शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

पाणी टंचाईसाठी १३९ खासगी विहिरींचे अधिग्रहण

By admin | Updated: May 31, 2014 23:08 IST

जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेल्या पाणीटंचाईच्या कृती आराखड्यामध्ये जून २0१४ पर्यंतच्या अंतिम टप्प्यात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. जिल्ह्यामधील २३१ गावांत कमीअधिक प्रमाणात पाणी टंचाईची झळ पोहोचली आहे.

अमरावती : जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेल्या पाणीटंचाईच्या कृती आराखड्यामध्ये जून २0१४ पर्यंतच्या अंतिम टप्प्यात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. जिल्ह्यामधील २३१ गावांत कमीअधिक प्रमाणात पाणी टंचाईची झळ पोहोचली आहे. या पार्श्‍वभूमीवर पाणी टंचाईमध्ये शिथिलता येण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारा २१७ नवीन विंधन विहिरीचा पर्यायी उपलब्ध केला आहे. उन्हाळ्याच्या अखेरीस पाणी टंचाईची तीव्रता वाढत आहे. या अखेरच्या टप्प्यात भूगर्भातील पाण्याची पातळीदेखील खोल गेली आहे. त्यामुळे उंचसखल भागातील अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या दिवसात विद्युत भारनियमनदेखील ८ तासांवर सुरू असल्याने अनेक गावांत पाणी उपलब्ध असतानाही कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात तात्पुरती पूरक नळ योजनेंतर्गत १३ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. ७३ गावांमध्ये नळयोजनेची विशेष दुरूस्ती सुरू आहे. या टंचाईग्रस्त २३१ गावांमध्ये २१७ नवीन विंधन विहिरी तयार करण्यात येत आहे. पाणी टंचाईमध्ये काही प्रमाणात शिथिलता यावी यासाठी १३९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ८ ते १0 गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच ऐनवेळी गोंधळ होऊ नये यासाठी ३0 टँकर प्रस्तावित केले आहेत. अशाप्रकारे पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी ४७२ प्रकारची विविध कामे जिल्ह्यात सुरू आहेत. (प्रतिनिधी)