शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

९१९ उमेदवारांनी ओलांडला पहिला टप्पा

By admin | Updated: March 31, 2016 00:21 IST

शहर, ग्रामीण व एसआरपीएफ पोलीस भरती प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी ९१९ तरुणांनी शारीरिक चाचणीचा पहिला टप्पा ओलांडला.

पोलीस भरती प्रक्रिया : दुसऱ्या दिवशी १ हजार ८८४ उमेदवारांची चाचणी अमरावती : शहर, ग्रामीण व एसआरपीएफ पोलीस भरती प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी ९१९ तरुणांनी शारीरिक चाचणीचा पहिला टप्पा ओलांडला. बुधवारी पोलीस भरतीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा १ हजार ८८४ उमेदवारांना बोलाविण्यात आले असून त्यांच्या अन्य चाचण्या होणार आहे. अमरावती शहर पोलीस ३१, ग्रामीणचे २७ तर एसआरपीएफमधील ४० जागेच्या पोलीस भरतीसाठी तब्बल ७ हजार ५७२ उमेदवारांचे अर्ज पोलीस विभागाकडे प्राप्त झाले होते. मंगळवारपासून पोलीस मुख्यालय, जोग स्टेडीअम व एसआरपीएफ कॅम्प येथील प्रांगणात भरती प्रक्रिया सुरु झाली. त्यामध्ये तिन्ही पोलीस विभागामार्फत दररोज ५०० ते ८५० उमेदवारांना विविध चाचण्यासाठी बोलाविण्यात आले. त्यामध्ये शहर पोलीस विभागाने पहिल्या दिवशी ८५० उमेदवारांना बोलाविले होते. त्यापैकी ६४५ उमेदवार हजर राहिले. व २०५ गैरहजर होते. पोलिसांनी ६४५ उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली त्यामध्ये ८९ उमेदवार अपात्र ठरले. पात्र ठरलेल्या ५५६ उमेदवारांची उंची व छातीची मोजमाज करण्यात आली. यात ४४५ उमेदवार पात्र व १११ उमेदवार अपात्र ठरले. या पात्र उमेदवारांची दौड चाचणी घेण्यात आली असता त्यामध्ये ३६८ उमेदवार पात्र तर ७७ उमेदवार अपात्र ठरले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण पोलिसांनी ७०० उमेदवारांना बोलाविले असता ५२२ उमेदवार उपस्थित राहिले. यात ३३३ उमेदवार कागदपत्रांच्या पडताळणीत पात्र ठरले. पात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली असता या चाचणीत २४२ उमेदवार पात्र ठरले असून ९६ उमेदवार अपात्र ठरले. त्याचप्रमाणे एसआरपीएफच्या भरतीप्रक्रियेत ५०० उमेदवारांना बोलाविण्यात आले होते. त्यापैकी ३९८ उमेदवारांनी उपस्थित दर्शविली असून त्यांपैकी ३०९ उमेदवार चाचणीत पात्र ठरले आहेत. पोलीस भरतीचा मंगळवारी पहिला दिवशी पोलीस विभागामार्फत विविध सुविधा करून या चाचण्या घेण्यात आल्या असून बुधवारी सुध्दा १ हजार ८८४ उमेदवारांना चाचणीसाठी बोलाविण्यात आले आहे. पोलीस भरतीचे नियोजन असल्याने उमेदवारांची तारांबळ उडाली नाही.दौड चाचणीच्या वेळी उमेदवारांची गैरसोयपोलीस आयुक्तांनी शहर पोलीस भरती प्रक्रियेत पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात उमेदवारांसाठी विशेष सोयी केल्या आहेत. सावलीसाठी मंडप, नास्ता, ज्युस व पाण्याचे स्टॉल लावण्यात आल्याने उमेदवाराना सोयीचे झाले आहे. मात्र, या उमेदवारांची १६०० मिटर दौड चाचणी ही जिल्हा स्टेडिअमच्या मैदानात असल्यामुळे तेथे उमेदवारांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक उमेदवारांची पाण्यासाठी भटंकती सुरु असल्याचे दिसून आले.