शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

८३८ ग्रामपंचायती ‘आयएसओ’मध्ये ढांग

By admin | Updated: March 31, 2016 00:26 IST

गावांचा लूक बदलविण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा कमी पडली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील ८३९ ग्रामपंचायतींपैकी केवळ एकाच ग्रामपंचायतीला ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त असल्याची माहिती आहे.

अमरावती : गावांचा लूक बदलविण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा कमी पडली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील ८३९ ग्रामपंचायतींपैकी केवळ एकाच ग्रामपंचायतीला ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त असल्याची माहिती आहे. त्यामुळे उर्वरित ग्रामपंचायतींना ‘आयएसओ’ दर्जा मिळवून देण्यासाठी झेडपीला नियोजन करावे लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. गुणवत्तेसोबतच दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या काही शाळांना ‘आयएसओ’ दर्जा मिळवून दिला आहे. यासाठी काही शिक्षकांनी अधीक्षकांच्या माध्यमातून पुढाकार घेतला होता. स्मार्ट सिटी उपक्रमाच्या धर्तीवर आता गावांनाही वेगळा लुक देण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे. राज्यातील अनेक ग्रामपंचायतींनी ‘आयएसओ’ मानांकन मिळविले आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने ग्रापं कार्यालय अद्ययावत करणे, गावात सर्व सोयी उपलब्ध करुन देणे, पाणी, दिवाबत्ती, दर्जेदार रस्ते, रंगरंगोटी, सुसज्ज संग्राम कक्ष, आॅनलाईन आणि पारदर्शक कामकाज, पथदिवे, गावात स्वच्छता, वैयक्तिक शौचालय, सांडपाणी व्यवस्थापन, वृक्षारोपण, स्वच्छ शाळा, अंगणवाडी, मुलांसाठी क्रीडांगणे, समाजपयोगी उपक्रम तसेच शासकीय योजनांचा लाभ देणे, जनजागृती, लोकप्रबोधनासंदर्भात गावातील दर्शनी भागात फलक लावणे आदी सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायतींमध्ये अशा मूलभूत सुविधांची वानवा असल्याने जिल्हाभरातील ८३९ ग्रामपंचायतींपैकी केवळी एक ग्रामपंचायत ‘आयएसओ’ दर्जा प्राप्त करू शकली आहे. ग्रामीण भागाच्या उत्कर्षाकरिता ग्रामपंचायतींची संख्या वाढणे गरजेचे आहे.