शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

८० ते १०० मि.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:10 IST

चांदूर बाजार : यावर्षी सोयाबीन बियाण्याची टंचाई पाहता, मान्सूनचा ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, ...

चांदूर बाजार : यावर्षी सोयाबीन बियाण्याची टंचाई पाहता, मान्सूनचा ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

देशाच्या उंबरठ्यावर मान्सूनचे आगमन झाले आहे. येत्या काही दिवसांत राज्यातही मान्सून बरसेल. परंतु, त्याआधी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस चांगलाच बरसत आहे. त्यामुळे काही ठिकाणी एखाददुसरा पाऊस आल्यास, शेतकरी पेरणीची घाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपूर्ण पावसावर पेरणी केल्यास त्यानंतर चार ते पाच दिवसांचा पावसाला विलंब झाल्यास, पेरणी उलटण्याची दाट शक्यता असते. अशावेळी दुबार पेरणीची शक्यता नाकारता येत नाही. ८० ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतर पेरणी केल्यास जमिनीत पुरेसा ओलावा असल्यामुळे पुढील पाच ते आठ दिवस पाऊस नसला तरी पेरलेले बियाणे निघून पिक तग धरू शकते. अशावेळी पेरणी उलटण्याची शक्यता अत्यल्प राहते. तरी शेतकऱ्यांनी पुढे पाऊस येईल, या आशेवर कमी पावसावर पेरणी करण्याची घाई करू नये. पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करणे योग्य ठरेल.

सध्या शेतकऱ्यांनी खरिपातील कापूस, सोयाबीन, तूर, भुईमूग, मका, उडीद,मूग ,यासह खरिपातील ईतर पिकांच्या पेरणीचे नियोजन करावे तसेच जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकांची निवड करावी. खरीपपूर्व मशागत झालेल्या शेतात मान्सूनपूर्व पाऊस झाल्यास, वखराच्या पाळ्या देऊन शेत खरीप पेरणीसाठी तयार करावे, असा सल्लाही कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.