शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
2
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
3
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
4
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
5
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
6
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
7
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
8
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
9
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
10
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
11
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
12
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
13
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
14
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
15
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
16
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
17
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
18
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
19
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
20
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

क्वॉलिटी मॉनिटरिंगसाठी शिकाऊ अभियंत्यांवर धुरा

By admin | Updated: May 26, 2015 00:12 IST

मागील पाच वर्षापासून कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी, यासोबतच आता दुष्काळ अशा कचाटयात अडकलेल्या ...

आज बैठक : जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची करणार तपासणीअमरावती : मागील पाच वर्षापासून कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी, यासोबतच आता दुष्काळ अशा कचाटयात अडकलेल्या जिल्ह्याला टंचाईमुक्त करण्यासोबतच गाव तेथे जलयुक्त शिवार ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी २५३ गावाचा कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. दरम्यान या कोट्यवधी रूपयांच्या कामाची गुणवत्ताही राखली जावी, यासाठी या कामांचे मुल्यमापन महत्वपूर्ण ठरते. त्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन आणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याची मदत घेतली जाणार आहे.जलयुक्त शिवार अभियानातील कामे गुणवत्ता पूर्ण व्हावीत, यासाठी प्राधान्याने हे अभियंते लक्ष ठेवणार आहेत. ठरावीक कालावधीनंतर या कामांच्या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियानातील कामे विविध यंत्रणेच्या माध्यमातूनकेली जात आहे. ही कामे चांगल्या प्रतीची असावीत, अशा शासनाच्या सूचना आहेत. त्या दुष्टीने जलयुक्त शिवार अभियानाच्या आढावा दर आठवडयाला घेण्यात येत आहे. यामध्ये निवड पात्र गावात सुरू असलेल्या कामांचा आढावा कामांची स्थिती याबाबत माहिती घेऊन काही उणिवा आढळल्यास त्यामध्ये सुधारणा करणे व कामे ही वेळेत करण्याच्या दुष्टीने कामांची गती वाढविणे, यावर विशेष भर देत असतांनाच कामांची गुणवत्ता राखणे महत्वाचे आहे. परिणामी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जलयुक्त शिवारच्या कामांची गुणवत्ता पडताळण्यासाठी शासकीय अभियांत्रीकी व तंत्रनिकेतनमधील विद्यार्थी तसेच तज्ञ प्राध्यापक यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक तालुक्यात दोन या प्रमाणे या अभियंत्यावर जबाबदारी दिली जाणार आहे. जिल्हा कायमस्वरूपी टंचाई मुक्त करणे, ही प्रशासनाची भूमिका आहे. ती या अभियानात नक्कीच प्रशासन पूर्ण करेल, यात शंका नाही, असा आशावाद जिल्हाधिकारी गित्ते यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)जलयुक्त शिवार अभियानातील कामांची गुणवत्ता चांगली असावी, यासाठी खास गुणवत्ता तपासणीसाठी शासकीय अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन शाखेच्या विद्यार्थ्याची मदत घेतली जाणार आहे. यासाठी मंगळवारी बैठक बोलाविली आहे.- किरण गीत्ते, जिल्हाधिकारी.