शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

जलजीवनचे ८४० ग्रामपंचायतीत तयार होणार कृती आराखडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:12 IST

अमरावती : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत कार्यान्वित नळजोडणीव्दारे पाणीपुरवठ्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत २३ जुलै ते ७ ऑगस्टपर्यंत गावकृती आराखडा ...

अमरावती : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत कार्यान्वित नळजोडणीव्दारे पाणीपुरवठ्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत २३ जुलै ते ७ ऑगस्टपर्यंत गावकृती आराखडा पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. यात ८४० ग्रामपंचायतींमध्ये गावपातळीवर नळजोडणीचा गावकृती आराखडा तयार केला जाणार आहे. २३ जुलै रोजी जलजीवन मिशन राज्य पाणी व स्वच्छता विभागाच्यावतीने ग्रामीण पाणीपुरवठाच्या कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, डाटा एंट्री ऑपरेटर तसेच सनियंत्रण मूल्यमापन सल्लागार यांना झूम ॲपव्दारे गावकृती आराखडाबाबत प्रशिक्षण दिले आहे. यात माहिती संकलन, राबविण्याच्या प्रक्रिया, कोबो टूलव्दारे माहिती अपलोड करणेबाबत धडे दिले आहेत. यानंतर २६ व २७ जुलै या कालावधीत डेप्युटी सीईओ पाणी व स्वच्छता, डेप्युटी सीईओ पंचायत, उपअभियंता, शाखा अभियंता, भूवैज्ञानिक, मनुष्यबळ विकास सल्लागार, सनियंत्रण व मूल्यमापन सल्लागार, पाणी गुणवत्ता सल्लागार व तालुकास्तरावरील बीडीओ, विस्तार अधिकारी पंचायत, उपअभियंता, शाखा अभियंता, गट समन्वयक, समूह समन्वयक यांना झूम ॲपद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

तालुकास्तरावर बीडीओ २८ ते ३१ जुलै दरम्यान प्रशिक्षण घेणार आहेत. यात गाव कृती आराखडाबाबत सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंप ऑपरेटर, आशा वर्कर, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीची दोन प्रतिनिधी ना झूम ॲपवर प्रशिक्षण देणार आहेत. गाव पातळीवर १ ते ३ ऑगस्ट या कालावधीत गावकृती आराखडाच्या अनुषंगाने लागणारी माहिती संकलित केली जाणार आहे. यात जिल्हा कक्षातील तज्ज्ञ सल्लागार तालुकास्तरावर बीडीओ, विस्तार अधिकारी पंचायत उपअभियंता, शाखा अभियंता गावपातळीवर ग्रामसेवक, जलसुरक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन सीईओ अविश्यांत पंडा, डेप्युटी सीईओ श्रीराम कुलकर्णी, दिलीप मानकर यांनी केले आहे.

बॉक्स

बॉक्स

मान्यतेसाठी ग्रामसभेत ठेवणार

स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ग्रामसमृद्धी आभियानात आलेले गाव कृती आराखडे मान्यतेसाठी ठेवले जाणार आहेत. त्यामुळे यासंदर्भातील कामांना प्राधान्य असावे, या सोबतच मधल्या काळात या कृती आराखड्याची पडताळणी केली जाईल. त्यामुळे या अभियानात गाव स्तरावरून मोठा सहभाग असणे आवश्यक असल्याचे सीईओ पंडा यांनी स्पष्ट केले.