शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
4
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
5
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
6
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
7
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
8
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
9
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
10
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
11
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
12
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
13
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
14
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
15
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
16
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
17
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
18
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
19
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
20
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

अबब..! आठ फूट उंच पºहाटी!, शेतकºयाने साधली किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 23:30 IST

पिकांना बाशांचा आधार दिला जात असल्याचे चित्र अमरावती जिल्ह्यात सहजतेने पाहता येते. मात्र, सध्या जिल्ह्यात चर्चा आहे ती, तिवसा तालुक्यातील जावरा येथील एका शेतकºयाने लावलेल्या पºहाटीची.

ठळक मुद्देएकरी ३५ क्विंटलचे सरासरी उत्पन्न : जावरा फत्तेपुर येथील तरुण शेतकºयाचा यशस्वी प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : पिकांना बाशांचा आधार दिला जात असल्याचे चित्र अमरावती जिल्ह्यात सहजतेने पाहता येते. मात्र, सध्या जिल्ह्यात चर्चा आहे ती, तिवसा तालुक्यातील जावरा येथील एका शेतकºयाने लावलेल्या पºहाटीची. गुणवंत धर्माळे यांच्या शेतातील पºहाटी आठ फूट उंच वाढली असून चक्क बाशांचा आधार देऊन ती उभी करण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. त्यांना यंदा विक्रमी उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.जावरा फत्तेपूर येथील गुणवंत धर्माळे यांनी प्रथमच त्यांच्या सहा एकरात कपाशी लागवड केली. पावसाची दडी, मजुराची वानवा, वातवरणातील बदल यावर नियंत्रण मिळविता येत नसले तरीदेखील योग्य नियोजनाद्वारे विपरीत परिस्थितीतही पीक घेता येते. यासाठी त्यांनी अनेक तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले. धर्माळे यांच्या शेतातील पºहाटी आठ फूट उंच आहे. प्रत्येक झाडाला १५० ते १८० एवढी बोंडे लागली आहेत. केवळ तीन महिन्यांच्या कालावधीत त्यांच्या पºहाटीने सहा फुटांची उंची गाठल्याने परिसरात चर्चा सुरू झाली होती. पात्यावर आल्यावर बोंडांची फूट पाहता अनेक शेतकरी, तज्ज्ञ, कृषी अधिकारी आदी त्यांच्या शेताला भेट देत आहेत.- अशी केली मशागतसहा एकर शेतात पºहाटी लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी शेताची दोनदा नांगरणी केली. पेरणीनंतर १२ दिवसांनी पाच वेळा खतांचे डोज दिले. ज्यामुळे जमिनीला आवश्यक ती अन्नद्रव्ये मिळाली. पीक डोलू लागल्यावर फवारणी व कीड व्यवस्थापन केले.सिंचनाचा अनुभव आला कामीसिंचनाचा अनुभव धर्माळे यांना आहे. यामुळे कोणत्या पिकाला किती पाणी हवे याची माहिती होती. यंदा पावसाने दडी दिल्याने अनेकांची पºहाडी मागे पडली असताना त्यांच्या शेतातील पºहाटी वाढलीच नव्हे तर बोंडांच्या भाराने झुकली आहे.शेतकरी निसर्गाच्या बिघडलेल्या चक्रामुळे हवालदिल झाला आहे. तसेच आत्महत्या करीत आहे. हे मनात ठेवूनच शेती करताना पारंपरिक नव्हे, तर नाविन्यपूर्ण पद्धतीने करण्याचा ध्यास बाळगला होता.’’- गुणवंत धर्माळे,शेतकरी, जावरा फत्तेपूरसुधारित तंत्रज्ञान व योग्य व्यवस्थापन तसेच कृषी विभागाशी सतत संपर्क यामुळे गुणवंत धर्माळे यांचे कपाशी पीक इतरांसाठी आदर्श ठरले आहे. त्यांना एकरी ३५ क्विंटलपर्यंत उत्पादन होईल.’’- अनंत मस्करे, तालुका कृषी अधिकारी, तिवसा