शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

हागणदारीमुक्तीसाठी आता 'अ‍ॅक्शन प्लॅन'

By admin | Updated: March 1, 2015 00:24 IST

जिल्ह्यात हागणदारीमुक्तीची चळवळ मोठ्या जोमाने विस्तारत आहे. आजमितीस जिल्ह्यातील तब्बल ७० टक्के कुटुंबाकडे शौचालय तयार झाले असून येत्या तीन वर्षांत २ लाख शौचालये बांधकामाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

अमरावती : जिल्ह्यात हागणदारीमुक्तीची चळवळ मोठ्या जोमाने विस्तारत आहे. आजमितीस जिल्ह्यातील तब्बल ७० टक्के कुटुंबाकडे शौचालय तयार झाले असून येत्या तीन वर्षांत २ लाख शौचालये बांधकामाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेमार्फत 'अ‍ॅक्शन प्लॅन' तयार करून तो राज्य व केंद्र शासनाकडे सादर केला जाणार आहे. या माध्यमातून टप्प्याटप्प्याने संपूर्ण अमरावती जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालींदर आभाळे यांनी शौचालय बांधकामाचा उपक्रम सुरू केला आहे. सध्या ग्रामीण भागात शौचालयाबाबत जनजागृती करण्यावर अधिक भर आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या तब्बल ७० टक्के लोकांकडे शौचालयाचे काम पूर्णत्वास येत आहे. उर्वरित साधारणत: अडीच लाख लोकांकडे आजही वैयक्तिक शौचालय नाही. परंतु या लोकांकडे जनजागृती करण्याच्या अनुषंगाने सीईओंनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय बांधकामाचा मानस व्यक्त केला आहे. यासाठी लाभार्थ्यांना तब्बल १२ हजार रूपये प्रोत्साहन म्हणून दोन लाख शौचालयाची उद्दिष्टपूर्ती बऱ्याचपैकी झाली आहे. उर्वरित शौचालयांच्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण कक्षाच्यावतीने अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला जाणार आहे. या अ‍ॅक्शन प्लॅननुसार पुढील तीन वर्षात जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेमार्फत केला जाणार आहे. (प्रतिनिधी)