शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

सिंचन प्रकल्पात ८५ टक्के जलसाठा

By admin | Updated: November 19, 2014 22:32 IST

वरुड तालुक्यात यंदा दरवर्षीच्या तुलनेत अत्यल्प पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे येत्या उन्हाळ्यात तालुक्यात भीषण पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता असल्याचे सिंचन विभागाने म्हटले आहे.

संजय खासबागे - वरुडवरुड तालुक्यात यंदा दरवर्षीच्या तुलनेत अत्यल्प पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे येत्या उन्हाळ्यात तालुक्यात भीषण पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता असल्याचे सिंचन विभागाने म्हटले आहे. तालुक्यात ९ प्रकल्प असून यावर्षी पावसाळ्यात १०० टक्के ेजलसाठा संचयित झाला होता. परंतु आॅगष्टनंतरच पावसाने दडी मारल्याने जानेवारीपर्यंत वाहणाऱ्या नद्यांचा प्रवाहसुध्दा खंडित झाला आहे. पाणी वापर संस्थांनी पिकांना पाणी सोडण्यासाठी मागणी केली आहे. नोव्हेंबरमध्ये सिंचन प्रकल्पात केवळ ८५ टक्के जलसाठा होता. शेकदरी प्रकल्प व पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेकदरी प्रकल्पाची पूर्ण जलसंचय क्षमता ५१४.६५ मीटर आहे. ओलीत क्षमता १ हजार ३४० हेक्टर, पुसली प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता १००.६० मीटर असून ओलीत क्षमता ३०९ हेक्टर, वाई प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता ४६१.७७ मीटर आहे. ओलीत क्षमता ३७० हेक्टरची आहे. सातनूर प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता ५००.७५ मीटर तर ओलीत क्षमता २९९ हेक्टर, पंढरी प्रकल्पात जल संचय क्षमता ४४८.३० मीटर तर ओलीत क्षमता १५३ हेक्टर, जामगांव प्रकल्पामध्ये पूर्ण जल संचय क्षमता ४८०.५० मीटर आहे. ओलीत क्षमता १२१ हेक्टर, नागठाणा प्रकल्पात जल संचय क्षमता ४८१.६० मीटर आहे. ओलीत क्षमता २१२ हेक्टर ,जमालपूर प्रकल्पाची ओलीत क्षमता १२२ हेक्टर ,बेलसावंगी प्रकल्पात १०४.१० मिटर जलसाठा असून ओलीत क्षमता १२१ हेक्टरची आहे. लोणी धवलगिरी प्रकल्पाची ओलीत क्षमता ६३६ हेक्टरची आहे आहे तर वघाळ बंधारा असून ओलीत क्षमता ४९६ हेक्टर आहे. परंतु यंदा झालेल्या अत्यल्प पावसाळ्यामुळे प्रकल्प उन्हाळ्याच्या दिवसांत कोरडे पडण्याची दाट शक्यता सध्याच्या परिस्थितीवरुन दिसून येत आहे. त्यामुळे पाणीटंचाई जाणवेल.