शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे तब्बल ९४४ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 07:30 IST

Amravati News ¯ कृषी ग्राहक वगळून इतर सर्व वर्गवारीतील अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे तब्बल ९४४ कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती गंभीर होत चालली आहे.

ठळक मुद्दे महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर

संजय ताकसांडे 

अमरावती : कृषी ग्राहक वगळून इतर सर्व वर्गवारीतील अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील वीज ग्राहकांकडे तब्बल ९४४ कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती गंभीर होत चालली आहे. वीज ग्राहकांकडून थकीत वीज बिलाच्या वसुलीशिवाय तरणोपाय नसून तातडीने वसुली करावी, असे निर्देश महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी दिले. त्यानी सोमवारी ‘प्रकाश सरिता’ सभागृहात अमरावती परिमंडळाच्या आढावा बैठक घेतली.

वीज ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटच्या बिलांची वसुली होणे आवश्यक आहे. अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील वीज बिलांची थकबाकी ९४४ कोटींवर गेली आहे. महावितरणवर सद्यस्थितीत वीज बिलांच्या थकबाकीचे मोठे ओझे असल्याने वीजखरेदी, विविध योजनांच्या कर्जांचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर खर्चांसाठी कर्ज घ्यावे लागत आहे. मात्र त्याचीही मर्यादा आता संपत आलेली आहे. अशा स्थितीत ग्राहकांकडे असलेली संपूर्ण थकबाकी वसुलीशिवाय अन्य कोणताही मार्ग, परिस्थितीची वीजग्राहकांना माहिती देण्यात यावी. सोबतच ग्राहक सेवा व वीज बिल वसुलीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. अधिकाऱ्यांकडून कोणताही कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही, असे ताकसांडे यांनी स्पष्ट केले. बैठकीला मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ६४४ कोटींची थकबाकी

कृषी ग्राहक वगळून इतर सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे अमरावती जिल्ह्यात ३२० कोटी, तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये ६४४ कोटी अशी एकूण ९४४ कोटी रुपयांच्या वीज बिलांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे २२१ कोटी, पथदिवे ६१८ कोटी, पाणीपुरवठा योजना ९६ कोटी, तर इतर ग्राहकांकडे आठ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

टॅग्स :electricityवीज