शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

आदिवासी विद्यार्थ्यांच्या पळवापळवीवर अंकुश

By admin | Updated: May 6, 2017 00:12 IST

मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांची राज्यातील शाळांमध्ये होणारी पळवापळवी थांबविण्यासाठी गावस्तरावर सर्वांनी मिळून ...

प्रशासन गंभीर : जनजागृतीचा फंडा, ८१ शाळा बंद होण्याच्या मार्गावरलोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांची राज्यातील शाळांमध्ये होणारी पळवापळवी थांबविण्यासाठी गावस्तरावर सर्वांनी मिळून जनजागृती करीत आपल्या पाल्यांना इतरत्र जाऊ न देता गाव परिसरातील आश्रम शाळांमध्येच शिकविण्याचा निर्धार केला. याबाबत जनजागृती करण्याचा ठरावदेखील घेण्यात आला. २० पेक्षा कमी पटसंख्या असल्याने तालुक्यातील ८१ शाळा बंद करण्याचा निर्णय झाला होता. परिणामी विद्यार्थ्यांचे स्थलांतर थांबविण्यासाठी पंचायत समितीमध्ये एका विशेष बैठकीचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. या बैठकीत हा ठराव पारित करण्यात आला. बैठकीला पंचायत समिती सभापती कविता काळे, वासंती मंगरोळे, उपसभापती नानकराम ठाकरे, काँग्रेसचे मिश्रीलाल झाडखंडे, दयाराम काळे, अविनाश मेटकर, बीडीओ एन.टी.देसले, गटशिक्षणाधिकारी मोहने, सीडीपीओ विलास दुर्ग यांच्यासह २२४ नगरसेवक, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिकांची लक्षणीय उपस्थिती होती. राज्यभरातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कायम ठेवण्यासाठी मेळघाटमधील धारणी व चिखलदरा तालुक्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पळवापळवी केली जाते. अशा स्थितीत गावातील प्रत्येक कर्मचाऱ्यासह शाळा व्यवस्थापन समित्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याचा शाळा प्रवेश गावातच व्हावा, यासाठी प्रयत्न करण्याचे सुचविले. जनजागृती आणि विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करीत संबंधित मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचा शतप्रतिशत प्रवेश करून द्यावा, असेही सूचविण्यात आले. यासाठी गृहभेटी, दिंडी, बालक-पालक सभा घेण्याचा ठरावही झाला.नेत्यांच्या शाळांवर गंडांतरराज्यभर शिक्षणाची दुकानदारी उघडून बसलेल्या नेत्यांच्या शाळांवरही आता गंडांतर आले आहे. आदिवासी विभागाच्या नियमानुसार एका प्रकल्पातून दुसऱ्या प्रकल्पात विद्यार्थ्यांना नेता येत नाही. मात्र, हा नियम दरवर्षी पायदळी तुडविला जातोे. आदिवासी विभागाचा निधी लाटण्यासाठी विद्यार्थ्यांना पळविले जाते. यामुळे मेळघाटातील आश्रमशाळा ओस पडल्याचे चित्र असते. यानंतरही प्रकल्प कार्यालय, आदिवासी आयुक्तांकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. याबाबतचे वृत्त सातत्याने ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर अखेर पंचायत समितीमध्ये बैठक बोलविण्यात आली. १११ शाळा डिजिटल, ८१ शाळांना धोकातालुक्यात जिल्हा परिषद अंतर्गत १६९ शाळा स्थापित करण्यात आल्या असून त्यापैकी १११ शाळा डिजिटल झाल्या आहेत. तेथे अत्याधुनिक शैक्षणिक साहित्यांद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण मिळते. या शाळांचा आदिवासींमध्ये प्रचार करीत बाहेरच्या शाळांपेक्षा येथील शिक्षणाचा दर्जा उत्तम असल्याचे आदिवासींना पटवून देण्यात यावे, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. मात्र, सोबतच कमी पटसंख्येच्या ८१ शाळा बंद करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. तुर्तास हा निर्णय रोखण्यात आला आहे. या शाळांची पटसंख्या वाढवून शाळा कायमस्वरूपी बंद होण्यापासून वाचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांना येथीलच आश्रमशाळा, खासगी संस्थांद्वारे संचालित शाळांमध्ये शिक्षण मिळावे व त्यांचे स्थलांतरण थांबावे. विद्यार्थ्यांच्या पळवापळवीचा मुद्दा गंभीर आहे. त्यामुळे आदिवासींमध्ये जनजागृती मोहीम सुरू केली जाईल.- वासंती मंगरोळे, सदस्य जिल्हा परिषद, चिखली सर्कल