शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

१२ वर्षांनंतरही उपजिल्हा रुग्णालयाची समस्या कायम

By admin | Updated: June 21, 2016 00:15 IST

उपजिल्हा रुग्णालय स्थापन होऊन एक तपापेक्षा अधिक दिवस उलटल्यावरही रुग्णांच्या गैरसोईचा पाढा सुरूच आहे.

रुग्ण त्रासले : उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार अंदाधुंद

सुनील देशपांडे अचलपूरउपजिल्हा रुग्णालय स्थापन होऊन एक तपापेक्षा अधिक दिवस उलटल्यावरही रुग्णांच्या गैरसोईचा पाढा सुरूच आहे. या दवाखान्याचा अंदाधुंद कारभार पाहता याला कुणी वाली आहे की नाही, असा प्रश्न जनतेत निर्माण झाला आहे. अचलपूर तालुक्यातील जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी तत्कालीन पालकमंत्री वसुधाताई देशमुख यांच्या प्रयत्नाने जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने, महाराष्ट्र आरोग्य सेवा विकास प्रकल्प कार्यक्रम अंतर्गत २००३ मध्ये अचलपूर येथे उपजिल्हा रुग्णालय बांधण्यात आले. या दवाखान्याचे उद्घाटन १२ सप्टेंबर २००३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते व तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांचे अध्यक्षतेखाली झाले होते. प्रमुख उपस्थिती वसुधाताई व तत्कालीन नगराध्यक्ष हाजी मो.रफीक शेख गुलाब, प्रकल्प आयुक्त रमेशचंद्र कानडे, महासंचालक, आरोग्य संचालनालय डॉ.सुभाष यांची उपस्थिती होती. मागील तीन वर्षांपासून तर या रुग्णालयात अंदाधुंद कारभार सुरू असल्याने रुग्णांचे हाल होत आहे. वैद्यकीय अधीक्षक मो.जाकीर यांचे उपजिल्हा रुग्णालयाकडे दुर्लक्ष होत असल्याने अस्वच्छता, परिचारीकांचा व कर्मचाऱ्यांचा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक, दवाखान्यातील व परिसरातील असलेले घाणीचे साम्राज्य औषधांचा तुटवडा अशा प्राथमिक समस्याही सुटलेल्या नसून वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही मनमानी वाढली आहे. कार्यमुक्त केल्याने ड्युटीचा प्रश्नअगोदरच येथील दवाखान्यात परिचारिकांची कमतरता आहे. त्यात काही परिचारिकांची बाहेरगावी बदली झाली आहे. बदली झालेल्या परिचारिकांना अधिपरिचारिकांची व्यवस्थापन अधिकारी डॉ.मेराज अली व मेटू यांना अंधारात ठेवून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कार्यमुक्त केल्याने त्यांच्या ड्युटी कशा लावाव्यात, हा प्रश्न त्यांना निर्माण होतो अशी माहिती आहे.बगिच्याचा एका बाजूला ते टाके असून तेथे सांडपाणी व टाक्याचे पाणी आहे. त्यातील पाण्याची कायमची विल्हेवाट लागावी, यासाठी आरोग्य मंत्र्यांकडे निधीचा प्रस्ताव पाठवला आहे. तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागालाही पत्र दिले आहे. परिचारिकांना आरोग्य संचालकांच्या आदेशाने कार्यमुक्त केले आहे. मी वेळोवेळी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेत असतो. मनाने कोणताच निर्णय घेत नाही.- मो.जाकीर,वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय