शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

जलजीवनचे ८४० ग्रामपंचायतीत तयार होणार कृती आराखडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:12 IST

अमरावती : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत कार्यान्वित नळजोडणीव्दारे पाणीपुरवठ्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत २३ जुलै ते ७ ऑगस्टपर्यंत गावकृती आराखडा ...

अमरावती : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत कार्यान्वित नळजोडणीव्दारे पाणीपुरवठ्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत २३ जुलै ते ७ ऑगस्टपर्यंत गावकृती आराखडा पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. यात ८४० ग्रामपंचायतींमध्ये गावपातळीवर नळजोडणीचा गावकृती आराखडा तयार केला जाणार आहे. २३ जुलै रोजी जलजीवन मिशन राज्य पाणी व स्वच्छता विभागाच्यावतीने ग्रामीण पाणीपुरवठाच्या कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, डाटा एंट्री ऑपरेटर तसेच सनियंत्रण मूल्यमापन सल्लागार यांना झूम ॲपव्दारे गावकृती आराखडाबाबत प्रशिक्षण दिले आहे. यात माहिती संकलन, राबविण्याच्या प्रक्रिया, कोबो टूलव्दारे माहिती अपलोड करणेबाबत धडे दिले आहेत. यानंतर २६ व २७ जुलै या कालावधीत डेप्युटी सीईओ पाणी व स्वच्छता, डेप्युटी सीईओ पंचायत, उपअभियंता, शाखा अभियंता, भूवैज्ञानिक, मनुष्यबळ विकास सल्लागार, सनियंत्रण व मूल्यमापन सल्लागार, पाणी गुणवत्ता सल्लागार व तालुकास्तरावरील बीडीओ, विस्तार अधिकारी पंचायत, उपअभियंता, शाखा अभियंता, गट समन्वयक, समूह समन्वयक यांना झूम ॲपद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

तालुकास्तरावर बीडीओ २८ ते ३१ जुलै दरम्यान प्रशिक्षण घेणार आहेत. यात गाव कृती आराखडाबाबत सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंप ऑपरेटर, आशा वर्कर, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीची दोन प्रतिनिधी ना झूम ॲपवर प्रशिक्षण देणार आहेत. गाव पातळीवर १ ते ३ ऑगस्ट या कालावधीत गावकृती आराखडाच्या अनुषंगाने लागणारी माहिती संकलित केली जाणार आहे. यात जिल्हा कक्षातील तज्ज्ञ सल्लागार तालुकास्तरावर बीडीओ, विस्तार अधिकारी पंचायत उपअभियंता, शाखा अभियंता गावपातळीवर ग्रामसेवक, जलसुरक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन सीईओ अविश्यांत पंडा, डेप्युटी सीईओ श्रीराम कुलकर्णी, दिलीप मानकर यांनी केले आहे.

बॉक्स

बॉक्स

मान्यतेसाठी ग्रामसभेत ठेवणार

स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ग्रामसमृद्धी आभियानात आलेले गाव कृती आराखडे मान्यतेसाठी ठेवले जाणार आहेत. त्यामुळे यासंदर्भातील कामांना प्राधान्य असावे, या सोबतच मधल्या काळात या कृती आराखड्याची पडताळणी केली जाईल. त्यामुळे या अभियानात गाव स्तरावरून मोठा सहभाग असणे आवश्यक असल्याचे सीईओ पंडा यांनी स्पष्ट केले.