शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

अचलपूरची ‘शकुंतला’ लोकसभेच्या अधिवेशनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 05:00 IST

मेळघाटातून अकोला-अकोट-धूळघाट रेल्वे-डाबका-देढतलाई ते खंडवा असा ब्रिटिशकालीन रेल्वे मार्ग परिवर्तीत न करता पूर्वीप्रमाणेच तो मेळघाटातून देण्याची मागणी आदिवासींमधून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. मेळघाट हा आदिवासीबहुल परिसर असून, येथे सर्वाधिक संख्या याच समाजाची आहे. रोजगारासाठी कैक दशकांपासून त्यांना मोठ्या प्रमाणात स्थलांतरित व्हावे लागते.

ठळक मुद्देमेळघाटातूनच रेल्वेचा मार्ग करा; आदिवासीविरूद्ध राज्यशासन असा सामना ?

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : ब्रिटिशकाळापासून मेळघाटला मध्य प्रांताला जोडणाऱ्या दीडशे वर्षे जुन्या रेल्वे मार्गाला बोटावर मोजण्याएवढ्या राजकारण्यांसाठी शहरी भागात वळविण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा रेल्वे मार्ग मेळघाटातून न नेता अन्य ठिकाणाहून नेण्यासाठी पत्र दिले. ते आदिवासीविरोधी असल्याचा आरोप बुधवारी लोकसभा अधिवेशनादरम्यान जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी केला. अचलपूरच्या नॅरोगेज रेल्वेचा मुद्दाही त्यांनी मांडला.मेळघाटातून अकोला-अकोट-धूळघाट रेल्वे-डाबका-देढतलाई ते खंडवा असा ब्रिटिशकालीन रेल्वे मार्ग परिवर्तीत न करता पूर्वीप्रमाणेच तो मेळघाटातून देण्याची मागणी आदिवासींमधून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. मेळघाट हा आदिवासीबहुल परिसर असून, येथे सर्वाधिक संख्या याच समाजाची आहे. रोजगारासाठी कैक दशकांपासून त्यांना मोठ्या प्रमाणात स्थलांतरित व्हावे लागते. शहराच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी हा दीडशे वर्ष जुना रेल्वे मार्ग आदिवासींसाठी वरदान ठरत आहे. रेल्वेव्यतिरिक्त इतर साधने खर्चीक असल्याने ती आदिवासींंना परवडण्याजोगी नाहीत, असे खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत सांगितले. त्यामुळे रेल्वेचा शतकोत्तर ब्रिटिशकालीन मार्ग कायम ठेवावा, असे त्या म्हणाल्या. यावर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेच्या नकाशातून मेळघाट गायब होणार नसल्याचे अभिवचन दिले. मेळघाटातील रेल्वे मार्गाच्या बदलाच्या पार्श्वभूमीवर आदिवासींमध्ये अस्वस्थता आहे. या रेल्वे मार्गाबद्दलची मावळलेली अपेक्षा आता रेल्वेमंत्र्यांच्या उत्तराने उंचावली आहे.अचलपूरची ‘शकुंतला’ सुरूच ठेवालोकसभेत बुधवारी खासदार नवनीत राणा मेळघाट रेल्वे प्रश्नांवर आक्रमक झाल्या. पश्चिम विदर्भाची ब्रिटिशकालीन नॅरोगेज शकुंतला रेल्वे कष्टकरी, श्रमजीवी, शेतकऱ्यांची जीवनवाहिनी आहे. मात्र, ती बंद आहे. त्यामुळे शेतकºयांसह अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. मूर्तिजापूर ते अचलपूर मार्गावरील अनेक गावांतील लोकांचे दळणवळणाचे साधन खुंटले आहे. दर्यापूर व अंजनगाव तालुक्यांतील अनेक गावांना लाभ होणार असल्याने शकुंतला रेल्वे सुरू करणे गरजेचे असल्याची मागणी खा. राणा यांनी केली. लवकरच ही रेल्वे सुरू करणार असल्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यावेळी उत्तर दिले.मुख्यमंत्री आदिवासींचे विरोधी ?अकोला-अकोट-धूळघाट रेल्वे-डाबका-खंडवा रेल्वेचा मार्ग परिवर्र्तित करून मेळघाटबाहेरून रेल्वे मार्ग नेण्याचे पत्र मुख्यमंत्र्यांनी दिले. ते आदिवासीविरोधी असल्याचा टोलाही खासदारांनी लगावला. जुना मार्ग कायम राहील व शकुंतला एक्सप्रेससुद्धा लवकरच प्रारंभ करण्यात येईल, असे उत्तर रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी खासदारांना उत्तर दिले.

टॅग्स :Shakuntala Trainशकुंतला रेल्वेrailwayरेल्वे