शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

जिल्हा परिषदेत ८०० शिक्षकांच्या आपसी बदल्या

By admin | Updated: June 14, 2016 00:06 IST

काही वर्षांपासून जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया उशिरा का होईना मात्र शिक्षण विभागाने सुरू केली आहे.

दुसरा दिवस : रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत बदली प्रक्रियाअमरावती : काही वर्षांपासून जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया उशिरा का होईना मात्र शिक्षण विभागाने सुरू केली आहे. बदली प्रक्रियेच्या १३ जून या दुसऱ्या दिवशी शिक्षण विभागाने मेळघाटातील ८०० शिक्षकांच्या आपसी बदलीची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यात अनेक शिक्षकांनी सोईच्या ठिकाणी बदली व्हावी, यासाठी सायन्सस्कोअर शाळेत एकच गर्दी केली होती. यामध्ये भाषा शिक्षकांच्या २६ तर ३० उर्दू माध्यमाच्या बदल्याचा समावेश असल्याचे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या मागील काही वर्षांत विविध तांत्रिक कारणांमुळे रखडल्या होत्या. रविवार १२ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रशासकीय बदल्याची कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी एस.एम. पानझाडे यांच्या उपस्थितीत शिक्षकांच्या सोमवारी आपसी बदल्यांची समुपदेशनाव्दारे बदली प्रक्रिया राबविली. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. यामध्ये विषय शिक्षकांच्या २६ बदल्या करण्यात आल्या आहेत. यात मेळघाटातीन २६ शिक्षकांना सपाटीवर आणण्यात आले आहे. तेवढेच शिक्षक मेळघाटात पाठविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे बदली प्रक्रियेत आपसी बदल्यांची मागणी करणाऱ्या शिक्षकांची संख्या ३७४ एवढी आहे. याप्रमाणे दुप्पट शिक्षकांची संख्या लक्षात घेता हा आकडा ७४८ शिक्षकांचा बदल्यांमध्ये समावेश आहे. यात मराठी, उर्दू माध्यमाच्या शिक्षकांचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय विज्ञान, भाषा, सामाजिक शास्त्र या विषय शिक्षकांच्या बदल्या झालेल्यांमध्ये समावेश आहे.यावेळी बदली प्रक्रियेत डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, शिक्षण विभागाचे अधीक्षक संजय राठी, पकंज गुल्हाने, तुषार पावडे, ऋषिकेश कोकाटे, श्याम देशमुख, अविनाश भगत, राजू झाकडे, दिनेश बांबल, सुनील सातपुते आदी कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.शिक्षण विभागाने राबविलेल्या बदली प्रक्रियेत मुख्यध्यापकांना डावलून केली जात आहे. याशिवाय केंद्रप्रमुखांवर या बदल्यांमध्ये अन्याय करण्यात आला आहे. ज्यांनी मेळघाटात सेवा दिली आहे, त्यांनाच पुन्हा मेळघाटात पाठविले आहे, हा अन्याय आहे. मेळघाटातील शिक्षक सपाटीवर आले पाहिजे, ही बाब चांगली आहे. मात्र शिक्षण विभागाची बदलीची प्रक्रिया ही योग्य वाटत नसल्याचे मत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील कुकडे यांनी व्यक्त केले. सलग दोन दिवस शिक्षकांच्या प्रशासकीय आपसी बदल्यांची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत राबविली गेली. मात्र अचानकच या सर्व प्रक्रियेला ग्रामविकास मंत्रालयाने स्थगिती दिली असल्यामुळे बदलीपात्र शिक्षकांचा मात्र ऐनवेळी हीरमोड झाला. त्यामुळे आता पुढील आदेशापर्यंत न्यायासाठी काही शिक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)