शहरं
Join us  
Trending Stories
1
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
2
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
3
कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत...
4
रुपया गडगडल्यामुळे देशात महागाई वाढणार? आयातदारांची चिंता वाढली, RBI आता काय करणार?
5
Silver Price Today: चांदीचा दर विक्रमी उच्चांकावर, किंमत १.९० लाख रुपयांच्या पुढे; आता गुंतवणूक करणं योग्य होईल का?
6
Nana Patole: निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप; आयुक्तांना पदावरून हटवण्याची पटोलेंची मागणी
7
याला म्हणतात नशीब! गरिबीशी लढणाऱ्या २ मित्रांचं आयुष्यच बदललं; सापडला ५० लाखांचा हिरा
8
धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार
9
टेस्लाला मोठा झटका, VinFast बनली EV मार्केटची 'महाराणी'! आता असा आहे इलॉन मस्क यांच्या फ्यूचर प्लॅन
10
मालवणीतील वादाप्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार अस्लम शेख यांच्यात शाब्दिक चकमक
11
VIDEO: लग्नमंडपात काकूंचीच हवाsss... नवरा-नवरी वरमाला घालत असताना हवेत ५ राऊंड्स गोळीबार
12
उगाच नाही पुतिन भारतात आले! रशिया-भारत शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्यांची मोठी बैठक; कामालाही झाली सुरुवात
13
Vastu Tips: घरात गोलाकार किंवा अंडाकृती आरसा आहे? मग 'हे' वास्तू नियम वाचा; धोका टाळा 
14
"चहा प्यायला चला..." चक्क मराठीत बोलणारा हा पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे तरी कोण?
15
२०० रुपये रोजंदारीने काम करणाऱ्या शेतमजुराला लागली दीड कोटींची लॉटरी, पण आता घर सोडावं लागलं
16
Kangana Ranaut : "त्या व्यक्तीत काहीच दम नाही..."; जर्मनी दौऱ्यावरून कंगना राणौतने राहुल गांधींना डिवचलं
17
Social Media Ban: आता १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी, जगातील ऐतिहासिक निर्णय!
18
कृतिका कामराने कन्फर्म केलं रिलेशनशिप, 'या' प्रसिद्ध क्रिकेट होस्टला डेट करतीये अभिनेत्री
19
लवकर श्रीमंत व्हायचंय? मग एसआयपी नाही तर 'स्टेप-अप SIP' करा; बघा ११ कोटींचा फंड कसा जमा होईल
20
सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...!  ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला
Daily Top 2Weekly Top 5

भूकंपानंतर प्रशासनाला जाग ! अमरावतीतील 'सिस्मोग्राफ' यंत्रणा सहा वर्षांपासून बंद; कशी होणार भूकंपाची नोंद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 15:22 IST

Amravati : नव्या उपकरणाची आवश्यकता नाही; जुने दुरुस्तीची शक्यता नाही

गजानन मोहोड लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भूगर्भातील हालचालीचे नोंद घेणारे ऊर्ध्व वर्धा प्रकल्पावरील 'सिस्मोग्राफ' (भूकंपमापक) उपकरण सन २०१९ पासून बंद आहे. या यंत्राच्या खरेदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी ऊर्ध्व वर्धा विभागाला पत्र देऊन पाठपुरावा करण्यात आला. शिवाय निधी उपलब्धतेची तयारीदेखील दाखविली आहे. तरीही सिंचन विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाने दुर्लक्षित केल्याचे वास्तव आहे.

धारणी तालुक्यातील शिवझिरीसह या लगतच्या सुसर्दा, राणीगाव, डाबला, नारदू परिसरात ४ जून २०२५ रोजी रात्री ९:५८ वाजता ३.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राने (एनसीएस) स्पष्ट केले. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील सिस्मोग्रॉफ उफकरणावर नोंद का नाही? याविषयीची चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे सहा वर्षांपासून बंद अवस्थेतील 'सिस्मोग्रॉफ' उफकरणाचा विषय ऐरणीवर आला.

यापूर्वी मेळघाटात अमझरी व टेटू केंद्रबिंदू असलेल्या गावांसह परिसरातील गावांमध्ये ३० सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १:३७ वाजता ४.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे सीईओ अनिल भटकर यांनी ऊर्ध्व वर्धा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना ४ ऑक्टोबर २०२४ रोजी पत्र देऊन सिस्मोग्रॉफ दुरुस्तीचे निर्देश दिले होते, हे येथे उल्लेखनीय.

समितीचा अजीब तर्कऊर्ध्व वर्धा विभागाद्वारा नव्याने सिस्मोग्राफ उपकरणाचा प्रस्ताव केंद्रीय रचना संस्था, (सीडीओ) नाशिक येथे पाठविला. हे उपकरण खरेदी करण्यासाठी एक समिती असते. यासाठी निधीदेखील भरणा केला. मात्र ऊर्ध्व वर्धा प्रकल्पावर नव्याने सिस्मोग्राफ बसविण्याची आवश्यकता नसल्याचे मत या समितीने व्यक्त केल्याची माहिती या विभागाने दिली.

काय आहे 'सिस्मोग्राफ' ?भूगर्भातील हालचालींमुळे निर्माण तरंगांच्या नोंदी घेणारे म्हणजेच भूकंप व तीव्रतेची नोंद घेणारे सिस्मोग्राफ हे यंत्र आहे. यामध्ये सिस्मोमीटर असते. त्याद्वारे भूगर्भातील हालचाली विद्युत संकेतांमध्ये रूपांतरित होतात व हे संकेत डिजिटल किंवा अॅनालॉग पद्धतीने नोंदवले जातात. भूकंपाची तीव्रता, केंद्रबिंदू शोधण्यासाठी याचा उपयोग होतो.

भूगर्भात हालचाली, 'जीएसआय'चा अहवाल

  • जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांमधील काही विशिष्ट भागांत भूगर्भात हालचाली होत असल्याने येथे सौम्य स्वरूपात भूकंपाचे धक्के जाणवतात, असे निरीक्षण भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) या केंद्र शासनाच्या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी नोंदविले आहे. 
  • दोन शास्त्रज्ञांच्या पथकाने ७ ते १० ऑक्टोबर २०२४ दरम्यान चिखलदरा तालुक्यातील अमझरी व टेटू या भूकंपग्रस्त भागांत मुक्काम करून काही यंत्रांद्वारे निरीक्षणे घेतली होती व याबाबतचा 'जीएसआय'द्वारा अहवाल तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभकटियार यांना दिला होता.

"कार्यकारी अभियंता, ऊर्ध्व वर्धा यांना प्रकल्पावरील सिस्मोग्राफ उपकरणाची दुरुस्ती करण्याचे पत्र यापूर्वी ४ ऑक्टोबर २०२४ रोजी दिलेले आहे. शिवाय आपत्ती व्यवस्थापनाच्या मान्सूनपूर्व बैठकीत या विभागाला निर्देश दिले आहे."- अनिल भटकर, आरडीसी तथा सीईओ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन

"कार्यकारी अभियंता, ऊर्ध्व वर्धा यांना प्रकल्पावरील सिस्मोग्राफ उपकरणाची दुरुस्ती करण्याचे पत्र यापूर्वी ४ ऑक्टोबर २०२४ रोजी दिलेले आहे. शिवाय आपत्ती व्यवस्थापनाच्या मान्सूनपूर्व बैठकीत या विभागाला निर्देश दिले आहे."- अनिल भटकर, आरडीसी तथा सीईओ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन

 

टॅग्स :AmravatiअमरावतीEarthquakeभूकंप