शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
3
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
4
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
5
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
6
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
7
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
8
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
9
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता
10
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
11
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
12
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
13
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
14
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
15
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
16
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
17
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
18
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
19
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
20
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली

प्रशासनाने आमचा अंत पाहू नये

By admin | Updated: December 16, 2014 22:43 IST

वडाळी येथील देशी दारु विक्रीच्या दुकानाबाबत नव्याने मतदान घेण्याला कडाडून विरोध दर्शवून सोमवारी महिला आंदोलकांनी राज्य उत्पादक शुल्क आणि जिल्हाधिकारी कार्यालय गाठून कैफियत मांडली.

संघर्ष दारू दुकान बंदीचा : मतदान झाल्यास मरणाला सामोरेअमरावती : वडाळी येथील देशी दारु विक्रीच्या दुकानाबाबत नव्याने मतदान घेण्याला कडाडून विरोध दर्शवून सोमवारी महिला आंदोलकांनी राज्य उत्पादक शुल्क आणि जिल्हाधिकारी कार्यालय गाठून कैफियत मांडली. देशी दारुचे दुकान सुरु करण्यासाठी पुन्हा मतदान घेतले तर आम्ही मरण पत्करु, जिल्हा प्रशासनाने आमचा अंत पाहू नये, अशी भूमिका महिलांनी मांडली आहे. वडाळीच्या देवीनगरातील महिलांनी देशी दारु दुकान बंद ठेवण्याबाबत प्रशासनाकडे साकडे घातले होते. मात्र देशी दारु विक्रे ता प्रभू झांबानी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेवून बंद असलेल्या दुकानाबाबत न्यायनिर्वाळा करण्याची विंनती केली आहे. महिलांमध्ये संतापन्यायालयाने जिल्हाप्रशासनाला या दुकानाबाबत योग्य निर्णय घेत अहवाल कळविण्याचे कळविले आहे. त्यानुसार बंद असलेल्या या देशी दारु विक्रीच्या दुकानासाठी पुन्हा मतदान घेण्याचे प्रतीज्ञापत्र महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांनी उच्च न्यायालयात सादर करुन २८ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया घेण्याचे ठरविले आहे. परंतु हे देशी दारु विक्रीचे दुकान कायमस्वरुपी हद्दपार हवे असून आता कोणतीही मतदान प्रक्रिया नको आहे. अशी भुमीका घेऊन महिलांनी रविवारी उत्पादन शुल्क कार्यालय परिसर दणाणुन टाकला होता. अखेर दोन तासाच्या रस्सीखेचानंतर आंदोलक महिलांना एक्साईज कार्यालयाच्या बाहेर काढण्यात पोलिसांना यश मिळाले. मतदान घेतल्यास आम्ही मरण पत्करु तसेच दोन दिवसात देशी दारु बंदचा निर्णय झाला नाही, तर तीसरा दिवस आमचा राहिल, आम्ही काय करु यांची कल्पना नाही, आमचा अंत प्रशासनाने पाहू नये. अशी परखड भुमीका महिलांनी लोकमशी बोलताना माडंली आहे.मागील काही महिन्यापासून वडाळी येथील देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला सरसावल्या आहेत. मात्र मध्यंतरी हे आंदोलन थंडावले होते परंतु आता नव्या जोमाने महिला शक्तीने एकत्र येऊन दारू दुकानाविरोधात तीव्र लढा सुरू केला आहे. दुकानाच्या विरोधात महिलांनी रस्त्यावर उतरून सोमवारी जिल्हा प्रशासन व उत्पादन शुल्क कार्यालय दणाणून सोडले होते. त्यामुळे वडाळी येथील देशी दारूच्या दुकानाचा तिढा सोडविण्याचे आवाहन प्रशासकीय यंत्रणेवर उभे ठाकले आहे. यावर आता प्रशासक काय तोडगा काढते याकडे लक्ष लागले आहे.