शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

८३८ ग्रामपंचायती ‘आयएसओ’मध्ये ढांग

By admin | Updated: March 31, 2016 00:26 IST

गावांचा लूक बदलविण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा कमी पडली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील ८३९ ग्रामपंचायतींपैकी केवळ एकाच ग्रामपंचायतीला ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त असल्याची माहिती आहे.

अमरावती : गावांचा लूक बदलविण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा कमी पडली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील ८३९ ग्रामपंचायतींपैकी केवळ एकाच ग्रामपंचायतीला ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त असल्याची माहिती आहे. त्यामुळे उर्वरित ग्रामपंचायतींना ‘आयएसओ’ दर्जा मिळवून देण्यासाठी झेडपीला नियोजन करावे लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. गुणवत्तेसोबतच दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या काही शाळांना ‘आयएसओ’ दर्जा मिळवून दिला आहे. यासाठी काही शिक्षकांनी अधीक्षकांच्या माध्यमातून पुढाकार घेतला होता. स्मार्ट सिटी उपक्रमाच्या धर्तीवर आता गावांनाही वेगळा लुक देण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे. राज्यातील अनेक ग्रामपंचायतींनी ‘आयएसओ’ मानांकन मिळविले आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने ग्रापं कार्यालय अद्ययावत करणे, गावात सर्व सोयी उपलब्ध करुन देणे, पाणी, दिवाबत्ती, दर्जेदार रस्ते, रंगरंगोटी, सुसज्ज संग्राम कक्ष, आॅनलाईन आणि पारदर्शक कामकाज, पथदिवे, गावात स्वच्छता, वैयक्तिक शौचालय, सांडपाणी व्यवस्थापन, वृक्षारोपण, स्वच्छ शाळा, अंगणवाडी, मुलांसाठी क्रीडांगणे, समाजपयोगी उपक्रम तसेच शासकीय योजनांचा लाभ देणे, जनजागृती, लोकप्रबोधनासंदर्भात गावातील दर्शनी भागात फलक लावणे आदी सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायतींमध्ये अशा मूलभूत सुविधांची वानवा असल्याने जिल्हाभरातील ८३९ ग्रामपंचायतींपैकी केवळी एक ग्रामपंचायत ‘आयएसओ’ दर्जा प्राप्त करू शकली आहे. ग्रामीण भागाच्या उत्कर्षाकरिता ग्रामपंचायतींची संख्या वाढणे गरजेचे आहे.