शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

७४८ कोटींच्या पीककर्जाचे पुनर्गठन !

By admin | Updated: April 29, 2016 00:09 IST

खरीप हंगामात अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असणाऱ्या १ हजार ९६७ गावांमध्ये शेतीकर्जाच्या वसुलीस स्थगिती ...

३० एप्रिल 'डेडलाईन' : १ लाख ७ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

गजानन मोहोड अमरावतीखरीप हंगामात अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असणाऱ्या १ हजार ९६७ गावांमध्ये शेतीकर्जाच्या वसुलीस स्थगिती व सहकारी पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय २६ एप्रिल रोजी शासनाने घेतला. या निर्णयाचा जिल्ह्यामधील १ लाख ६ हजार ६९ शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून त्यांच्या ७४८ कोटी १६ हजाराच्या पीककर्जाचे व्याजासह मध्यम मुदतीकर्जात ५ वर्षांसाठी पुनर्गठन करण्यात येणार आहे. खरीप पीककर्जाच्या पुनर्गठनाची कार्यवाही सर्व बँकांना ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करुन यंदाच्या खरीप हंगामासाठी पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी आवश्यक ती कारवाई करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. खरीप पीककर्जाच्या परतफेडीचा ३१ मार्च हा कालावधी असल्याने जिल्ह्यातील पैसेवारी ५० पैशांच्या आत असणाऱ्या १९६७ गावांमधील जे शेतकरी विहित मुदतीत पीक कर्जाची परतफेड करू शकरणार नाहीत, अशा शेतकऱ्यांची संमती घेऊन सन २०१५-१६ च्या खरीप हंगामातील पीककर्जाचे व्याजासह मध्यम मुदतीकर्जात पुनर्गठन करण्याचे निर्देश आहेत. पाच वर्षांसाठी पुनर्गठनअमरावती : सन २०१६ मध्ये जिल्ह्यात १ लाख ७८ हजार ४७६ शेतकऱ्यांना १४२३५८.५२ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले होते. यामध्ये जिल्हा बँकेने ५६३२७ शेतकऱ्यांना ३८९७०.५२ लाखांचे कर्जवाटप केले होते. राष्ट्रीयीकृत बँकांनी ११८६८४ शेतकऱ्यांना १००३३६.०० लाखाचे व ग्रामीण बँकांनी २४०३ शेतकऱ्यांना २२६८.०० लाखाचे कर्जवाटप केले होते. यापैकी जिल्हा बँकेच्या ३४९२२ शेतकरी सभासदांनी २६५६१.२९ लाखांचा ३१ मार्च २०१६ अखेर कर्जाचा भरणा केला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या ३५६०५ शेतकऱ्यांनी ४००७५.०० लाखांचा व ग्रामीण बँकांच्या ३५९ शेतकरी सभासदांनी २६७.०२ लाखांच्या कर्जाचा भरणा केला आहे.३१ मार्च २०१६ अखेर पीककर्जाची शिल्लक बाकी असणाऱ्या जिल्हा बँकेच्या २१४०५ शेतकरी सभासदांचे १२४०९.२३ लाखाचे व राष्ट्रीयकृत बँकांच्या ८३०७९ शेतकऱ्यांना ६०२६१.०० लाख व ग्रामीण बँकेच्या ७०३ शेतकरी सभासदांच्या ५४१.९३ लाख व खासगी बँकांच्या १६८२ शेतकरी सभासदांच्या १५८८.०० कोटींच्या पीककर्जाचे शेतकऱ्यांच्या संमतीने ५ वर्षांसाठी पुनर्गठन करण्यात येणार आहे.राज्य शासनाने कर्जाचे पुनर्गठन करून शेतकरी हिताचा निर्णय घेतल्यामुळे सतत नापिकी, दुष्काळात सापडलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळण्याचे हे संकेत आहे. बँकाना हे आदेश लागू करण्यात आल्याने विंवचनेत असलेला शेतकरी काही अंशी संकटातून सावरणार आहे.यंदा २६२.६९ कोटींचे पीक कर्जवाटपचालू वर्षी जिल्ह्यात सन २०१६-१७ करीता जिल्हा बँकेला ६९६.७५ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकांना १४३६.९३ कोटी व ग्रामीण बँकांना १२ कोटी असा एकूण २१४५.६८ कोटींच्या पीक कर्जवाटपाचा लक्षांक देण्यात आला होता. २२ एप्रिल २०१६ अखेर जिल्हा बँकेने २७३४१ शेतकऱ्यांना २३२.५७ पीककर्जाचे वाटप केले आहे. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांनी ३४८० शेतकऱ्यांना ३०.१२ कोटी असे एकूण ३०८२१ शेतकऱ्यांना २६२.६९ कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.