शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

भूकंपानंतर प्रशासनाला जाग ! अमरावतीतील 'सिस्मोग्राफ' यंत्रणा सहा वर्षांपासून बंद; कशी होणार भूकंपाची नोंद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 15:22 IST

Amravati : नव्या उपकरणाची आवश्यकता नाही; जुने दुरुस्तीची शक्यता नाही

गजानन मोहोड लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भूगर्भातील हालचालीचे नोंद घेणारे ऊर्ध्व वर्धा प्रकल्पावरील 'सिस्मोग्राफ' (भूकंपमापक) उपकरण सन २०१९ पासून बंद आहे. या यंत्राच्या खरेदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी ऊर्ध्व वर्धा विभागाला पत्र देऊन पाठपुरावा करण्यात आला. शिवाय निधी उपलब्धतेची तयारीदेखील दाखविली आहे. तरीही सिंचन विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाने दुर्लक्षित केल्याचे वास्तव आहे.

धारणी तालुक्यातील शिवझिरीसह या लगतच्या सुसर्दा, राणीगाव, डाबला, नारदू परिसरात ४ जून २०२५ रोजी रात्री ९:५८ वाजता ३.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राने (एनसीएस) स्पष्ट केले. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील सिस्मोग्रॉफ उफकरणावर नोंद का नाही? याविषयीची चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे सहा वर्षांपासून बंद अवस्थेतील 'सिस्मोग्रॉफ' उफकरणाचा विषय ऐरणीवर आला.

यापूर्वी मेळघाटात अमझरी व टेटू केंद्रबिंदू असलेल्या गावांसह परिसरातील गावांमध्ये ३० सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १:३७ वाजता ४.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे सीईओ अनिल भटकर यांनी ऊर्ध्व वर्धा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना ४ ऑक्टोबर २०२४ रोजी पत्र देऊन सिस्मोग्रॉफ दुरुस्तीचे निर्देश दिले होते, हे येथे उल्लेखनीय.

समितीचा अजीब तर्कऊर्ध्व वर्धा विभागाद्वारा नव्याने सिस्मोग्राफ उपकरणाचा प्रस्ताव केंद्रीय रचना संस्था, (सीडीओ) नाशिक येथे पाठविला. हे उपकरण खरेदी करण्यासाठी एक समिती असते. यासाठी निधीदेखील भरणा केला. मात्र ऊर्ध्व वर्धा प्रकल्पावर नव्याने सिस्मोग्राफ बसविण्याची आवश्यकता नसल्याचे मत या समितीने व्यक्त केल्याची माहिती या विभागाने दिली.

काय आहे 'सिस्मोग्राफ' ?भूगर्भातील हालचालींमुळे निर्माण तरंगांच्या नोंदी घेणारे म्हणजेच भूकंप व तीव्रतेची नोंद घेणारे सिस्मोग्राफ हे यंत्र आहे. यामध्ये सिस्मोमीटर असते. त्याद्वारे भूगर्भातील हालचाली विद्युत संकेतांमध्ये रूपांतरित होतात व हे संकेत डिजिटल किंवा अॅनालॉग पद्धतीने नोंदवले जातात. भूकंपाची तीव्रता, केंद्रबिंदू शोधण्यासाठी याचा उपयोग होतो.

भूगर्भात हालचाली, 'जीएसआय'चा अहवाल

  • जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांमधील काही विशिष्ट भागांत भूगर्भात हालचाली होत असल्याने येथे सौम्य स्वरूपात भूकंपाचे धक्के जाणवतात, असे निरीक्षण भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) या केंद्र शासनाच्या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी नोंदविले आहे. 
  • दोन शास्त्रज्ञांच्या पथकाने ७ ते १० ऑक्टोबर २०२४ दरम्यान चिखलदरा तालुक्यातील अमझरी व टेटू या भूकंपग्रस्त भागांत मुक्काम करून काही यंत्रांद्वारे निरीक्षणे घेतली होती व याबाबतचा 'जीएसआय'द्वारा अहवाल तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभकटियार यांना दिला होता.

"कार्यकारी अभियंता, ऊर्ध्व वर्धा यांना प्रकल्पावरील सिस्मोग्राफ उपकरणाची दुरुस्ती करण्याचे पत्र यापूर्वी ४ ऑक्टोबर २०२४ रोजी दिलेले आहे. शिवाय आपत्ती व्यवस्थापनाच्या मान्सूनपूर्व बैठकीत या विभागाला निर्देश दिले आहे."- अनिल भटकर, आरडीसी तथा सीईओ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन

"कार्यकारी अभियंता, ऊर्ध्व वर्धा यांना प्रकल्पावरील सिस्मोग्राफ उपकरणाची दुरुस्ती करण्याचे पत्र यापूर्वी ४ ऑक्टोबर २०२४ रोजी दिलेले आहे. शिवाय आपत्ती व्यवस्थापनाच्या मान्सूनपूर्व बैठकीत या विभागाला निर्देश दिले आहे."- अनिल भटकर, आरडीसी तथा सीईओ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन

 

टॅग्स :AmravatiअमरावतीEarthquakeभूकंप