शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

संरक्षित ९६ कोटी, भरपाई १५ कोटीच

By admin | Updated: March 13, 2015 00:19 IST

खरीप २०१४ च्या हंगामात अपुऱ्या पावसामुळे सोयाबीन, कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पीक विम्याचा हप्ता भरणाऱ्या शेतकऱ्यांना या हप्त्याच्या कित्येकपट कमी भरपाई मिळाली.

गजानन मोहोड अमरावतीखरीप २०१४ च्या हंगामात अपुऱ्या पावसामुळे सोयाबीन, कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पीक विम्याचा हप्ता भरणाऱ्या शेतकऱ्यांना या हप्त्याच्या कित्येकपट कमी भरपाई मिळाली. जिल्ह्यात अधिसूचित पिकाकरिता ३७ हजार ९३३ शेतकऱ्यांनी ४७४३०.९९४ हेक्टर क्षेत्राच्या विम्याकरिता ९०८.८७ लाखांचा भरणा करून ९६२८.१६ लाख विम्याचे संरक्षण केले. प्रत्यक्षात विम्याची भरपाई ही १५२४.२६ लाख रूपये इतकी देण्यात येत आहे. अपुरा पाऊस, पावसातील खंड व अतिपाऊस या तीन हवामान घटकांच्या धोक्यापासून पिकांना संरक्षण देणारी हवामान आधारित पीकविमा योजना खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन व कापूस या पिकासाठी पथदर्शक स्वरुपात राबविण्यात आली. पिकांच्या नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हा त्यामागचा उद्देश होता. विविध वित्तीय संस्थांकडून अधिसूचित पिकासाठी पीककर्ज घेणाऱ्या सर्व कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची करण्यात आली. बिगर कर्जदार क्षेत्रासाठी ऐच्छिक होती.