शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

शेतकरी आत्महत्याग्रस्त, आदिवासी कुटुंबांच्या मुलांचे शैक्षणिक पुनर्वसन

By admin | Updated: June 14, 2016 00:06 IST

भारतीय जैन संघटना अमरावती शाखेच्यावतीने सोमवारी आत्महत्याग्रस्त शेतकरी, आदिवासी कुटुंबांतील मुलांच्या शैक्षणिक पुनर्वसनाचा कार्यक्रम पार पडला.

जैन संघटनेचा पुढाकार : मेळघाटातील विद्यार्थ्यांचा समावेशअमरावती : भारतीय जैन संघटना अमरावती शाखेच्यावतीने सोमवारी आत्महत्याग्रस्त शेतकरी, आदिवासी कुटुंबांतील मुलांच्या शैक्षणिक पुनर्वसनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शेकडो विद्यार्थ्यांना पुण्याच्या शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात रवाना करण्यात आले.येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक, अतिरिक्त जिल्हाधिकारी के.आर. परदेशी, एमआयडीसी असोशिएशनचे अध्यक्ष किरण पातूरकर, अभिनंदन बँकेचे अध्यक्ष विजय बोथरा, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, भारतीय जैन संघटनेच्या नियोजन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुदर्शन जैन, गोविंद कासट, पुष्पा बोंडे, प्रदीप रुणवाल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भारतीय जैन संघटनेच्यावतीने पाहुण्यांचे वृक्षाचे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रास्ताविकातून सुदर्शन जैन यांनी भारतीय जैन संघटनेच्या कार्याचा आलेख मांडला. जैन संघटनेचे सर्वेसर्वा शांतीलाल मुथा यांनी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरीची पायाभरणी केली असून हाच वसा पुढे चालविण्याचा मानस व्यक्त केला. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी भारतीय जैन संघटनेचे कार्य वाखाणण्याजोगे असून कुठल्याही लालसेची अपेक्षा न ठेवता पीडित, शोषितांसाठी ही संघटना सदैव कार्यरत आहे. मेळघाटसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षित करुन त्यांना रोजगाराचा मार्ग दाखवून दिला ही बाब अविस्मरणीय आहे. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी देखील भारतीय जैन संघटनेच्या कार्याची भरभरून स्तुती केली. शैक्षणिक पुनर्वसनासाठी चाललेल्या विद्यार्थ्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. यावेळी इतरही मान्यवरांनी जैन संघटनेच्या कार्यावर कौतुकाचा वर्षाव केला. संचालन ज्योती तोटेवार यांनी केले. (प्रतिनिधी)दिव्या म्हणाली, आईचं स्वप्न पूर्ण करेल!वडिलांनी आत्महत्या केली. मात्र मी खचून जाणार नाही. इंजिनिअर बनून आईचं स्वप्न पूर्ण करणार, अशी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थिनी दिव्या धोनवाडे ही मनोगत व्यक्त करताना म्हणाली. दिव्या ही पुढील शिक्षणासाठी पुणे येथे जात आहे. तिने आईचा साथ न सोडण्याची प्रतिज्ञा घेतली आहे.