शहरं
Join us  
Trending Stories
1
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
2
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
3
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
4
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
5
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
6
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
7
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
8
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
9
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
10
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
11
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
12
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
13
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
14
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
15
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
16
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
17
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
18
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
19
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
20
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा

८६० घरांच्या उभारणीचा मार्ग प्रशस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:12 IST

पीएम आवास योजनेतील घटक क्र. ३ अंतर्गत ८६० घरांसाठी अवलंबविलेली निविदा प्रक्रिया दोन महिन्यांनंतर अंतिम टप्प्यावर पोहोचली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ‘फायनान्शियल’ बिड उघडल्यानंतर ही घरे कुठली कंपनी बांधणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

ठळक मुद्देपीएम आवास योजना : आठवड्यात प्रक्रिया अंतिम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पीएम आवास योजनेतील घटक क्र. ३ अंतर्गत ८६० घरांसाठी अवलंबविलेली निविदा प्रक्रिया दोन महिन्यांनंतर अंतिम टप्प्यावर पोहोचली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ‘फायनान्शियल’ बिड उघडल्यानंतर ही घरे कुठली कंपनी बांधणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे.आयुक्त हेमंत पवार हे २८ मार्चला रुजू झाले असले तरी फायनान्शियल लिफाफा उघडण्यासाठी त्यांच्याच स्वाक्षरीची आवश्यकता होती. त्यांची स्वाक्षरी आणि त्यानंतर होणारी तांत्रिक समितीची बैठक व त्यात टेक्निकल बिडमध्ये पात्र मुंबईची ‘गॅनान’कंपनी फायनान्शियलमध्ये पात्र ठरते का, यावर ८६० घरांच्या विनाविलंब उभारणीची मदार अवलंबून आहे.प्रभारी अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार आणि शहरस्तरीय पीएम तांत्रिक कक्षाने निविदेप्रक्रियेदरम्यान आलेल्या दोन निविदांपैकी गॅनॉन डंकले अँड कं.लि., मुंबईची निविदा तांत्रिक बिडमध्ये पात्र ठरविली आहे. स्थानिक नीलेश असोसिएशनची निविदा अपात्र ठरविण्यात आली. ४ जानेवारीला बिड उघडल्यानंतर तब्बल अडीच महिन्यानंतर या योजनेच्या कर्त्याधर्त्यांना तांत्रिक बिडचा तिढा सोडविणे शक्य झाले. मात्र, तांत्रिक तपासणी करुन निविदा ग्राह्य धरण्यास किंवा पात्र ठरविण्यासाठी यंत्रणेला अडीच महिन्यापासून अधिक काळ का लागला, हे मात्र गुलदस्त्यात आहे. आता आयुक्त पवार रजेवरून परतल्यानंतर त्यांनीच हा गुंता सोडवावा आणि ८६० घरांच्या उभारणीसाठी पात्र असलेली कंपनी निवडून प्रत्यक्ष कार्यासाठी ‘कार्यारंभ आदेश’ द्यावेत, अशी अपेक्षा लाभार्थींनी व्यक्त केली आहे. दरम्यान घटक क्रमांक ४ अंतर्गत १४ लाभार्थींना अनुदानाचा पहिला टप्पा देण्यात आला आहे.लाभार्थी चिंतेतकेंद्र व राज्य सरकारने ८६० घरांच्या उभारणीवर केव्हाचेच शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, अमरावती महापालिकेला निविदा प्रक्रियेला झालेला उशीर, त्यात या प्रक्रियेकडे निविदाधारकांनी फिरविलेली पाठ, तीनदा निविदा कॉल केल्यानंतर प्राप्त झालेल्या केवळ दोन निविदा यात ही प्रक्रिया अडकली. मात्र, ४९ हजार रुपये आगाऊ भरून घरांची स्वप्न पाहणारे लाभार्थी मात्र त्या लेटलतिफीने गॅसवर आलेत. अनेकांनी तर ती रक्कम महाकपालिकेकडून परत घेतली आहे. महापालिका प्रशासनावर बहुतेक लाभार्थ्यांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे आयुक्तांनीच यातून मार्ग काढणे अभिप्रेत आहे.