शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

पाणी टंचाईसाठी १३९ खासगी विहिरींचे अधिग्रहण

By admin | Updated: May 31, 2014 23:08 IST

जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेल्या पाणीटंचाईच्या कृती आराखड्यामध्ये जून २0१४ पर्यंतच्या अंतिम टप्प्यात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. जिल्ह्यामधील २३१ गावांत कमीअधिक प्रमाणात पाणी टंचाईची झळ पोहोचली आहे.

अमरावती : जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेल्या पाणीटंचाईच्या कृती आराखड्यामध्ये जून २0१४ पर्यंतच्या अंतिम टप्प्यात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. जिल्ह्यामधील २३१ गावांत कमीअधिक प्रमाणात पाणी टंचाईची झळ पोहोचली आहे. या पार्श्‍वभूमीवर पाणी टंचाईमध्ये शिथिलता येण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारा २१७ नवीन विंधन विहिरीचा पर्यायी उपलब्ध केला आहे. उन्हाळ्याच्या अखेरीस पाणी टंचाईची तीव्रता वाढत आहे. या अखेरच्या टप्प्यात भूगर्भातील पाण्याची पातळीदेखील खोल गेली आहे. त्यामुळे उंचसखल भागातील अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या दिवसात विद्युत भारनियमनदेखील ८ तासांवर सुरू असल्याने अनेक गावांत पाणी उपलब्ध असतानाही कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात तात्पुरती पूरक नळ योजनेंतर्गत १३ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. ७३ गावांमध्ये नळयोजनेची विशेष दुरूस्ती सुरू आहे. या टंचाईग्रस्त २३१ गावांमध्ये २१७ नवीन विंधन विहिरी तयार करण्यात येत आहे. पाणी टंचाईमध्ये काही प्रमाणात शिथिलता यावी यासाठी १३९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ८ ते १0 गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच ऐनवेळी गोंधळ होऊ नये यासाठी ३0 टँकर प्रस्तावित केले आहेत. अशाप्रकारे पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी ४७२ प्रकारची विविध कामे जिल्ह्यात सुरू आहेत. (प्रतिनिधी)