शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
5
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
6
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
7
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
8
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
10
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
11
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
12
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
13
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
14
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
15
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
16
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
17
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
18
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
19
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
20
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी

‘एनआरएचएम’ला सामावून घ्या

By admin | Updated: October 14, 2016 00:56 IST

राज्यातील आरोग्य विभागात शेकडो पदे रिक्त आहेत. याच जागांवर एनआरएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेणे सोईचे आहे.

संजय खोडके : धरणे आंदोलनाला भेट, समस्या जाणल्यातअमरावती : राज्यातील आरोग्य विभागात शेकडो पदे रिक्त आहेत. याच जागांवर एनआरएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेणे सोईचे आहे. त्याकरिता नवीन पदभरती किंवा मान्यतेची गरज नसल्याची स्पष्टोक्ती काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी गुरुवारी येथे दिली.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने येत्या वर्षात सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेसमोर कर्मचाऱ्यांनी एक दिवशीय धरणे आंदोलन पुकारले होते. या आंदोलन स्थळी भेट देताना संजय खोडके मार्गदर्शन करताना बोलत होते. खोडके यांनी केंद्र सरकारने सन २००५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान सुरू केले होते. शिक्षण आणि आरोग्य या दोन बाबी मूलभूत असल्याचे केंद्रस्थानी गृहित धरून हा उपक्रम राबविण्यात आला. मात्र आघाडी सरकार पायउतार होताच भाजप सरकारने हे दोन्ही उपक्रम गुंडाळण्याचा घाट रचल्याचा आरोप काँग्रेसचे संजय खोडके यांनी केला. राज्यात एनआरएचएमचे सुमारे १८ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. आरोग्य विभागात विविध पदे रिक्त असून त्या जागेवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेणे राज्य शासनाचे कर्तव्य आहे. पंरतु राज्य शासन आंदोलन कसे चिरडून टाकता येईल, याचे सूक्ष्म नियोजन करीत आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे विनाअनुदानित शिक्षकाच्या मोर्चात लाठीमार करून त्यांना सळो की पळो करून सोडले. यात काहींवर खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले. अन्यायाविरुद्ध लढा उभारू नये, अशी भूमिका शासनाची असून एनआरएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्यायसाठी प्रदीर्घ लढा द्यावा लागेल, असेही खोडके म्हणाले. यावेळी बंड्या साने, प्रशांत जोशी, रुपेश सरदार, प्रफुल्ल रिदोरे, अभिषेक जिरापुरे, किशोर माहुरे, सोनाली बारबुद्धे, शशीकांत तभाने, विनोद मकेश्वर, रतन छापानी, निलेश देवीकर, पंकज औरंगपुरे, महेंद्र अंबुलकर, पी.एस. झांबडे, राजू जांगजोड, दीपक सहारे, प्रसाद अनासाने उपस्थित होते.