शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

क्वॉलिटी मॉनिटरिंगसाठी शिकाऊ अभियंत्यांवर धुरा

By admin | Updated: May 26, 2015 00:12 IST

मागील पाच वर्षापासून कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी, यासोबतच आता दुष्काळ अशा कचाटयात अडकलेल्या ...

आज बैठक : जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची करणार तपासणीअमरावती : मागील पाच वर्षापासून कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी, यासोबतच आता दुष्काळ अशा कचाटयात अडकलेल्या जिल्ह्याला टंचाईमुक्त करण्यासोबतच गाव तेथे जलयुक्त शिवार ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी २५३ गावाचा कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. दरम्यान या कोट्यवधी रूपयांच्या कामाची गुणवत्ताही राखली जावी, यासाठी या कामांचे मुल्यमापन महत्वपूर्ण ठरते. त्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन आणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याची मदत घेतली जाणार आहे.जलयुक्त शिवार अभियानातील कामे गुणवत्ता पूर्ण व्हावीत, यासाठी प्राधान्याने हे अभियंते लक्ष ठेवणार आहेत. ठरावीक कालावधीनंतर या कामांच्या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियानातील कामे विविध यंत्रणेच्या माध्यमातूनकेली जात आहे. ही कामे चांगल्या प्रतीची असावीत, अशा शासनाच्या सूचना आहेत. त्या दुष्टीने जलयुक्त शिवार अभियानाच्या आढावा दर आठवडयाला घेण्यात येत आहे. यामध्ये निवड पात्र गावात सुरू असलेल्या कामांचा आढावा कामांची स्थिती याबाबत माहिती घेऊन काही उणिवा आढळल्यास त्यामध्ये सुधारणा करणे व कामे ही वेळेत करण्याच्या दुष्टीने कामांची गती वाढविणे, यावर विशेष भर देत असतांनाच कामांची गुणवत्ता राखणे महत्वाचे आहे. परिणामी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जलयुक्त शिवारच्या कामांची गुणवत्ता पडताळण्यासाठी शासकीय अभियांत्रीकी व तंत्रनिकेतनमधील विद्यार्थी तसेच तज्ञ प्राध्यापक यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक तालुक्यात दोन या प्रमाणे या अभियंत्यावर जबाबदारी दिली जाणार आहे. जिल्हा कायमस्वरूपी टंचाई मुक्त करणे, ही प्रशासनाची भूमिका आहे. ती या अभियानात नक्कीच प्रशासन पूर्ण करेल, यात शंका नाही, असा आशावाद जिल्हाधिकारी गित्ते यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)जलयुक्त शिवार अभियानातील कामांची गुणवत्ता चांगली असावी, यासाठी खास गुणवत्ता तपासणीसाठी शासकीय अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन शाखेच्या विद्यार्थ्याची मदत घेतली जाणार आहे. यासाठी मंगळवारी बैठक बोलाविली आहे.- किरण गीत्ते, जिल्हाधिकारी.