शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पीककर्जाचे ७८ टक्केच वाटप

By admin | Updated: September 5, 2015 00:18 IST

जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात असताना पीककर्ज वाटपाचा टक्का अद्याप माघारला आहे.

रुपांतरण ८८ टक्के : सहकारी बँक माघारलीअमरावती : जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात असताना पीककर्ज वाटपाचा टक्का अद्याप माघारला आहे. जिल्ह्यात ३ सप्टेंबरपर्यंत सर्व बँकांनी ७८ टक्के खरिपाचे पीककर्ज वाटप केले आहे. गतवर्षीच्या कर्जाचे ८८ टक्के रुपांतरण झालेले आहे. यामध्ये व्यावसायिक बँकांनी ८४ टक्के पीककर्जाचे वाटप केले असताना जिल्हा सहकारी बँकेने मात्र ६५ टक्केच पीककर्जाचे वाटप केले आहे.जिल्हा बँकेला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अल्पमुदती कर्जाचे मध्यम कर्जात रुपांतरण केल्यानंतर अशा रुपांतरित कर्जाच्या ६० टक्के रक्कम नाबार्डमार्फत शासनाच्या हमीवर राज्य सहकारी बँकेस फेरकर्ज म्हणून मंजूर करण्याचे धोरण आहे. या अनुषंगाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस रुपांतरणाची १३२ कोटी २९ लाख १५ हजार रुपये नाबार्डच्या ६० टक्के कर्जास शासनाचे व ७ आॅगष्ट रोजी हमी घेतली आहे. जिल्हा बँकेस १९ कोटी ८४ लाख ३७ हजार रुपयांची रक्कम राज्य सहकारी बँकेच्या करारनाम्यानंतर देण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा बँकेस स्वत:च्या १० टक्के हिस्सा देऊन कर्जाचे रुपांतरण झालेल्या शेतकऱ्यांना ३१ आॅगस्टपर्यंत वाटप करण्याचे शासनादेश होते. ३ सप्टेंबरच्या लीड बँक व्यवस्थापकांच्या अहवालानुसार राष्ट्रीयीकृत बँकांनी २० हजार ८०२ शेतकरी खातेदारांच्या २१२ कोटी २२ लाख रुपयांच्या कर्जाचे रुपांतरण केले, ही ९३ टक्केवारी आहे. तसेच १ लाख १४ हजार ९५० शेतकऱ्यांना ११२२ कोटी ९८ लाखांचे पीककर्ज वाटपाचे टार्गेट असतांना १ लाख १३ हजार ६७ शेतकऱ्यांना ९४५ कोटी २१ लाख रुपयांचे कर्जवाटप केले हि टक्केवारी ८४ आहे. या तुलनेत जिल्हा सहकारी बँकेनी १९ हजार ४२२ शेतकऱ्यांना १४० कोटी ५० लाख रुपयांच्या कर्जाचे रुपांतरण केले हि टक्केवारी आहे. ४९ हजार ८२६ शेतकऱ्यांना ३६८ कोटी २२ लाखांचे कर्जवाटप केले, ही ६५ टक्केवारी आहे. या कर्जवाटपात जिल्हा सहकारी बँकेचा टक्का माघारला आहे.जिल्हा बँकेस सहकार आयुक्तांची फटकार जिल्ह्यात दुष्काळ स्थिती असतांना शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेले नाही व पिक कर्जाचे वाटप देखील इतर बँकाच्या तुलनेत कमी असल्याने सहकार विभागाचे प्रधान सचिव शैलेशकुमार शर्मा व सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले व बँकेच्या चौकशी करण्याचे आदेश दिलेत. औरंगाबादचे विभागीय सहनिबंधक चौकशी करुन शासनाला अहवाल सादर करणार आहे.