शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

पाणी टंचाईसाठी १३९ खासगी विहिरींचे अधिग्रहण

By admin | Updated: May 31, 2014 23:08 IST

जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेल्या पाणीटंचाईच्या कृती आराखड्यामध्ये जून २0१४ पर्यंतच्या अंतिम टप्प्यात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. जिल्ह्यामधील २३१ गावांत कमीअधिक प्रमाणात पाणी टंचाईची झळ पोहोचली आहे.

अमरावती : जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेल्या पाणीटंचाईच्या कृती आराखड्यामध्ये जून २0१४ पर्यंतच्या अंतिम टप्प्यात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. जिल्ह्यामधील २३१ गावांत कमीअधिक प्रमाणात पाणी टंचाईची झळ पोहोचली आहे. या पार्श्‍वभूमीवर पाणी टंचाईमध्ये शिथिलता येण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारा २१७ नवीन विंधन विहिरीचा पर्यायी उपलब्ध केला आहे. उन्हाळ्याच्या अखेरीस पाणी टंचाईची तीव्रता वाढत आहे. या अखेरच्या टप्प्यात भूगर्भातील पाण्याची पातळीदेखील खोल गेली आहे. त्यामुळे उंचसखल भागातील अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या दिवसात विद्युत भारनियमनदेखील ८ तासांवर सुरू असल्याने अनेक गावांत पाणी उपलब्ध असतानाही कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात तात्पुरती पूरक नळ योजनेंतर्गत १३ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. ७३ गावांमध्ये नळयोजनेची विशेष दुरूस्ती सुरू आहे. या टंचाईग्रस्त २३१ गावांमध्ये २१७ नवीन विंधन विहिरी तयार करण्यात येत आहे. पाणी टंचाईमध्ये काही प्रमाणात शिथिलता यावी यासाठी १३९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ८ ते १0 गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच ऐनवेळी गोंधळ होऊ नये यासाठी ३0 टँकर प्रस्तावित केले आहेत. अशाप्रकारे पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी ४७२ प्रकारची विविध कामे जिल्ह्यात सुरू आहेत. (प्रतिनिधी)