शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कडक लॉकडाउनच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:12 IST

फोटो पी २५ चांदूर रूटमार्च चांदूर बाजार : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यात जीवनावश्यक ...

फोटो पी २५ चांदूर रूटमार्च

चांदूर बाजार : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यात जीवनावश्यक वस्तूंचे दुकान उघडण्यासाठी सकाळी ७ ते ११ पर्यंत अशी ४ तासांची मुभा देण्यात आली आहे. असे असताना दुकानदार दुकाने बंद करण्यासाठी पोलीस वाहनाचे सायरन वाजवण्याची प्रतीक्षा करतात. त्यानंतरही बऱ्याच वेळाने दुकाने बंद करण्यात येत नसल्याने स्थानिक पोलिसांना अतिरिक्त बंदोबस्तासह रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.

चांदूर बाजारच्या बाजारपेठेचा अनुभव पोलिसांना नित्याचा झाला आहे. २ महिन्यांपासून तालुक्यासह जिल्ह्यात संचारबंदीचा नियम लागू केला आहे. मात्र, याची कोणतीच अंमलबजावणी होताना दिसत नव्हती. यात राजकीय पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप वाढल्यामुळे दुकानदार मनमर्जीने व्यवसाय करीत होते. अखेर शासनाने नुकतेच जाहीर केलेल्या संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी पोलीस, महसूल व पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. त्यानुसार तालुक्यात आता पालिकेचे पथकही संचारबंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी दुकानांविरुद्ध धडक कारवाई करताना दिसत आहे.

संचारबंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी चांदूर बाजार शहरात पोलीस प्रशासनाकडून रूटमार्च काढण्यात आला. यात महसूल व पालिका प्रशासनाने सुद्धा सहभाग नोंदविला. दरम्यान काही दुकाने उघडी दिसल्याने त्यांना तूर्तास ताकीद देण्यात आली. दरम्यान नियमभंग करणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. कडक लॉक डाऊन अंतर्गत राज्यात जिल्हा बंदी करण्यात आली आहे. आवश्यक सेवेतील प्रवाशांनाच प्रवासाची सूट देण्यात आली आहे.

बॉक्स १

अनावश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्या तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्या विरुद्ध कारवाईचे अधिकार पोलीस प्रशासनाला देण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर रविवारी पोलीस प्रशासने रूटमार्च काढला. दरम्यान रस्त्यावर उतरलेल्या पालिका, महसूल, पोलीस विभागातर्फ ११ वाजतानंतर ही दुकाने बंद न करणाऱ्यांना ताकीद देऊन याची पुनरावृत्ती झाल्यावर कारवाईचा इशारा दिला आहे. यावेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लावलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून शासन व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन ठाणेदार सुनील किनगे यांनी केले. यावेळी पोलीस पथकात सहायक ठाणेदार नरेंद्र पेदूर, गजानन रहाटे, कीर्ती गावंडे, अचलपूरचे पोलीस अधिकारी भटकर, महसूल पथकाचे नायब तहसीलदार देवेंद्र सवई, पालिका पथकाचे रवींद्र जाधव, भूषण भट्ट, दिनेश शर्मा, संतोष डोळे आदी उपस्थित उपस्थिती होते.

त्या अतिक्रमणावर कारवाई

या रूटमार्च दरम्यान मुख्य मार्गावर एका फळ विक्रेत्याने रस्त्यावरच कापडी पाल टाकून मोठी दुकान थाटलेली दिसली. त्यामुळे पालिकेने पोलिसांस्या मदतीने ते अतिक्रमण मोकळे केले. मात्र, हाकेच्या अंतरावर असलेल्या जयस्तंभ चौकात जयस्तंभाला घेरून काही टरबूज विक्रेत्यांनी अतिक्रमण थाटले आहे. सदर अतिक्रमण हटविण्यास मात्र पालिका प्रशासन दिरंगाई दाखवीत आहे. हे अतिक्रमण न हटविण्यास राजकीय दबाव आल्याची चर्चा शहरात जोर धरत आहे.