शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

१७ गावांत पाणीटंचाई २० विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 23:27 IST

पाणीटंचाईवर जिल्हा परिषदेकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी सध्या काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देउपाययोजना सुरू : चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गावांचा समावेश

आॅनलाईन लोकमतअमरावती : पाणीटंचाईवर जिल्हा परिषदेकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी सध्या काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामध्ये चांदूररेल्वे व नांदगाव खंडेश्र्वर या दोन तालुक्यातील १७ गावांमध्ये पाणीटंचाईची झळ लागल्याने तेथे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने विहीर अधिग्रहण आणि बोअरवेल्स खोदकाम सुरू केले आहे.जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाई निवारणार्थ टंचाई आराखडा तयार केला जातो. यावर्षी १७.९९ कोटी रूपयांचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये दीड हजार गावांमध्ये उपाययोजना करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी गतवर्षी आॅक्टोबरपासून उपाययोजनांचे नियोजनास सुरूवात केली होती. चांदूररेल्वे आणि धामणगाव रेल्वे या दोन तालुक्यात पाणीटंचाईची समस्या फेब्रुवारीच्या सुरूवातीलाच भेडसावू लागली आहे.मेळघाटात पाणीटंचाई कायमजिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने या दोन्ही तालुक्यांतील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता. पाणीपुरवठा विभागाने १७ गावांतील २० विहिरींचे अधिग्रहण केले आहे. याशिवाय ४८ बोअरवेल्स मंजूर केले आहे. यापैकी ४५ बोअरवेल्स खोदकाम पूर्ण झाले आहेत. हातपंप बसविणे सुरू असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. पाणी टंचाईचा पहिला टप्पा आटोपला, तर जानेवारी ते मार्च या दुसºया टप्यात १७ गावांमध्ये पाणी टंचाई आराखड्यातून उपाययोजना केली जात आहे. मात्र मेळघाटात यावर्षीही पाणीटंचाईची समस्या कायम आहे. येथील १२ गावांना यंदाही तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. तूर्तास कुठेही टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नसल्याचे संबंधित विभागाने 'लोकमत'शी बोलताना स्पष्ट केले.तातपुरत्या पूरक नळ दुरूस्ती कामांना मंजुरीपाणीटंचाई निवारणार्थ पाणी पुरवठा विभागाने तातपुरत्या पूरक योजनांच्या कामांना मंजुरी दिली. यात अमरावती, नांदगाव खंडेश्र्वर, तिवसा, धामणगाव रेल्वे, मोर्शी, चांदूररेल्वे, अचलपूर तालुक्यातील ३० प्रस्तावांना पाणीटंचाई आराखड्यातून मंजुरी मिळाली आहे. यासाठी ग्रामपंचायतींना पंचायत समितीमार्फत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्राप्त प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाने मंजूर केले आहेत.मार्चनंतर मंजुरी नाहीपाणीटंचाई निवारणार्थ तात्पुरत्या पूरक योजनांसाठी ग्रामपंचायतींना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने पंचायत समितीमार्फत दिल्या होत्या. त्यासाठी फेब्रुवारी महिन्याची मुदत आहे. त्यानंतर मार्च महिन्यात अशा प्रस्तावांना मंजुरी दिली जाणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले यांनी सांगितले. त्यामुळे तातपुरत्या पूरक नळयोजनांची कामे करण्यासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींना कामे करावी लागणार आहेत.