शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

महिनाभराच्या आंदोलनानंतर परतले आदिवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:29 IST

मेळघाटच्या जंगलात विविध मागण्यांसाठी महिनाभरापासून ठाण मांडून बसलेले आदिवासी प्रजासत्ताकदिनी पुनर्वसित गावी परतले.

ठळक मुद्देबच्चू कडूंची मध्यस्थी : शेती, नोकरी, मूलभूत सुविधांचे लेखी आश्वासन, पुनर्वसित

गावांकडे रवानाआॅनलाईन लोकमतपरतवाडा : मेळघाटच्या जंगलात विविध मागण्यांसाठी महिनाभरापासून ठाण मांडून बसलेले आदिवासी प्रजासत्ताकदिनी पुनर्वसित गावी परतले. आ. बच्चू कडू यांच्या मध्यस्थीने शेती, नोकरी, मूलभूत सुविधांचे लेखी आश्वासन मिळवून घेतल्यानंतर सर्व आंदोलक २५ बसगाड्यांनी आपापल्या गावी रवाना झालेत.मेळघाटच्या केलपाणी, गुल्लरघाट, नागरतास आदी पुनर्वसित गावांतील आदिवासींनी आपल्या काही मागण्यांसाठी २५ डिसेंबरपासून जंगलात ठिय्या दिला. त्यांच्या मागण्यांना सुरुवातीपासूनच आ. बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला होता. आदिवासी कुटुंबांना शेती देण्यासाठी अकोट तालुक्यात २८० हेक्टर जमीन आंदोलकांच्या प्रतिनिधींनी पसंत करून गेल्या आठवड्यातच तेथील तहसीलदारांना आपला होकार कळविला. वनविभागात आदिवासी व पुनर्वसितांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देण्याची दुसरी महत्त्वाची मागणीदेखील शासनाने मान्य केली आहे. अकोटचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी लवकरच नोकरीत सामावून घेणार असल्याचे सांगितले. इतर बाबी राहिल्या असल्यास त्या त्वरित निकाली काढल्या जातील, असे आश्वासन आ. बच्चू कडू व वनसंरक्षक गुरुप्रसाद यांनी आंदोलकांना दिले. जवळपास सर्व मागण्या पूर्ण झाल्याने आंदोलन मागे घेण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलकांनी आंदोलन विनाशर्त मागे घेतल्याचे जाहीर केले.वनविभागाने बोलावलेल्या बसमधून पुनर्वसित आंदोलकांना गावी सोडण्यात आले. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर, विशाल भगत, घनश्याम कडू, शंभू मालठाणे, बाळासाहेब आवारे आदी उपस्थित होते.पेसा कायद्याचा लाभचिखलदरा तालुक्यातील गुल्लरघाट, नागरतास, बारुखेडा, अमोना, सोमठाणा, केलपानीसह आठ गावांतील पुनर्वसित आदिवासींना मेळघाटात दिल्या जाणाºया पेसा कायद्याचा लाभ देण्याची अट प्रशासनाने मान्य केल्याचे आ. बच्चू कडू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.२६ जानेवारी रोजी आदिवासींना जिल्हाधिकाºयांचे पत्र दिले.. आश्वासनांची प्रशासनाला वेळोवेळी आठवण देऊ.- आ. बच्चू कडू, अचलपूर