शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
5
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
6
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
7
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
8
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
9
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
10
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
11
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
12
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
13
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
14
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
15
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
16
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
18
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
19
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
20
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका

२० दिवसांनंतर बाजार समितीचे कामकाज सुरू

By admin | Updated: July 27, 2016 00:12 IST

शासनाने शेतकऱ्यांकडून अडत न घेता ते खरेदीदारांकडून वसूल करावे,....

अडते असोशिएशनचा पुढाकार : अध्यादेशानुसार खरेदीदारांकडून होणार अडत वसूलअमरावती : शासनाने शेतकऱ्यांकडून अडत न घेता ते खरेदीदारांकडून वसूल करावे, असा नवा नियम लागू केल्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज बंद होते. मात्र २० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी येथील बाजार समितीत कामकाज सुरू झाले. हर्रासीनंतर खरेदीदारांकडून अडत वसूल करून शासन अध्यादेशाचे पालन करण्यात आले.२० दिवसांपासून बंद असलेल्या बाजार समितीत खुली हर्रास करून शेतामालाची विक्री करण्यात आली. याला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे आता शेतकऱ्यांकडून अडत वसूल होणार नाही, ही बाब अडते असोशिएशनचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी स्पष्ट केले. शासन अध्यादेशाचे पालन करण्याचा निर्णय अडते असोशिएशनने घेतला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेल्या शेतमालाची विक्री करून व्यापाऱ्यांकडून अडत वसूल करण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे बाजार समितीत शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीस आणण्यास काहीही हरकत नाही, असे अडते असोशिएशनने स्पष्ट केले आहे. मंगळवारी शेतमालाची खुली हर्रास करण्यात आली. गहू १७००, तूर ८०५३ तर हरभरा ८ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकण्यात आला.खुल्या हर्रास प्रक्रियेला व्यापारी मतदार संघाने प्रतिनिधी सतीश अट्टल यांनीदेखील चांगला प्रतिसाद दिला. २० दिवसांपासून बंद असलेली बाजार समिती सुरू करण्यासाठी अडत असोशिएशनचे अध्यक्ष राजेश पाटील, धीरज बारबुद्धे, शाम साबळे, सजचन पसारी, दिनेश मुंधडा, सतीश अग्रवाल, मनोज चांडक, प्रवीण भुरे, कमल सारडा, सुरेश बजाज, संतोड परांजपे, राजकिशोर दायमा, दिनेश भारती आदींनी पुकाढार घेतला. (प्रतिनिधी)‘‘ बाजार समितीचे कामकाज सुरळीतपणे सुरू झाले आहे. आता शेतकऱ्यांपासून अडत वसूल होणार नाही, असा एकमुखाने निर्णय घेण्यात आला आहे. शासन अध्यादेशाचे पालन करून अडत ही व्यापाऱ्यांपासून वसूल केली जाईल.- राजेश पाटील,अध्यक्ष, अडते असोशिएशन