शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

अडीच हजार उमेदवारांवर होणार अपात्रतेची कारवाई

By admin | Updated: October 9, 2015 00:44 IST

जिल्ह्यात मे ते सप्टेंबर २०१५ दरम्यान झालेल्या ५३१ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या दोन हजार ६०२ उमेदवारांनी...

लोकमत विशेषगजानन मोहोड अमरावतीजिल्ह्यात मे ते सप्टेंबर २०१५ दरम्यान झालेल्या ५३१ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या दोन हजार ६०२ उमेदवारांनी विहित मुदतीत निवडणूक खर्चाचा तपशील अद्याप तहसीलदारांसमक्ष सादर केला नाही. या उमेदवारांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरविण्याची कारवाई केली जाणार आहे. यामुळे हे अडीच हजार उमेदवारांना त्यांचे सदस्यत्व गमवावे लागणार असून पाच वर्षांपर्यंत निवडणूकही लढविता येणार नाही. ही प्रकरणे प्रक्रियेत असून ती तीन महिन्यांच्या आत निकाली काढण्यात येणार आहेत. जिल्ह्यात मे ते जुलै व जुलै ते सप्टेंबर या दोन टप्प्यात ५३१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ३२ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका पार पडल्यात. या निवडणुका लढविणाऱ्या १० हजार ३८७ उमेदवारांपैकी ७ हजार ७८५ उमेदवारांनी आयोगाद्वारे निर्देशित अधिकाऱ्यांकडे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत शपथपत्राद्वारे निवडणूक खर्च सादर केला. परंतु २ हजार ६०२ उमेदवारांनी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा खर्च २२ मे २०१५ या अंतिम तारखेपर्यंत व दुसऱ्या टप्प्यातील ग्रापं निवडणुकीचा खर्च सादर करण्याच्या २७ जुलै २०१५ या अंतिम तारखेच्या आत सादर केला नाही. परिणामी या उमेदवारांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून कायम राहण्यास किंवा पुन्हा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास निरर्ह ठरविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. याच आठवड्यात अमरावती तालुक्यातील ७० उमेदवारांवर पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र असल्याचे शिक्कामोर्तब जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले.