. धक्कादायक घडामोडीनंतर जिल्ह्याचे समीकरण रातोरात बदलले. इच्छुक उमेदवारांच्या पक्षनिष्ठा बदलल्या, नेत्यांनी पक्षबदल केल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांची गोची झाली. उमेदवारांनाही नवीन घरठाव केलेल्या पक्षातील नाराज कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. या नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करताना उमेदवारांच्या नाकीनऊ येत आहे. ज्यांच्या समवेत खांद्याला खांदा लावून दोन दशक काम केले त्यांच्या विरोधात प्रचार करण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे. तूर्तास काही पदाधिकाऱ्यांनी घरी बसणे पसंत केले आहे. या प्रतिकूल परिस्थितीत अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शनासाठी हजारो कार्यकर्त्यांचा फौजफाटा जमा करण्याची कसरत उमेदवारांना करावी लागत आहे. यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांचे भाव मात्र वधारले आहेत. राजकारणातल्या या धक्कादायक तंत्रानंतर कार्यकर्त्यांची चंगळ सुरू झाली आहे. एरवी कार्यकर्त्यांची, सहकाऱ्यांची आठवण न करणाऱ्या राजकीय मंडळींना आता सर्वांचा आधार घ्यावा लागत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, मनसे, रिपाइंसह सर्वच पक्षांना या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.