शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

कृषी अभ्यासक्रमाच्या ८५४ विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात; वाढीव जागांना मान्यता नाही

By गणेश वासनिक | Updated: October 12, 2022 21:45 IST

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचा नवा निर्णय

अमरावती: राज्यात खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित अशा ३८ कृषी महाविद्यालयांत ८५४ वाढीव जागांच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात आले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता मंगळवार, ११ ऑक्टोबरपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आरंभली जाणार होती. मात्र, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या नव्या निर्णयाने वाढीव जागांचे प्रवेश घेता येणार नाही, असे पत्र धडकले आहे.

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पाचव्या अधिष्ठाता समितीने कृषी व संलग्न महाविद्यालये सुरू करण्यासाठी सुचविलेल्या शिफारशी चारही कृषी विद्यापीठांना लागू करण्यास राज्य शासनाने मान्यता प्रदान केली. त्याअनुषंगाने उद्यानविद्या, जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय आणि व्यवस्थापन या चारही विद्याशाखांच्या सर्व ३८ महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढविण्यात आली. मात्र, या वाढीव प्रवेश क्षमतेनुसार कृषी महाविद्यालयांमध्ये पायाभूत सोयी-सुविधांवर पाचव्या अधिष्ठाता समितीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

परिणामी २२ सप्टेंबर २०२२ रोजी कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेत कृषी परिषदेच्या १०८ व्या बैठकीत विनाअनुदानित खासगी कृषी महाविद्यालयांची सन २०२१-२०२२ याकरिता वाढविण्यात आलेली प्रवेश क्षमता मान्यता रद्द करण्यात आली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सन २०२२-२०२३ पासून पूर्वीप्रमाणेच राहील, असे कृषी परिषदेचे संचालक उत्तम कदम यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.

प्रवेशासाठी २५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी मान्यता दिल्यानुसार राज्यात चारही कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी, उद्यानविद्या व कृषिसंलग्न विषयाच्या पदवी अभ्यासक्रमाकरिता केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार शासकीय, अनुदानित तसेच विनाअनुदानित महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना २५ सप्टेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले होते.

गुणवत्तेनुसार तीन फेऱ्यांत प्रवेश

कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या वाढीव जागांसाठी ११, १२ व २८ ऑक्टोबर रोजी असे तीन दिवस गुणवत्तेनुसार तीन फेऱ्यांत प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले होते. संस्था स्तरावर ६ नोव्हेंबरपासून या प्रवेशाला प्रारंभ होणार होता. मात्र, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचा नव्या निर्णयाने विद्यार्थ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती