शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
5
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
6
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
7
Operation Sindoor : जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
9
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
10
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
11
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
12
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
13
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
14
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
15
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
16
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
17
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
18
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
19
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
20
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  

भ्रष्टाचार प्रकरणांवर एसीबीचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST

विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागामार्फत सन २००८ मध्ये ‘नॅशनल वर्कशॉप अ‍ॅन्ड ग्रीन केमेस्ट्री’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ए. व्ही. थिएटरमध्ये ही कार्यशाळा घेण्यात आली. मात्र, या थिएटरची क्षमता १८० असताना ५०० प्रतिनिधी हजर झाल्याचे दर्शवून देयके काढण्यात आले. याप्रकरणी भ्रष्टाचार झाल्याबाबतची तक्रार रसायनशास्त्राचे प्राध्यापक राजेंद्र प्रसाद यांनी येथील एसीबी अधीक्षकांकडे सन- २०१८ मध्ये केली होती.

ठळक मुद्देकुलगुरुंच्या नावे पत्र : विद्यापीठाकडून मागितली वस्तुनिष्ठ माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाने सन- २००८ मध्ये झालेल्या राष्ट्रीय परिषदेच्या आयोजनात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई येथील मुख्यालयाने याप्रकरणी वस्तुनिष्ठ माहिती मागितली आहे. त्याअनुषंगाने एसीबीने ४ जानेवारी २०२० रोजी कुलगुरूंच्या नावे पत्र पाठविले आहे.विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागामार्फत सन २००८ मध्ये ‘नॅशनल वर्कशॉप अ‍ॅन्ड ग्रीन केमेस्ट्री’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ए. व्ही. थिएटरमध्ये ही कार्यशाळा घेण्यात आली. मात्र, या थिएटरची क्षमता १८० असताना ५०० प्रतिनिधी हजर झाल्याचे दर्शवून देयके काढण्यात आले. याप्रकरणी भ्रष्टाचार झाल्याबाबतची तक्रार रसायनशास्त्राचे प्राध्यापक राजेंद्र प्रसाद यांनी येथील एसीबी अधीक्षकांकडे सन- २०१८ मध्ये केली होती. हे प्रकरण विद्यापीठाचे असल्याने एसीबीच्या अधीक्षकांनी मुंबईत मुख्यालयात ते पाठविले.राजेंद्र प्रसाद यांनी परिषदेच्या नावे भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे एसीबीकडे सादर केले होते. मुंबई येथील एसीबीने पत्र क्रमांक ११२८० नुसार लाचलुचपत प्रतिबंधक कलम १७ (अ)/ डी/ १६२ भष्ट्राचार प्रकरणाच्या चौकशीसाठी २१ डिसेंबर २०१९ रोजीच्या पत्रान्वये परवानगी मागितली आहे. या अनुषंगाने कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी ६ जानेवारी २०२० रोजी विद्यापीठाचे विधी अधिकारी मंगेश जायले यांच्याकडे पत्र पाठविल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.४० हजार रूपये विद्यापीठ खात्यात जमा नाहीराष्ट्रीय कार्यशाळेच्या अनुषंगाने काही कामे खासगी व्यक्तींना सोपविली होती. मात्र, केमिकल पुरवठादार, निम्स कोचींग क्लासेस यांच्याकडून जमा होणारी ४० हजार रूपयांची रक्कम विद्यापीठ खात्यात जमा झाले नाही, अशी तक्रार राजेंद्र प्रसाद यांनी सन- २०१४ मध्ये कुलगुरू यांच्याकडे केली आहे.एसीबीने विद्यापीठाशी निगडित चार ते पाच प्रकरणांचा वस्तुनिष्ठ अहवाल मागविला आहे. यात ग्रीन केमेस्ट्री कार्यशाळेचाही उल्लेख आहे. आतापर्यंत विद्यापीठाने कोणत्या प्रकारची कार्यवाही केली, हे एसीबीकडे पाठविले जाणार आहे.- मंगेश जायले,विधी अधिकारी, अमरावती विद्यापीठ 

टॅग्स :universityविद्यापीठ