शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

कृषी अभ्यासक्रमाच्या ८५४ विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात; वाढीव जागांना मान्यता नाही

By गणेश वासनिक | Updated: October 12, 2022 21:45 IST

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचा नवा निर्णय

अमरावती: राज्यात खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित अशा ३८ कृषी महाविद्यालयांत ८५४ वाढीव जागांच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात आले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता मंगळवार, ११ ऑक्टोबरपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आरंभली जाणार होती. मात्र, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या नव्या निर्णयाने वाढीव जागांचे प्रवेश घेता येणार नाही, असे पत्र धडकले आहे.

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पाचव्या अधिष्ठाता समितीने कृषी व संलग्न महाविद्यालये सुरू करण्यासाठी सुचविलेल्या शिफारशी चारही कृषी विद्यापीठांना लागू करण्यास राज्य शासनाने मान्यता प्रदान केली. त्याअनुषंगाने उद्यानविद्या, जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय आणि व्यवस्थापन या चारही विद्याशाखांच्या सर्व ३८ महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढविण्यात आली. मात्र, या वाढीव प्रवेश क्षमतेनुसार कृषी महाविद्यालयांमध्ये पायाभूत सोयी-सुविधांवर पाचव्या अधिष्ठाता समितीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

परिणामी २२ सप्टेंबर २०२२ रोजी कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेत कृषी परिषदेच्या १०८ व्या बैठकीत विनाअनुदानित खासगी कृषी महाविद्यालयांची सन २०२१-२०२२ याकरिता वाढविण्यात आलेली प्रवेश क्षमता मान्यता रद्द करण्यात आली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सन २०२२-२०२३ पासून पूर्वीप्रमाणेच राहील, असे कृषी परिषदेचे संचालक उत्तम कदम यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.

प्रवेशासाठी २५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी मान्यता दिल्यानुसार राज्यात चारही कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी, उद्यानविद्या व कृषिसंलग्न विषयाच्या पदवी अभ्यासक्रमाकरिता केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार शासकीय, अनुदानित तसेच विनाअनुदानित महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना २५ सप्टेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले होते.

गुणवत्तेनुसार तीन फेऱ्यांत प्रवेश

कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या वाढीव जागांसाठी ११, १२ व २८ ऑक्टोबर रोजी असे तीन दिवस गुणवत्तेनुसार तीन फेऱ्यांत प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले होते. संस्था स्तरावर ६ नोव्हेंबरपासून या प्रवेशाला प्रारंभ होणार होता. मात्र, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचा नव्या निर्णयाने विद्यार्थ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती