शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाने हटविला तळवेल येथील छत्रपतींचा पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:14 IST

फोटो - २५ एस चांदूर बाजार महसूल, पोलीस व पंचायत विभागाची सयुक्त कारवाई; ग्रामपंचायतची तक्रार चांदूर बाजार : शिवजयंतीच्या ...

फोटो - २५ एस चांदूर बाजार

महसूल, पोलीस व पंचायत विभागाची सयुक्त कारवाई; ग्रामपंचायतची तक्रार

चांदूर बाजार : शिवजयंतीच्या आदल्या रात्री १८ फेब्रुवारीला तालुक्यातील तळवेल येथे ग्रामपंचायतच्या जागेवर रस्त्यातच अज्ञातांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. याबाबत तळवेलच्या सरपंचांनी १९ फेब्रुवारीला पोलीस स्टेशन चांदूर बाजारला तक्रार दाखल केली होती. त्यानुसार महसूल, पोलीस व पंचायत समिती प्रशासनाने गावात २० फेब्रुवारीला मुनादी देऊन गावकऱ्यांना पुतळ्याची जबाबदारी घेण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. प्रशासनाच्या आवाहनाला २२ फेब्रुवारीपर्यंत गावकऱ्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने २३ फेब्रुवारीला सकाळी ७ पासून सदर अनधिकृत पुतळा हटविण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी आरसीपी तुकडीसह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

------------

सचिवांकडे सोपविला पुतळा

सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य गण व ग्रामस्थांसोबत १० तास चर्चा झाल्यानंतर शिवरायांचे पूजन करून पुतळा हटविण्यात आला. रीतसर परवानगी घेईपर्यंत तो ग्रामपंचायत सचिवांच्याकडे सोपविण्यात आला आहे. हा पुतळा तळलेले ग्रामपंचायतीमध्ये ठेवण्यात आला आहे. चर्चेत नायब तहसीलदार देवेंद्र सवई, गटविकास अधिकारी प्रफुल्ल भोरगडे, मंडल अधिकारी दाते, विस्तार अधिकारी सातंगे, ग्रामविकास अधिकारी मनीष देशमुख, तलाठी प्रतीक चव्हाण, रवींद्र बोंडे, ठाणेदार सुनील किनगे, सहायक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे, पेंदोर, खुपीया प्रशांत भटकर, वीरेंद्र अमृतकर आदी सहभागी झाले.

-------------

मध्यरात्री उभारला पुतळा

शासनाच्या नियमाप्रमाणे सार्वजनिक जागेवर थोर पुरुषांच्या पुतळा उभारणीसाठी रीतसर परवानगी घ्यावी लागते तसेच ज्या ठिकाणी पुतळा उभारण्यात येणार आहे, त्या जागामालकाचे ना-हरकत प्रमाणपत्रही आवश्यक असते. परंतु, तळवेल येथे मध्यरात्रीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगीसाठी आवश्यक शासकीय सोपस्कार न करताच उभारण्यात आला.

-------------

सरपंचांनी दाखल केली तक्रार

तळवेल येथील आठवडी बाजारात जिल्हा परिषद शाळेसमोर विटा-सिमेंटचा तीन फूट उंच चौथरा बांधून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पीओपीचा अर्धकृती पुतळा लावण्यात आला. पुतळ्यावरून तणाव होऊ नये, यासाठी सरपंच केमदेव कुराडे यांनी पोलिसांत रीतसर लेखी तक्रार दाखल केली. प्रशासनाने दिलेल्या मुदतीत या पुतळ्याची जबाबदारी कुणीही स्वीकारली नाही.

--------------