शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

पश्चिम विदर्भातील ५११ प्रकल्पांत ७७.२४ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:16 IST

संदीप मानकर, अमरावती : गेल्या तीन ते चार दिवसांपासून पश्चिम विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने ५११ सिंचन ...

संदीप मानकर, अमरावती : गेल्या तीन ते चार दिवसांपासून पश्चिम विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने ५११ सिंचन प्रकल्पात सरासरी ७७.२४ टक्के पाणीसाठा साचला आहे. अनेक मोठ्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नऊ मोठ्या प्रकल्पांत सरासरी ८४.१२ टक्के पाणीसाठा साचल्याने या महिन्यात कोसळणाऱ्या परतीच्या पावसात धरणे शंभर टक्के भरतील, असा विश्वास जलतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

२५ मध्यम, नऊ मोठे व ४७७ लघू अशा एकूण ५११ सिंचन प्रकल्पांची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा ३२८३.६० दलघमी आहे, तर आजचा उपयुक्त पाणीसाठा हा २५३६.११ दलघमी असून, त्याची सरासरी टक्केवारी ही ७७.२४ टक्के आहे. १० सप्टेंबरपर्यंत विदर्भातील सर्वच जिल्ह्यात चांगला पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्पातील आणखी पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे.

बॉक्स :

नऊ मोठ्या प्रकल्पांची स्थिती

जलसंपदा विभागाने दिलेल्या ५ सप्टेंबर रोजीच्या पाणीसाठ्याच्या अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ८६.१९ टक्के पाणीसाठा साचला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्प हा १०० टक्के भरला. या प्रकल्पातून ४४ सेंमीने पाण्याचा विसर्ग होत आहे. अरुणावती प्रकल्पात ९६.३३ टक्के, तर बेंबळा ८६.७५ टक्के पाणीसाठा साचला आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ९४.४४ टक्के, वान प्रकल्पात ८२.३९ टक्के पाणीसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात फक्त २७.४४ टक्के पाणीसाठा असून पेनटाकळी प्रकल्पात ४०.६९ टक्के साठा आहे. खडकपूर्णा प्रकल्पात ९०.६७ टक्के पाणीसाठा असून तीन गेट उघडण्यात आले आहेत. प्रकल्पातून १० सेंमीने पाण्याचा विसर्ग होत आहे.

बॉक्स :

आठ मध्यम प्रकल्पांनी गाठली शंभरी

विभागातील आठ मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले असून अनेक प्रकल्प शंभरीच्या वाटेवर आहेत. शंभर टक्के प्रकल्प भरणाऱ्यांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव, तर अकोला जिल्ह्यातील निर्गुणा, वाशिम जिल्ह्यातील एकबुर्जी, बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी व उतावली प्रकल्पाचा समावेश आहे.