शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक शोषण झाल्यास मान्यताच रद्द

By admin | Updated: December 28, 2016 01:43 IST

शासन अनुदान घेऊन स्वयंसेवी संस्थांकडून आश्रमशाळा, वसतिगृहे चालविले जातात. मात्र, आता आश्रमशाळांमध्ये

संस्थाचालकांना लगाम : अटी, शर्थीचे पालन करण्यासाठी कठोर पाऊल अमरावती : शासन अनुदान घेऊन स्वयंसेवी संस्थांकडून आश्रमशाळा, वसतिगृहे चालविले जातात. मात्र, आता आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी मृत्यू अथवा लैंगिक अत्याचाराच्या घटना झाल्यास मान्यताच रद्द केली जाईल, असे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. या निर्णयामुळे संस्थाचालकाच्या मनमानी कारभारावर अंकुश लावले जाणार आहे. आदिवासी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा, वसतिगृहे चालविले जातात. परंतु अनुदान लाटण्यासाठी जणू आश्रमशाळा सुरू असल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा, मूलभूत अधिकारांकडे स्वयंसेवी संस्था दुर्लक्ष करतात, अशी विदारक स्थिती आहे. त्यामुळे संस्था चालकांच्या मनमानीे कारभारावर अंकुश लावण्यासाठी राज्य शासनाने कठोर पावले उचलली असून अटी, शर्थीचे पालन संस्थांनी करावे, यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी मृत्यू किंवा लैंगिक अत्याचाराच्या घटना झाल्यास अशा आश्रमशाळांची थेट मान्यता रद्द केली जाणार आहे. शाळेचा शैक्षणिक दर्जा न राखणे, पुरेशी विद्यार्थी नसणे, निकृष्ट भोजन व्यवस्था, शैक्षणिक सुविधांचा अभाव आदी बाबीकडे स्वयंसेवी संस्थाचे दुर्लक्ष राहते. अनुदान लाटण्यासाठी आश्रमशाळा चालविणे हा स्वयंसेवी संस्थाचा हेतू असल्याने याला चाप बसविण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणे विद्यार्थ्यांचे मृत्यू, बलात्कार, लैंगिक अत्याचार, अपघात घडतात. आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा चालविल्या जात आहेत. या आश्रमशाळांत विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या सोयीसुविधांच्या तुलनेत स्वयंसेवी संस्थांना अनुदान दिले जाते. मात्र संस्थाचालक आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या मूलभूत सोयीसुविधांकडे दुर्लक्ष करुन केवळ अनुदान हडपण्यासाठी खटाटोप चालवितात.