शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत ८०० शिक्षकांच्या आपसी बदल्या

By admin | Updated: June 14, 2016 00:06 IST

काही वर्षांपासून जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया उशिरा का होईना मात्र शिक्षण विभागाने सुरू केली आहे.

दुसरा दिवस : रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत बदली प्रक्रियाअमरावती : काही वर्षांपासून जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया उशिरा का होईना मात्र शिक्षण विभागाने सुरू केली आहे. बदली प्रक्रियेच्या १३ जून या दुसऱ्या दिवशी शिक्षण विभागाने मेळघाटातील ८०० शिक्षकांच्या आपसी बदलीची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यात अनेक शिक्षकांनी सोईच्या ठिकाणी बदली व्हावी, यासाठी सायन्सस्कोअर शाळेत एकच गर्दी केली होती. यामध्ये भाषा शिक्षकांच्या २६ तर ३० उर्दू माध्यमाच्या बदल्याचा समावेश असल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या मागील काही वर्षांत विविध तांत्रिक कारणांमुळे रखडल्या होत्या. रविवार १२ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रशासकीय बदल्याची कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी एस.एम. पानझाडे यांच्या उपस्थितीत शिक्षकांच्या सोमवारी आपसी बदल्यांची समुपदेशनाव्दारे बदली प्रक्रिया राबविली. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. यामध्ये विषय शिक्षकांच्या २६ बदल्या करण्यात आल्या आहेत. यात मेळघाटातीन २६ शिक्षकांना सपाटीवर आणण्यात आले आहे. तेवढेच शिक्षक मेळघाटात पाठविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे बदली प्रक्रियेत आपसी बदल्यांची मागणी करणाऱ्या शिक्षकांची संख्या ३७४ एवढी आहे. याप्रमाणे दुप्पट शिक्षकांची संख्या लक्षात घेता हा आकडा ७४८ शिक्षकांचा बदल्यांमध्ये समावेश आहे. यात मराठी, उर्दू माध्यमाच्या शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय विज्ञान, भाषा, सामाजिक शास्त्र या विषय शिक्षकांच्या बदल्या झालेल्यांमध्ये समावेश आहे.यावेळी बदली प्रक्रियेत डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, शिक्षण विभागाचे अधीक्षक संजय राठी, पकंज गुल्हाने, तुषार पावडे, ऋषिकेश कोकाटे, श्याम देशमुख, अविनाश भगत, राजू झाकडे, दिनेश बांबल, सुनील सातपुते आदी कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.शिक्षण विभागाने राबविलेल्या बदली प्रक्रियेत मुख्यध्यापकांना डावलून केली जात आहे. याशिवाय केंद्रप्रमुखांवर या बदल्यांमध्ये अन्याय करण्यात आला आहे. ज्यांनी मेळघाटात सेवा दिली आहे, त्यांनाच पुन्हा मेळघाटात पाठविले आहे, हा अन्याय आहे. मेळघाटातील शिक्षक सपाटीवर आले पाहिजे, ही बाब चांगली आहे. मात्र शिक्षण विभागाची बदलीची प्रक्रिया ही योग्य वाटत नसल्याचे मत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील कुकडे यांनी व्यक्त केले. सलग दोन दिवस शिक्षकांच्या प्रशासकीय आपसी बदल्यांची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत राबविली गेली. मात्र अचानकच या सर्व प्रक्रियेला ग्रामविकास मंत्रालयाने स्थगिती दिली असल्यामुळे बदलीपात्र शिक्षकांचा मात्र ऐनवेळी हीरमोड झाला. त्यामुळे आता पुढील आदेशापर्यंत न्यायासाठी काही शिक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)