शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
5
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
6
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
7
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
8
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
9
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
10
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
11
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
12
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
13
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
14
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
15
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
16
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
17
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
18
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
19
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
20
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!

२० दिवसांनंतर बाजार समितीचे कामकाज सुरू

By admin | Updated: July 27, 2016 00:12 IST

शासनाने शेतकऱ्यांकडून अडत न घेता ते खरेदीदारांकडून वसूल करावे,....

अडते असोशिएशनचा पुढाकार : अध्यादेशानुसार खरेदीदारांकडून होणार अडत वसूलअमरावती : शासनाने शेतकऱ्यांकडून अडत न घेता ते खरेदीदारांकडून वसूल करावे, असा नवा नियम लागू केल्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज बंद होते. मात्र २० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी येथील बाजार समितीत कामकाज सुरू झाले. हर्रासीनंतर खरेदीदारांकडून अडत वसूल करून शासन अध्यादेशाचे पालन करण्यात आले.२० दिवसांपासून बंद असलेल्या बाजार समितीत खुली हर्रास करून शेतामालाची विक्री करण्यात आली. याला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे आता शेतकऱ्यांकडून अडत वसूल होणार नाही, ही बाब अडते असोशिएशनचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी स्पष्ट केले. शासन अध्यादेशाचे पालन करण्याचा निर्णय अडते असोशिएशनने घेतला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेल्या शेतमालाची विक्री करून व्यापाऱ्यांकडून अडत वसूल करण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे बाजार समितीत शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीस आणण्यास काहीही हरकत नाही, असे अडते असोशिएशनने स्पष्ट केले आहे. मंगळवारी शेतमालाची खुली हर्रास करण्यात आली. गहू १७००, तूर ८०५३ तर हरभरा ८ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकण्यात आला.खुल्या हर्रास प्रक्रियेला व्यापारी मतदार संघाने प्रतिनिधी सतीश अट्टल यांनीदेखील चांगला प्रतिसाद दिला. २० दिवसांपासून बंद असलेली बाजार समिती सुरू करण्यासाठी अडत असोशिएशनचे अध्यक्ष राजेश पाटील, धीरज बारबुद्धे, शाम साबळे, सजचन पसारी, दिनेश मुंधडा, सतीश अग्रवाल, मनोज चांडक, प्रवीण भुरे, कमल सारडा, सुरेश बजाज, संतोड परांजपे, राजकिशोर दायमा, दिनेश भारती आदींनी पुकाढार घेतला. (प्रतिनिधी)‘‘ बाजार समितीचे कामकाज सुरळीतपणे सुरू झाले आहे. आता शेतकऱ्यांपासून अडत वसूल होणार नाही, असा एकमुखाने निर्णय घेण्यात आला आहे. शासन अध्यादेशाचे पालन करून अडत ही व्यापाऱ्यांपासून वसूल केली जाईल.- राजेश पाटील,अध्यक्ष, अडते असोशिएशन