शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

रेल्वेने गुरांचे अपघात रोखण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’; पशुपालकांवर गुन्हे, बजावल्या नोटीस

By गणेश वासनिक | Updated: December 31, 2023 15:36 IST

अमरावती : रेल्वे परिसर अथवा ट्रॅकवर गुरे चरताना अपघाताच्या घटना होतात. गुरांचे अपघात रेल्वे प्रशासनासाठी चिंतनीय बाब असून प्रवाशांची ...

अमरावती : रेल्वे परिसर अथवा ट्रॅकवर गुरे चरताना अपघाताच्या घटना होतात. गुरांचे अपघात रेल्वे प्रशासनासाठी चिंतनीय बाब असून प्रवाशांची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे क्षेत्रात गुरे येऊ नये, यासाठी भुसावळ मध्य रेल्वे विभागाने ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला आहे. त्यानुसार रेल्वे सुरक्षा बलाने वर्षभरात ११२ पशुपालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

रेल्वेने गुरांचे अवागमन मार्ग शोधून काढले आहेत. आरपीएफने यापूर्वी रेल्वेच्या धडकेत गुरे चिरडण्याच्या घटनांचा मागोवा घेतला आणि अपघातप्रवण स्थळ निश्चित करण्यात आले आहे. गुरांचे अपघात हा रेल्वेचा प्रमुख चिंताजनक एक विषय आहे. गुरे रेल्वे खाली चिरडण्याच्या अपघातामुळे पशुपालकांचे नुकसान होते, पण रेल्वेच्या मालमत्तेचे मोठे नुकसान होते. किंबहुना रेल्वे प्रवाशांची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. रेल्वेची चिंताजनक परिस्थिती लक्षात घेता रेल्वे परिसरात गुरांचा वावर असल्याप्रकरणी १५ ते २९ डिसेंबर २०२३ या दरम्यान विशेष धडक मोहीम राबविण्यात आली. ज्या ठिकाणी गुरे रुळांवर चिरडण्याची शक्यता आहे अशा स्थळांचे विश्लेषण करण्यात आले आहे. भुसावळ विभागात रेल्वेने गुरे चिरडण्याची ६४ संवेदनशील ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

बडनेरा, अमरावती रेल्वे स्थानक परिसर अथवा क्षेत्रानजीकच्या पशुपालकांना गुरे ट्रॅकवर येता कामा नये, यासाठी पशुपालकांना नाेटीस बजावण्यात आल्या आहेत. या अभियानात एकूण ५५५१ जणांना ताकीद देण्यात आली, तर ५३० पशुपालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या जमिनीत गुरे चारणाऱ्यांवर रेल्वे कायद्यान्वये ५७ गुन्हे दाखल करण्यात आले.

दहा ठिकाणी सीमा कुंपण, पाच जागेवर सीमा भिंतरेल्वेच्या धडकेत गुरे चिरडण्याच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून भुसावळ विभागाने दहा ठिकाणी सीमा कुंपण घातले आहे. तर पाच जागेवर सीमा भिंत उभारली आहे. काही ठिकाणी हद्दवाढीचे कामे प्रस्तावित असून ते प्रगतीपथावर आहेत. ही कार्यवाही रेल्वेचे अभियांत्रिकी व आरपीएफ संयुक्तपणे करीत आहेत.

ट्रॅकजवळ व रेल्वेच्या जमिनीवर कचरा, खाद्यपदार्थ आदी टाकू नये, जेणे करून गुरे रेल्वेलाइन जवळ येणार नाहीत. रेल्वेच्या जमिनीवर, रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला गुरे चारणे टाळावे जेणेकरून मोठे अपघात टाळता येतील.- श्रीमती इति पांडे, मंडळ रेल्वे प्रबंधक, भुसावळ