शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
2
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
3
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
4
Crime: प्रेयसीनं संबंध तोडल्यानं भडकला प्रियकर, घरात घुसून तिच्यावर झाडल्या गोळ्या!
5
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
6
सफला एकादशी २०२५: सफला एकादशीचा गुप्त उपाय! कागदावर ३ इच्छा लिहा, २०२६ ला इच्छापूर्तीचा अनुभव घ्या!
7
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
8
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
9
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
10
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
11
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
12
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
13
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
14
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
15
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
16
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
17
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
18
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
19
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
20
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 13:00 IST

Amravati : आदिवासी पालकांची चिंता, आमच्या मुलांनी शिकू नये का?

नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : अकरावीची केंद्रीय प्रवेशप्रक्रिया थेट मेळघाटसारख्या अतिदुर्गम आदिवासी भागात लागू केल्याने आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती पालकांनी वर्तवली आहे.

दहावीनंतर शिक्षण घेणे आर्थिकदृष्ट्वा शक्य नसल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणातून गळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. इयत्ता अकरावीसाठी प्रवेशाची यादी नुकतीच जाहीर झाली. त्यामध्ये अल्प प्रमाणात आदिवासी व ग्रामीण विद्यार्थ्यांचा प्रवेश यादीत समावेश झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. अकरावीची केंद्रीय प्रवेशप्रक्रिया आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अधोगतीला कारणीभूत ठरणार, अशी शंका उपस्थित केली जात आहे. 

१०%  केवळ इनहाउस कोटामेळघाटसह आदिवासी व ग्रामीण विद्यार्थी हा इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत एकाच शाळेत शिकतो. कनिष्ठ महाविद्यालयाला जोडून इयत्ता दहावीचा वर्ग असेल तर थेट प्रवेशासाठी कोटा केवळ १० टक्के आहे. अर्थात ६० च्या तुकडीतील सहा विद्यार्थ्यांचेच येथे प्रवेश होतील. उर्वरित ५४ विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर इतरत्र शिकायला जावे लागणार आहे. मेळघाटातील आदिवासी पालकांची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने विद्यार्थी पुढील शिक्षणापासून वंचित राहण्याचीच शक्यता यामुळे वाढली आहे.

उच्च शिक्षितही रोहयोच्या कामावरदहावीच्या पुढे शिक्षण घेण्यात अपयशी ठरलेले मेळघाटातील आदिवासी युवक महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील (रोहयो) मजुरीच्या कामावर जात असल्याचे वास्तवही प्रशासनाच्या हजेरी पत्रकातून समोर आले आहे.

बाहेरगावी पाठविणे अशक्यकेंद्रीय पद्धतीनुसार गुणवत्तेवर आधारित अकरावीसाठी प्रवेशनिश्चिती असल्यामुळे बाहेरगावी मुलांना पाठविणे पालकांना आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. मेळघाटसारख्या भागात आजही ये-जा करण्यासाठी एसटी बस, वाहन नाही. मुला-मुलींना पाठवायचे कसे, याचा विचार केला का, असा प्रश्न पालक तथा माजी सभापती बन्सी जामकर यांनी केला आहे.

टॅग्स :ChikhaldaraचिखलदराAmravatiअमरावतीTrible Development Schemeआदिवासी विकास योजना