शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

हागणदारीमुक्तीसाठी आता 'अ‍ॅक्शन प्लॅन'

By admin | Updated: March 1, 2015 00:24 IST

जिल्ह्यात हागणदारीमुक्तीची चळवळ मोठ्या जोमाने विस्तारत आहे. आजमितीस जिल्ह्यातील तब्बल ७० टक्के कुटुंबाकडे शौचालय तयार झाले असून येत्या तीन वर्षांत २ लाख शौचालये बांधकामाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

अमरावती : जिल्ह्यात हागणदारीमुक्तीची चळवळ मोठ्या जोमाने विस्तारत आहे. आजमितीस जिल्ह्यातील तब्बल ७० टक्के कुटुंबाकडे शौचालय तयार झाले असून येत्या तीन वर्षांत २ लाख शौचालये बांधकामाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेमार्फत 'अ‍ॅक्शन प्लॅन' तयार करून तो राज्य व केंद्र शासनाकडे सादर केला जाणार आहे. या माध्यमातून टप्प्याटप्प्याने संपूर्ण अमरावती जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालींदर आभाळे यांनी शौचालय बांधकामाचा उपक्रम सुरू केला आहे. सध्या ग्रामीण भागात शौचालयाबाबत जनजागृती करण्यावर अधिक भर आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या तब्बल ७० टक्के लोकांकडे शौचालयाचे काम पूर्णत्वास येत आहे. उर्वरित साधारणत: अडीच लाख लोकांकडे आजही वैयक्तिक शौचालय नाही. परंतु या लोकांकडे जनजागृती करण्याच्या अनुषंगाने सीईओंनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय बांधकामाचा मानस व्यक्त केला आहे. यासाठी लाभार्थ्यांना तब्बल १२ हजार रूपये प्रोत्साहन म्हणून दोन लाख शौचालयाची उद्दिष्टपूर्ती बऱ्याचपैकी झाली आहे. उर्वरित शौचालयांच्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण कक्षाच्यावतीने अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला जाणार आहे. या अ‍ॅक्शन प्लॅननुसार पुढील तीन वर्षात जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेमार्फत केला जाणार आहे. (प्रतिनिधी)