शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

९१९ उमेदवारांनी ओलांडला पहिला टप्पा

By admin | Updated: March 31, 2016 00:21 IST

शहर, ग्रामीण व एसआरपीएफ पोलीस भरती प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी ९१९ तरुणांनी शारीरिक चाचणीचा पहिला टप्पा ओलांडला.

पोलीस भरती प्रक्रिया : दुसऱ्या दिवशी १ हजार ८८४ उमेदवारांची चाचणी अमरावती : शहर, ग्रामीण व एसआरपीएफ पोलीस भरती प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी ९१९ तरुणांनी शारीरिक चाचणीचा पहिला टप्पा ओलांडला. बुधवारी पोलीस भरतीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा १ हजार ८८४ उमेदवारांना बोलाविण्यात आले असून त्यांच्या अन्य चाचण्या होणार आहे. अमरावती शहर पोलीस ३१, ग्रामीणचे २७ तर एसआरपीएफमधील ४० जागेच्या पोलीस भरतीसाठी तब्बल ७ हजार ५७२ उमेदवारांचे अर्ज पोलीस विभागाकडे प्राप्त झाले होते. मंगळवारपासून पोलीस मुख्यालय, जोग स्टेडीअम व एसआरपीएफ कॅम्प येथील प्रांगणात भरती प्रक्रिया सुरु झाली. त्यामध्ये तिन्ही पोलीस विभागामार्फत दररोज ५०० ते ८५० उमेदवारांना विविध चाचण्यासाठी बोलाविण्यात आले. त्यामध्ये शहर पोलीस विभागाने पहिल्या दिवशी ८५० उमेदवारांना बोलाविले होते. त्यापैकी ६४५ उमेदवार हजर राहिले. व २०५ गैरहजर होते. पोलिसांनी ६४५ उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली त्यामध्ये ८९ उमेदवार अपात्र ठरले. पात्र ठरलेल्या ५५६ उमेदवारांची उंची व छातीची मोजमाज करण्यात आली. यात ४४५ उमेदवार पात्र व १११ उमेदवार अपात्र ठरले. या पात्र उमेदवारांची दौड चाचणी घेण्यात आली असता त्यामध्ये ३६८ उमेदवार पात्र तर ७७ उमेदवार अपात्र ठरले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण पोलिसांनी ७०० उमेदवारांना बोलाविले असता ५२२ उमेदवार उपस्थित राहिले. यात ३३३ उमेदवार कागदपत्रांच्या पडताळणीत पात्र ठरले. पात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली असता या चाचणीत २४२ उमेदवार पात्र ठरले असून ९६ उमेदवार अपात्र ठरले. त्याचप्रमाणे एसआरपीएफच्या भरतीप्रक्रियेत ५०० उमेदवारांना बोलाविण्यात आले होते. त्यापैकी ३९८ उमेदवारांनी उपस्थित दर्शविली असून त्यांपैकी ३०९ उमेदवार चाचणीत पात्र ठरले आहेत. पोलीस भरतीचा मंगळवारी पहिला दिवशी पोलीस विभागामार्फत विविध सुविधा करून या चाचण्या घेण्यात आल्या असून बुधवारी सुध्दा १ हजार ८८४ उमेदवारांना चाचणीसाठी बोलाविण्यात आले आहे. पोलीस भरतीचे नियोजन असल्याने उमेदवारांची तारांबळ उडाली नाही.दौड चाचणीच्या वेळी उमेदवारांची गैरसोयपोलीस आयुक्तांनी शहर पोलीस भरती प्रक्रियेत पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात उमेदवारांसाठी विशेष सोयी केल्या आहेत. सावलीसाठी मंडप, नास्ता, ज्युस व पाण्याचे स्टॉल लावण्यात आल्याने उमेदवाराना सोयीचे झाले आहे. मात्र, या उमेदवारांची १६०० मिटर दौड चाचणी ही जिल्हा स्टेडिअमच्या मैदानात असल्यामुळे तेथे उमेदवारांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक उमेदवारांची पाण्यासाठी भटंकती सुरु असल्याचे दिसून आले.