शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

१७ गावांत पाणीटंचाई २० विहिरींचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 23:27 IST

पाणीटंचाईवर जिल्हा परिषदेकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी सध्या काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देउपाययोजना सुरू : चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गावांचा समावेश

आॅनलाईन लोकमतअमरावती : पाणीटंचाईवर जिल्हा परिषदेकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी सध्या काही गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामध्ये चांदूररेल्वे व नांदगाव खंडेश्र्वर या दोन तालुक्यातील १७ गावांमध्ये पाणीटंचाईची झळ लागल्याने तेथे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने विहीर अधिग्रहण आणि बोअरवेल्स खोदकाम सुरू केले आहे.जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाई निवारणार्थ टंचाई आराखडा तयार केला जातो. यावर्षी १७.९९ कोटी रूपयांचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये दीड हजार गावांमध्ये उपाययोजना करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी गतवर्षी आॅक्टोबरपासून उपाययोजनांचे नियोजनास सुरूवात केली होती. चांदूररेल्वे आणि धामणगाव रेल्वे या दोन तालुक्यात पाणीटंचाईची समस्या फेब्रुवारीच्या सुरूवातीलाच भेडसावू लागली आहे.मेळघाटात पाणीटंचाई कायमजिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने या दोन्ही तालुक्यांतील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता. पाणीपुरवठा विभागाने १७ गावांतील २० विहिरींचे अधिग्रहण केले आहे. याशिवाय ४८ बोअरवेल्स मंजूर केले आहे. यापैकी ४५ बोअरवेल्स खोदकाम पूर्ण झाले आहेत. हातपंप बसविणे सुरू असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. पाणी टंचाईचा पहिला टप्पा आटोपला, तर जानेवारी ते मार्च या दुसºया टप्यात १७ गावांमध्ये पाणी टंचाई आराखड्यातून उपाययोजना केली जात आहे. मात्र मेळघाटात यावर्षीही पाणीटंचाईची समस्या कायम आहे. येथील १२ गावांना यंदाही तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. तूर्तास कुठेही टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नसल्याचे संबंधित विभागाने 'लोकमत'शी बोलताना स्पष्ट केले.तातपुरत्या पूरक नळ दुरूस्ती कामांना मंजुरीपाणीटंचाई निवारणार्थ पाणी पुरवठा विभागाने तातपुरत्या पूरक योजनांच्या कामांना मंजुरी दिली. यात अमरावती, नांदगाव खंडेश्र्वर, तिवसा, धामणगाव रेल्वे, मोर्शी, चांदूररेल्वे, अचलपूर तालुक्यातील ३० प्रस्तावांना पाणीटंचाई आराखड्यातून मंजुरी मिळाली आहे. यासाठी ग्रामपंचायतींना पंचायत समितीमार्फत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्राप्त प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाने मंजूर केले आहेत.मार्चनंतर मंजुरी नाहीपाणीटंचाई निवारणार्थ तात्पुरत्या पूरक योजनांसाठी ग्रामपंचायतींना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने पंचायत समितीमार्फत दिल्या होत्या. त्यासाठी फेब्रुवारी महिन्याची मुदत आहे. त्यानंतर मार्च महिन्यात अशा प्रस्तावांना मंजुरी दिली जाणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले यांनी सांगितले. त्यामुळे तातपुरत्या पूरक नळयोजनांची कामे करण्यासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींना कामे करावी लागणार आहेत.