शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार प्रकरणांवर एसीबीचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:00 IST

विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागामार्फत सन २००८ मध्ये ‘नॅशनल वर्कशॉप अ‍ॅन्ड ग्रीन केमेस्ट्री’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ए. व्ही. थिएटरमध्ये ही कार्यशाळा घेण्यात आली. मात्र, या थिएटरची क्षमता १८० असताना ५०० प्रतिनिधी हजर झाल्याचे दर्शवून देयके काढण्यात आले. याप्रकरणी भ्रष्टाचार झाल्याबाबतची तक्रार रसायनशास्त्राचे प्राध्यापक राजेंद्र प्रसाद यांनी येथील एसीबी अधीक्षकांकडे सन- २०१८ मध्ये केली होती.

ठळक मुद्देकुलगुरुंच्या नावे पत्र : विद्यापीठाकडून मागितली वस्तुनिष्ठ माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाने सन- २००८ मध्ये झालेल्या राष्ट्रीय परिषदेच्या आयोजनात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई येथील मुख्यालयाने याप्रकरणी वस्तुनिष्ठ माहिती मागितली आहे. त्याअनुषंगाने एसीबीने ४ जानेवारी २०२० रोजी कुलगुरूंच्या नावे पत्र पाठविले आहे.विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागामार्फत सन २००८ मध्ये ‘नॅशनल वर्कशॉप अ‍ॅन्ड ग्रीन केमेस्ट्री’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ए. व्ही. थिएटरमध्ये ही कार्यशाळा घेण्यात आली. मात्र, या थिएटरची क्षमता १८० असताना ५०० प्रतिनिधी हजर झाल्याचे दर्शवून देयके काढण्यात आले. याप्रकरणी भ्रष्टाचार झाल्याबाबतची तक्रार रसायनशास्त्राचे प्राध्यापक राजेंद्र प्रसाद यांनी येथील एसीबी अधीक्षकांकडे सन- २०१८ मध्ये केली होती. हे प्रकरण विद्यापीठाचे असल्याने एसीबीच्या अधीक्षकांनी मुंबईत मुख्यालयात ते पाठविले.राजेंद्र प्रसाद यांनी परिषदेच्या नावे भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे एसीबीकडे सादर केले होते. मुंबई येथील एसीबीने पत्र क्रमांक ११२८० नुसार लाचलुचपत प्रतिबंधक कलम १७ (अ)/ डी/ १६२ भष्ट्राचार प्रकरणाच्या चौकशीसाठी २१ डिसेंबर २०१९ रोजीच्या पत्रान्वये परवानगी मागितली आहे. या अनुषंगाने कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी ६ जानेवारी २०२० रोजी विद्यापीठाचे विधी अधिकारी मंगेश जायले यांच्याकडे पत्र पाठविल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.४० हजार रूपये विद्यापीठ खात्यात जमा नाहीराष्ट्रीय कार्यशाळेच्या अनुषंगाने काही कामे खासगी व्यक्तींना सोपविली होती. मात्र, केमिकल पुरवठादार, निम्स कोचींग क्लासेस यांच्याकडून जमा होणारी ४० हजार रूपयांची रक्कम विद्यापीठ खात्यात जमा झाले नाही, अशी तक्रार राजेंद्र प्रसाद यांनी सन- २०१४ मध्ये कुलगुरू यांच्याकडे केली आहे.एसीबीने विद्यापीठाशी निगडित चार ते पाच प्रकरणांचा वस्तुनिष्ठ अहवाल मागविला आहे. यात ग्रीन केमेस्ट्री कार्यशाळेचाही उल्लेख आहे. आतापर्यंत विद्यापीठाने कोणत्या प्रकारची कार्यवाही केली, हे एसीबीकडे पाठविले जाणार आहे.- मंगेश जायले,विधी अधिकारी, अमरावती विद्यापीठ 

टॅग्स :universityविद्यापीठ