शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
3
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
4
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
5
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
6
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
7
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
8
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
9
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
10
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
11
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
12
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
13
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
14
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
15
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
16
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
17
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
18
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
19
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
20
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

अबब..! आठ फूट उंच पºहाटी!, शेतकºयाने साधली किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 23:30 IST

पिकांना बाशांचा आधार दिला जात असल्याचे चित्र अमरावती जिल्ह्यात सहजतेने पाहता येते. मात्र, सध्या जिल्ह्यात चर्चा आहे ती, तिवसा तालुक्यातील जावरा येथील एका शेतकºयाने लावलेल्या पºहाटीची.

ठळक मुद्देएकरी ३५ क्विंटलचे सरासरी उत्पन्न : जावरा फत्तेपुर येथील तरुण शेतकºयाचा यशस्वी प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : पिकांना बाशांचा आधार दिला जात असल्याचे चित्र अमरावती जिल्ह्यात सहजतेने पाहता येते. मात्र, सध्या जिल्ह्यात चर्चा आहे ती, तिवसा तालुक्यातील जावरा येथील एका शेतकºयाने लावलेल्या पºहाटीची. गुणवंत धर्माळे यांच्या शेतातील पºहाटी आठ फूट उंच वाढली असून चक्क बाशांचा आधार देऊन ती उभी करण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. त्यांना यंदा विक्रमी उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.जावरा फत्तेपूर येथील गुणवंत धर्माळे यांनी प्रथमच त्यांच्या सहा एकरात कपाशी लागवड केली. पावसाची दडी, मजुराची वानवा, वातवरणातील बदल यावर नियंत्रण मिळविता येत नसले तरीदेखील योग्य नियोजनाद्वारे विपरीत परिस्थितीतही पीक घेता येते. यासाठी त्यांनी अनेक तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले. धर्माळे यांच्या शेतातील पºहाटी आठ फूट उंच आहे. प्रत्येक झाडाला १५० ते १८० एवढी बोंडे लागली आहेत. केवळ तीन महिन्यांच्या कालावधीत त्यांच्या पºहाटीने सहा फुटांची उंची गाठल्याने परिसरात चर्चा सुरू झाली होती. पात्यावर आल्यावर बोंडांची फूट पाहता अनेक शेतकरी, तज्ज्ञ, कृषी अधिकारी आदी त्यांच्या शेताला भेट देत आहेत.- अशी केली मशागतसहा एकर शेतात पºहाटी लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी शेताची दोनदा नांगरणी केली. पेरणीनंतर १२ दिवसांनी पाच वेळा खतांचे डोज दिले. ज्यामुळे जमिनीला आवश्यक ती अन्नद्रव्ये मिळाली. पीक डोलू लागल्यावर फवारणी व कीड व्यवस्थापन केले.सिंचनाचा अनुभव आला कामीसिंचनाचा अनुभव धर्माळे यांना आहे. यामुळे कोणत्या पिकाला किती पाणी हवे याची माहिती होती. यंदा पावसाने दडी दिल्याने अनेकांची पºहाडी मागे पडली असताना त्यांच्या शेतातील पºहाटी वाढलीच नव्हे तर बोंडांच्या भाराने झुकली आहे.शेतकरी निसर्गाच्या बिघडलेल्या चक्रामुळे हवालदिल झाला आहे. तसेच आत्महत्या करीत आहे. हे मनात ठेवूनच शेती करताना पारंपरिक नव्हे, तर नाविन्यपूर्ण पद्धतीने करण्याचा ध्यास बाळगला होता.’’- गुणवंत धर्माळे,शेतकरी, जावरा फत्तेपूरसुधारित तंत्रज्ञान व योग्य व्यवस्थापन तसेच कृषी विभागाशी सतत संपर्क यामुळे गुणवंत धर्माळे यांचे कपाशी पीक इतरांसाठी आदर्श ठरले आहे. त्यांना एकरी ३५ क्विंटलपर्यंत उत्पादन होईल.’’- अनंत मस्करे, तालुका कृषी अधिकारी, तिवसा