शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

८३८ ग्रामपंचायती ‘आयएसओ’मध्ये ढांग

By admin | Updated: March 31, 2016 00:26 IST

गावांचा लूक बदलविण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा कमी पडली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील ८३९ ग्रामपंचायतींपैकी केवळ एकाच ग्रामपंचायतीला ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त असल्याची माहिती आहे.

अमरावती : गावांचा लूक बदलविण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा कमी पडली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील ८३९ ग्रामपंचायतींपैकी केवळ एकाच ग्रामपंचायतीला ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त असल्याची माहिती आहे. त्यामुळे उर्वरित ग्रामपंचायतींना ‘आयएसओ’ दर्जा मिळवून देण्यासाठी झेडपीला नियोजन करावे लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. गुणवत्तेसोबतच दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या काही शाळांना ‘आयएसओ’ दर्जा मिळवून दिला आहे. यासाठी काही शिक्षकांनी अधीक्षकांच्या माध्यमातून पुढाकार घेतला होता. स्मार्ट सिटी उपक्रमाच्या धर्तीवर आता गावांनाही वेगळा लुक देण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे. राज्यातील अनेक ग्रामपंचायतींनी ‘आयएसओ’ मानांकन मिळविले आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने ग्रापं कार्यालय अद्ययावत करणे, गावात सर्व सोयी उपलब्ध करुन देणे, पाणी, दिवाबत्ती, दर्जेदार रस्ते, रंगरंगोटी, सुसज्ज संग्राम कक्ष, आॅनलाईन आणि पारदर्शक कामकाज, पथदिवे, गावात स्वच्छता, वैयक्तिक शौचालय, सांडपाणी व्यवस्थापन, वृक्षारोपण, स्वच्छ शाळा, अंगणवाडी, मुलांसाठी क्रीडांगणे, समाजपयोगी उपक्रम तसेच शासकीय योजनांचा लाभ देणे, जनजागृती, लोकप्रबोधनासंदर्भात गावातील दर्शनी भागात फलक लावणे आदी सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायतींमध्ये अशा मूलभूत सुविधांची वानवा असल्याने जिल्हाभरातील ८३९ ग्रामपंचायतींपैकी केवळी एक ग्रामपंचायत ‘आयएसओ’ दर्जा प्राप्त करू शकली आहे. ग्रामीण भागाच्या उत्कर्षाकरिता ग्रामपंचायतींची संख्या वाढणे गरजेचे आहे.