शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 13:00 IST

Amravati : आदिवासी पालकांची चिंता, आमच्या मुलांनी शिकू नये का?

नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : अकरावीची केंद्रीय प्रवेशप्रक्रिया थेट मेळघाटसारख्या अतिदुर्गम आदिवासी भागात लागू केल्याने आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती पालकांनी वर्तवली आहे.

दहावीनंतर शिक्षण घेणे आर्थिकदृष्ट्वा शक्य नसल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणातून गळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. इयत्ता अकरावीसाठी प्रवेशाची यादी नुकतीच जाहीर झाली. त्यामध्ये अल्प प्रमाणात आदिवासी व ग्रामीण विद्यार्थ्यांचा प्रवेश यादीत समावेश झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. अकरावीची केंद्रीय प्रवेशप्रक्रिया आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अधोगतीला कारणीभूत ठरणार, अशी शंका उपस्थित केली जात आहे. 

१०%  केवळ इनहाउस कोटामेळघाटसह आदिवासी व ग्रामीण विद्यार्थी हा इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत एकाच शाळेत शिकतो. कनिष्ठ महाविद्यालयाला जोडून इयत्ता दहावीचा वर्ग असेल तर थेट प्रवेशासाठी कोटा केवळ १० टक्के आहे. अर्थात ६० च्या तुकडीतील सहा विद्यार्थ्यांचेच येथे प्रवेश होतील. उर्वरित ५४ विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर इतरत्र शिकायला जावे लागणार आहे. मेळघाटातील आदिवासी पालकांची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने विद्यार्थी पुढील शिक्षणापासून वंचित राहण्याचीच शक्यता यामुळे वाढली आहे.

उच्च शिक्षितही रोहयोच्या कामावरदहावीच्या पुढे शिक्षण घेण्यात अपयशी ठरलेले मेळघाटातील आदिवासी युवक महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील (रोहयो) मजुरीच्या कामावर जात असल्याचे वास्तवही प्रशासनाच्या हजेरी पत्रकातून समोर आले आहे.

बाहेरगावी पाठविणे अशक्यकेंद्रीय पद्धतीनुसार गुणवत्तेवर आधारित अकरावीसाठी प्रवेशनिश्चिती असल्यामुळे बाहेरगावी मुलांना पाठविणे पालकांना आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. मेळघाटसारख्या भागात आजही ये-जा करण्यासाठी एसटी बस, वाहन नाही. मुला-मुलींना पाठवायचे कसे, याचा विचार केला का, असा प्रश्न पालक तथा माजी सभापती बन्सी जामकर यांनी केला आहे.

टॅग्स :ChikhaldaraचिखलदराAmravatiअमरावतीTrible Development Schemeआदिवासी विकास योजना