शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

पश्चिम विदर्भातील दुष्काळी २८ तालुक्यांना ८०० कोटींचा मदतनिधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 11:12 IST

यंदाच्या हंगामात दुष्काळाचा दुसरा 'ट्रिगर' लागलेल्या पश्चिम विदर्भातील २८ तालुक्यांत ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या सहा लाख ७२ हजार ६६३ हेक्टरला ‘एनडीआरएफ’ची ८०० कोटी ४१ लाखांची मदत मिळणार आहे.

ठळक मुद्दे३१७६ गावांमध्ये ७.८७ लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कगजानन मोहोडअमरावती : यंदाच्या हंगामात दुष्काळाचा दुसरा 'ट्रिगर' लागलेल्या पश्चिम विदर्भातील २८ तालुक्यांत ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या सहा लाख ७२ हजार ६६३ हेक्टरला ‘एनडीआरएफ’ची ८०० कोटी ४१ लाखांची मदत मिळणार आहे. आतापर्यंत ४७४ कोटी ३६ लाखांची मदत वितरित करण्यात आली, तर २२ फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्याचे ३२६ कोटी पाचही जिल्ह्यांना वितरित करण्यात आले. सद्यस्थितीत सहा लाख ८९ हजार ७२८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३४६ कोटी ९७ लाखांचा मदतनिधी जमा करण्यात आलेला आहे.दुष्काळ व्यवस्थापन संहिता-२०१६ च्या निकषानुसार विभागातील २८ तालुक्यांत दुष्काळाचा दुसरा 'ट्रिगर' लागल्याने शासनाने ३१ आॅक्टोबर २०१८ ला २८ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता. याच तालुक्यांना २५ जानेवारीला दुष्काळनिधीची मदत जाहीर केली. या सर्व तालुक्यांत पीक कापणी प्रयोगानंतर कृषी विभागाद्वारा सत्यापन करण्यात आले होते. त्यानुसार या सर्व तालुक्यांत ६,७२,६६३ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याने केंद्रीय आपदा निधीमधून ही मदत देण्यात येत आहे.कृषी विभागाच्या सत्यापनानुसार अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात ४२,९८८ हेक्टर, चिखलदरा २२,९७६, मोर्शी ५८८४९, वरूड ४९४१४, अंजनगाव सुर्जी ४१६९५, अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यात ४७३१, अकोला ३६४, तेल्हारा ५४५९, बाळापूर ६२९६, बार्सी टाकळी २३११ यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ तालुक्यात ६२.२९, बाभुळगाव ५९.९९, कळंब ८६.८६, राळेगाव ७८.८९, मारेगाव ९१.७७, केळापूर १३८.२३, दारव्हा ६४.७७, महागाव ७५.२२ व उमरखेड तालुक्यात ८०.४ हेक्टर बुलडाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्यात ५८७१४ हेक्टर, मलकापूर ४२३५७, खामगाव ७५३७०, शेगाव ४६७५३, नांदूरा ५०१०४, संग्रामपूर ४२७१४, लोणार ५२४२४, व सिंदखेडराजा ६४१०१ तसेच वाशिम जिल्ह्यात रिसोड तालुक्यात ४३०३.१९ हेक्टरसाठी ही मदत आहे.कमी पैसेवारीच्या ४७९१ गावांना डावललेदुष्काळाच्या नव्या संहितेनुसार शासनाने ३१ आॅक्टोबरला विभागातील २८ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. यामध्ये २००७ गावांत दुष्काळ स्थिती शासनाने जाहीर केली व आता एनडीआरएफचा मदतनिधी देखील वितरित केला. महसूल विभागाने ३१ डिसेंबरला खरिपाची अंतिम पैसेवारी जाहीर केली. यामध्ये जाहीर दुष्काळी गावे वगळता ४७९१ गावात ५० पेक्षा कमी पैसेवारी आहे. मात्र, या गावांना मदतनिधीत डावलण्यात आले, तर दुष्काळासंदर्भातील फक्त आठ सवलतींवर या गावांची बोळवण करण्यात आलेली आहे.असा मिळाला जिल्हानिहाय निधीअमरावती जिल्ह्यात ७३८ गावांतील १४९८५७ श्ेतकऱ्यांसाठी १८६ कोटी ३६ लाख, अकोला जिल्ह्यात ६२३ गावांतील १४९६१८ शेतकऱ्यांसाठी १३७ कोटी ६१ लाख, बुलडाणा जिल्ह्यातील ५९९ गावांतील १९८००६ शेतकऱ्यांसाठी १९९ कोटी ६५ लाख, यवतमाळ जिल्ह्यात १११६ गावांतील २३४४१८ श्ेतकऱ्यांसाठी २३२ कोटी ६७ लाख व वाशिम जिल्ह्यात १०० गावांतील ५५११५ श्ेतकऱ्यांसाठी ४४ कोटी १० लाखांचा निधी आतापर्यंत वितरित करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी