शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी, गरिबांच्या जुन्या नोटा बदलवून द्या

By admin | Updated: February 21, 2017 00:11 IST

केंद्र सरकारने नोव्हेंबरमध्ये पाचशे, हजाराच्या नोटाबंदीचा आदेश काढून ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत राष्ट्रीयीकृत बँकेत जमा करण्याचे आदेश दिले होते.

नेपाळ, भूतानला सवलत : शासनाने त्वरित द्यावा नवा आदेश वरूड: केंद्र सरकारने नोव्हेंबरमध्ये पाचशे, हजाराच्या नोटाबंदीचा आदेश काढून ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत राष्ट्रीयीकृत बँकेत जमा करण्याचे आदेश दिले होते. यांनतर रिझर्व्ह बँकेत ३१ मार्चपर्यंत बदलविता येतील, असेही सरकारने सांगितले होते. परंतु देशातील नागरिकांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने घेणे बंद केल्याने एक एक पैसा जमवून आयुष्याची पुंजी जमविणाऱ्यांना रिझर्व्ह बँकेत स्वीकारत नसल्याने कचऱ्यात फेकण्याची वेळ आल्याने हजारोंचा फटका गोरगरिबांना सहन करण्याची वेळ आली आहे. सरकारने भूतान, नेपाळला नोटा बदलविण्याची संधी दिल्याने देशातील नागरिकांच्या रिझर्व्ह बँकेने विनाअट नोटा बदली करून देण्याचे आदेश द्यावे तसेच तालुकास्तरावर काउंटर उघडून ३१ मार्चपर्यंत मुदत देण्याची मागणी नागरिकांतनू केली जात आहे. केंद्र सरकारने हजार पाचशे नोटांचे बाजारीकरण होऊन नकली नोटांचा सुळसुळाट तसेच आतंकवादी, अतिरेकी चळवळी बोकाळल्याने नोटा बंदीचा आदेश जारी केला. पण नियोजन चुकल्याचे दिसते. ३१ डिसेंबरनंतर रिझर्व्ह बँकेत बदलवून मिळणार, अशी घोषणा केली होती. परंतु जानेवारीपासून केवळ विदेशातून आलेल्या व्यक्तींच्या नोटा बदविल्या जात आहेत. अनेकांनी नागपूरच्या रिझर्व्ह बँकेत नोटा बदलवून घेण्याकरिता गेले असता एकापेक्षा अधिक प्रश्नांची सरबत्ती केल्याने आल्यापावलीच परतावे लागले. वास्तविक सरकारने नोटाबंदीचा आदेश काढल्यांनतर स्थानिक राष्ट्रियीकृत बँकेत ३१ डिसेबर, तर यानंतर शिल्लक राहिलेल्या उर्वरित नोटा ३१ मार्चपर्यंत रिझर्व्ह बँकेत बदलवून मिळेल, अशी घोषणा झाली होती. अनिवासी भारतीयांच्या नोटा ३० जूनपर्यंत स्वीकारण्याची घोषणा केली होती. परंतु रिझर्व्ह बँकेत केवळ परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या नोटा स्वीकारत असल्याने देशातील गोरगरिबांची चेष्टा केली जात आहे. कालच्या पाचशे, हजार रुपयांचे मूल्य असणाऱ्या नोटाचा कचरा कधी झाला हे कळलेच नाही. परंतु ग्रामीण भागातील म्हाताऱ्या, अशिक्षित, शेतमजूर, शेतकऱ्यांना याचा जबर फटका बसला आहे. कुणी मुलींच्या लग्नाकरीता तर कुणी शेवटची शिदोरी म्हणून पुूजी जमविली होती. कुणी मृत्यूशय्येवर असल्याने बदलवून घेणे शक्य झाले नाही. अशा लोकांना हजारो रुपयांचा फटका बसला असून आता या गोरगरिबांची जबाबदारी घेणार तरी कोण? सरकार की, बँका हा प्रश्न निर्माण झाला आहे. जनतेकरिता सरकारसोबत भांडणारे लोकप्रतिनिधी आता गेले तरी कुठे हा प्रश्न असून केवळ मतापूरतेच राजकारण करून आपली खुर्ची सुरक्षित ठेवण्यातच मशगूल आहे, अशी चर्चा ग्रामीण भागात सुरू झाली. (तालुका प्रतिनिधी)आधी देशवासीयांची काळजी घ्या ३१ डिसेंबरनंतर रिझर्व्ह बँकेने नोटा स्वीकारणे बंद केले आहे. केवळ परदेशातून आलेल्या नागरिकांच्याच जुन्या नोटा स्वीकारल्या जात आहेत. परंतु सरकारला देशातील नागरिकांपेक्षा परदेशातील नागरिकांचा कळवळा अधिक दिसून येतो, तर नुकतेच आता भूतान आणि नेपाळच्या नागरिकांजवळच्या हजार, पाचशेच्या भारतीय चलनातील नोटा बदलवून देण्याचे आदेश जारी झाले. परंतु देशातील गोरगरिबांचे काय, हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी आधी देशवासीयांची काळजी घ्यावी, मग परकीयांची, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.