शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

लैंगिक शोषण झाल्यास मान्यताच रद्द

By admin | Updated: December 28, 2016 01:43 IST

शासन अनुदान घेऊन स्वयंसेवी संस्थांकडून आश्रमशाळा, वसतिगृहे चालविले जातात. मात्र, आता आश्रमशाळांमध्ये

संस्थाचालकांना लगाम : अटी, शर्थीचे पालन करण्यासाठी कठोर पाऊल अमरावती : शासन अनुदान घेऊन स्वयंसेवी संस्थांकडून आश्रमशाळा, वसतिगृहे चालविले जातात. मात्र, आता आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी मृत्यू अथवा लैंगिक अत्याचाराच्या घटना झाल्यास मान्यताच रद्द केली जाईल, असे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. या निर्णयामुळे संस्थाचालकाच्या मनमानी कारभारावर अंकुश लावले जाणार आहे. आदिवासी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा, वसतिगृहे चालविले जातात. परंतु अनुदान लाटण्यासाठी जणू आश्रमशाळा सुरू असल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा, मूलभूत अधिकारांकडे स्वयंसेवी संस्था दुर्लक्ष करतात, अशी विदारक स्थिती आहे. त्यामुळे संस्था चालकांच्या मनमानीे कारभारावर अंकुश लावण्यासाठी राज्य शासनाने कठोर पावले उचलली असून अटी, शर्थीचे पालन संस्थांनी करावे, यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी मृत्यू किंवा लैंगिक अत्याचाराच्या घटना झाल्यास अशा आश्रमशाळांची थेट मान्यता रद्द केली जाणार आहे. शाळेचा शैक्षणिक दर्जा न राखणे, पुरेशी विद्यार्थी नसणे, निकृष्ट भोजन व्यवस्था, शैक्षणिक सुविधांचा अभाव आदी बाबीकडे स्वयंसेवी संस्थाचे दुर्लक्ष राहते. अनुदान लाटण्यासाठी आश्रमशाळा चालविणे हा स्वयंसेवी संस्थाचा हेतू असल्याने याला चाप बसविण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणे विद्यार्थ्यांचे मृत्यू, बलात्कार, लैंगिक अत्याचार, अपघात घडतात. आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा चालविल्या जात आहेत. या आश्रमशाळांत विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या सोयीसुविधांच्या तुलनेत स्वयंसेवी संस्थांना अनुदान दिले जाते. मात्र संस्थाचालक आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या मूलभूत सोयीसुविधांकडे दुर्लक्ष करुन केवळ अनुदान हडपण्यासाठी खटाटोप चालवितात.