शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थी साधणार जगाशी संवाद, इंग्रजी भाषा संभाषणासाठी नवा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 18:26 IST

आदिवासी मुला-मुलींना जगाशी संवाद साधता यावा, यासाठी राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा संभाषणासाठी नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

गणेश वासनिकअमरावती : आदिवासी मुला-मुलींना जगाशी संवाद साधता यावा, यासाठी राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा संभाषणासाठी नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नव्या शिक्षण प्रणालीतून विज्ञाननिष्ठ विचारसरणीकडे आदिवासी विद्यार्थ्यांचा कल असेल, असा विश्वास आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.राज्याचा आदिवासी विकास विभाग म्हटला की, अपहार, भ्रष्टाचार, अनियमितता असाच कारभार सुरू असल्याचे चित्र आपसूकच नजरेसमोर येते. परंतु मनीषा वर्मा यांनी काही महिन्यांपूर्वी या विभागाची सूत्रे हाती घेताच गडबड अधिका-यांमध्ये आता काही खरे नाही? असे म्हणण्याचा प्रसंग ओढवला आहे. वर्मा यांनी आदिवासींच्या विकासासाठी योजना, उपक्रम सकारात्मकरीत्या राबविणार असल्याचे स्पष्ट केले. म्हणूनच द-या-खो-यात वास्तव्यास असलेल्या आदिवासींची मुले ही अन्य समूहाच्या तुलनेत शिक्षणात मागे राहू नये, त्यांच्यात आत्मविश्वास अन् आत्मसन्मान वाढावा, यासाठी अस्सल इंग्रजी भाषा संभाषणाचा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थी त्याचे लाभार्थी ठरणार आहेत. इंग्रजीतून संवाद, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, करियर गायडन्स, कौशल्य विकासाचे धडे, मार्केटिंग कौशल्य, आदिवासी महिलांना रोजगारासह कर्जपुरवठा, वनहक्क कायद्यांतर्गत जमिनींवर उत्पादन क्षमता वाढविणे, आश्रमशाळांमध्ये पायाभूत सुविधा, बालहक्क कायद्याची अंमलबजावणी, शाळा समितीला निधी खर्च करण्याची मुभा आदी विविध उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आहे. विशेषत: शिक्षक, कर्मचा-यांना प्रोत्साहन मिळावे, विद्यार्थी सुविधांपासून वंचित राहू नये, यासाठी आश्रमशाळांची आयएसओ मानांकन स्पर्धादेखील घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.तीन वर्षांत ४०० आश्रमशाळांमध्ये सायन्स मॉड्युल्सआदिवासी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानदृष्टी वाढावी आणि ज्ञानात भर पडावी, यासाठी राज्यात तीन वर्षांत ४०० आश्रमशाळांमध्ये सायन्स मॉड्युल्स हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. एकलव्य फाऊंडेशन व अन्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मॉड्युल्सप्रमाणे १० ते १५ शाळांची निवड केली जाईल. या उपक्रमाचे मेळघाटातील शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. शिक्षकांनी साकारलेले सायन्स मॉड्युल्स स्वत: आदिवासी विद्यार्थी किटस् हाताळतील. ते विज्ञानाचे धडे घेतील, असा प्रयोग पहिल्यांदाच ट्रायबलमध्ये सुरू झाल्याचे मनीषा वर्मा म्हणाल्या. ट्रायबलमध्ये रूटीन योजना सुरूच आहे. परंतु आदिवासींचा आर्थिकस्तर उंचवावा आणि रोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत तसेच महिला बचत गटाला कर्जपुरवठा आणि व्यवसायास संधी आदी नवीन उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.- मनीषा वर्माप्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र

टॅग्स :Amravatiअमरावती