शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

‘एनआरएचएम’ला सामावून घ्या

By admin | Updated: October 14, 2016 00:56 IST

राज्यातील आरोग्य विभागात शेकडो पदे रिक्त आहेत. याच जागांवर एनआरएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेणे सोईचे आहे.

संजय खोडके : धरणे आंदोलनाला भेट, समस्या जाणल्यातअमरावती : राज्यातील आरोग्य विभागात शेकडो पदे रिक्त आहेत. याच जागांवर एनआरएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेणे सोईचे आहे. त्याकरिता नवीन पदभरती किंवा मान्यतेची गरज नसल्याची स्पष्टोक्ती काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी गुरुवारी येथे दिली.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने येत्या वर्षात सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेसमोर कर्मचाऱ्यांनी एक दिवशीय धरणे आंदोलन पुकारले होते. या आंदोलन स्थळी भेट देताना संजय खोडके मार्गदर्शन करताना बोलत होते. खोडके यांनी केंद्र सरकारने सन २००५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान सुरू केले होते. शिक्षण आणि आरोग्य या दोन बाबी मूलभूत असल्याचे केंद्रस्थानी गृहित धरून हा उपक्रम राबविण्यात आला. मात्र आघाडी सरकार पायउतार होताच भाजप सरकारने हे दोन्ही उपक्रम गुंडाळण्याचा घाट रचल्याचा आरोप काँग्रेसचे संजय खोडके यांनी केला. राज्यात एनआरएचएमचे सुमारे १८ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. आरोग्य विभागात विविध पदे रिक्त असून त्या जागेवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेणे राज्य शासनाचे कर्तव्य आहे. पंरतु राज्य शासन आंदोलन कसे चिरडून टाकता येईल, याचे सूक्ष्म नियोजन करीत आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे विनाअनुदानित शिक्षकाच्या मोर्चात लाठीमार करून त्यांना सळो की पळो करून सोडले. यात काहींवर खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले. अन्यायाविरुद्ध लढा उभारू नये, अशी भूमिका शासनाची असून एनआरएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्यायसाठी प्रदीर्घ लढा द्यावा लागेल, असेही खोडके म्हणाले. यावेळी बंड्या साने, प्रशांत जोशी, रुपेश सरदार, प्रफुल्ल रिदोरे, अभिषेक जिरापुरे, किशोर माहुरे, सोनाली बारबुद्धे, शशीकांत तभाने, विनोद मकेश्वर, रतन छापानी, निलेश देवीकर, पंकज औरंगपुरे, महेंद्र अंबुलकर, पी.एस. झांबडे, राजू जांगजोड, दीपक सहारे, प्रसाद अनासाने उपस्थित होते.