शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

विमानतळ विस्तारीकरणाला ग्रहण

By admin | Updated: September 15, 2015 00:05 IST

बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण, विकासासाठीचा मंजूर निधी चंद्रपूर विमानतळासाठी पळविण्यात आला आहे.

निधी चंद्रपूरकडे वळविला : लोकप्रतिनिधींचे प्रयत्न कमी पडल्याचा सूर, ‘टेक आॅफ’चे स्वप्न भंगणार?अमरावती : बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण, विकासासाठीचा मंजूर निधी चंद्रपूर विमानतळासाठी पळविण्यात आला आहे. त्यामुळे अमरावतीत विमान ‘टेक आॅफ’चे स्वप्न बघणाऱ्यांचा भ्रमनिरास झाला असून विमानतळ विस्तारीकरणाला ‘ब्रेक’ लागला आहे. दुसरीकडे निधी खेचून आणण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे प्रयत्न कमी पडल्याचा सूर उमटू लागला आहे.नागपूर येथे काही महिन्यांपूर्वी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री प्रवीण पोटे, आ.सुनील देशमुख, आ.रवी राणा, आ. वीरेंद्र जगताप, आ.यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणावर चर्चा झाली होती. यावेळी भारतीय विमानतळ प्राधिकरण कंपनी आॅफ इंडियाचे सिध्देश्वर राय यांनी बेलोरा विमानतळाचे विस्तारीकरण अशक्य असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, तरीही बेलोरा विमानतळाचा विकास करताना यवतमाळ ते अकोला महामार्गालगतचा ४ कि.मी.वळणरस्ता, वीजपुरवठा, पाणी व्यवस्था, समोरचा रस्ता आणि ‘रन-वे’च्या निर्मितीसाठी राज्य शासनाद्वारे मंजूर ३४ कोटी रुपये देण्याचे मान्य केले होते. ही कामे झाल्यास बेलोरा विमानतळावरुन आठवड्यातून तीन ते चार दिवस ५० आसनक्षमतेची विमानसेवा सुरू करता येईल, यावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र अर्थसंकल्पात निधीची तरतूद केल्यानंतरही हक्काचा निधी पाठविला गेला नाही. बेलोरा विमानतळाच्या विकासाचा प्रश्न फार जुना असताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर विमानतळासाठी नव्याने ५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. बेलोऱ्याच्या विकासाचे पैसे चंद्रपूरकडे वळते झाल्याने आता बेलोऱ्याचे विस्तारीकरण होणार की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे. चंद्रपूर, यवतमाळ, अकोला व बेलोरा या विमानतळांचा विकास करण्याचे शासनाने ठरविले आहे. बेलोरा विमानतळाचा निधी मंजूर आहे. हा निधी पळविला नाही. मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या नैराश्याने काम रखडले आहे. - प्रवीण पोटे,पालकमंत्री, अमरावती.बेलोरा विमानतळासाठी ३४ कोटी रुपये मंजूर आहेत. निधी पळविण्याचा प्रकार नाही. महाराष्ट्र विमानतळ कंपनीचे अतिरिक्त सचिव पी. एस. मीना मंजूर निधी वळता करीत नाहीत. त्यामुळे विस्तारीकरण रखडले आहे.- सुनील देशमुख,आमदार, अमरावती.केंद्र आणि राज्य शासनापैकी निधी कोणी द्यायचा, यावर एकमत नाही. जमीन अधिग्रहणाचा विषय यापूर्वीच निकाली काढला आहे. शासन धोरणात्मक निर्णय घेत नाही. निधी मिळाल्यास विमानतळाचे काम सुरू होईल.- वीरेंद्र जगताप,आमदार, धामणगाव रेल्वे.