शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

७७ कोटी जाणार परत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:14 IST

शासनाने अखर्चित निधी परत मागितल्यानंतर जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या ...

जिल्हा परिषदेत ४० कोटी जमा : विकास निधी नसल्याची वित्त सभापतींची स्पष्टोक्तीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने अखर्चित निधी परत मागितल्यानंतर जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या सन २०१० ते २०१५-१६ पर्यंतचा विविध विभागांतील ७७ कोटी ७ लाख ५६ हजार ६२२ रूपयांचा विकासकामांचा निधी शासनाकडे परत जाणार आहे. याशिवाय वेतनामधील २४ कोटी ७७ लाख १६ हजार ९८८ रूपये असा जवळपास एकूण ११० कोटींचा निधी शासनाला परत केला जाणार आहे. जो निधी शासनाकडे परत गेला तो निधी विकास कामांचा नसून वेतन आणि वेतन्नोत्तरमधील असल्याची स्पष्टोक्ती सभापती बळवंत वानखडे यांनी दिली. राज्य शासनाने ३० जून अखेर जिल्हा परिषदेकडे अखर्चितरित्या पडून असलेला निधीची माहिती मागविली होती. झेडपी प्रशासनाकडून झालेल्या पडताळणीत सर्व विभागाच्या हिशेब जुळवणीत ११० कोटीची रक्कम परत करावी लागणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध योजनांच्या खात्यात खडखडाट होण्याचे निश्चित झाले आहे. अखर्चित निधीपैकी ४० कोटी रूपये जमा केले आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील विकास कामांसाठी शासनाकडून दरवर्षी निधी दिला जातो. हा निधी ज्या वर्षात दिला जातो, त्या वर्षासह लगतच्या आर्थिक वर्षात खर्च करण्याची संधी दिली जाते; मात्र काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहतो.आता राज्य आर्थिक अडचणीत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विकास कामांसाठी दिलेला; मात्र अद्यापही अखर्चित असलेला निधी शासन परत घेणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सर्वच महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदांकडून जून २०१७ अखेर विकासकामांचा किती निधी अखर्चित आहे, याची माहिती शासनाने मागविली. शासनाच्या पत्रानुसार त्यानुसार जो निधी विहीत मुदतीत खर्च झाला नाही. असा मागील काही वर्षातील हा निधी शिल्लक होता.त्यामुळे तो परत गेला आहे. अर्धवट असलेली विकासकामे पूर्ण झाल्यानंतर निधी मिळणार आहे.आवश्यकतेनुसार उपलब्ध होणार निधीशासनाकडून ज्या योजनेसाठी निधी मिळाला तो निधी विहित मुदतीत खर्च झाला नाही तर प्रथमता शासन दरबारी जमा करावा लागतो. त्यानंतर योजनेच्या कामाचा आढावा घेऊन त्यात अर्धवट राहिलेली कामे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा शासनाकडे त्या विभागाचे सचिवांनी अशा कामांचा आढावा घेऊन संबंधित विभागाकडे मागणी केल्यानंतर निधी उपलब्ध करून दिला जातो. वेतनासाठी जो निधी उपलब्ध होतो त्यामध्ये जो निधी शिल्लक राहतो तोच निधी शासनाकडे परत केला जातो. त्यापैकीच आतापर्यंत २४ कोटी रूपये शिल्लक होते.असा आहे परत केलेला निधीजिल्हा परिषदेचे बांधकाम १० कोटी ८४ हजार, लघुसिंचन १ कोटी ७६, लाख ३६ हजार ६१९, पाणीपुरवठा ४६ लाख ८ हजार ३३९, पशुसंवर्धन २ लाख १४ हजार ५९३, शिक्षण १ कोटी ४६ लाख २२ हजार, आरोग्य २९ लाख ४५ हजार ६९९, पंचायत ४ कोटी ३४ लाख ९८ हजार २६०,कृषी, १० हजार ८००, महिला व बालकल्याण २ कोटी १३ लाख ३७ हजार ८५०, समाजकल्याण ५६ कोटी ५७ लाख ९८ हजार ४६२ या विभागाचा असलेला अखर्चित निधी ७७ कोटी रुपयांपर्यंत आहे.