शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

७४८ कोटींच्या पीककर्जाचे पुनर्गठन !

By admin | Updated: April 29, 2016 00:09 IST

खरीप हंगामात अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असणाऱ्या १ हजार ९६७ गावांमध्ये शेतीकर्जाच्या वसुलीस स्थगिती ...

३० एप्रिल 'डेडलाईन' : १ लाख ७ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

गजानन मोहोड अमरावतीखरीप हंगामात अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असणाऱ्या १ हजार ९६७ गावांमध्ये शेतीकर्जाच्या वसुलीस स्थगिती व सहकारी पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय २६ एप्रिल रोजी शासनाने घेतला. या निर्णयाचा जिल्ह्यामधील १ लाख ६ हजार ६९ शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून त्यांच्या ७४८ कोटी १६ हजाराच्या पीककर्जाचे व्याजासह मध्यम मुदतीकर्जात ५ वर्षांसाठी पुनर्गठन करण्यात येणार आहे. खरीप पीककर्जाच्या पुनर्गठनाची कार्यवाही सर्व बँकांना ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करुन यंदाच्या खरीप हंगामासाठी पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी आवश्यक ती कारवाई करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. खरीप पीककर्जाच्या परतफेडीचा ३१ मार्च हा कालावधी असल्याने जिल्ह्यातील पैसेवारी ५० पैशांच्या आत असणाऱ्या १९६७ गावांमधील जे शेतकरी विहित मुदतीत पीक कर्जाची परतफेड करू शकरणार नाहीत, अशा शेतकऱ्यांची संमती घेऊन सन २०१५-१६ च्या खरीप हंगामातील पीककर्जाचे व्याजासह मध्यम मुदतीकर्जात पुनर्गठन करण्याचे निर्देश आहेत. पाच वर्षांसाठी पुनर्गठनअमरावती : सन २०१६ मध्ये जिल्ह्यात १ लाख ७८ हजार ४७६ शेतकऱ्यांना १४२३५८.५२ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले होते. यामध्ये जिल्हा बँकेने ५६३२७ शेतकऱ्यांना ३८९७०.५२ लाखांचे कर्जवाटप केले होते. राष्ट्रीयीकृत बँकांनी ११८६८४ शेतकऱ्यांना १००३३६.०० लाखाचे व ग्रामीण बँकांनी २४०३ शेतकऱ्यांना २२६८.०० लाखाचे कर्जवाटप केले होते. यापैकी जिल्हा बँकेच्या ३४९२२ शेतकरी सभासदांनी २६५६१.२९ लाखांचा ३१ मार्च २०१६ अखेर कर्जाचा भरणा केला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या ३५६०५ शेतकऱ्यांनी ४००७५.०० लाखांचा व ग्रामीण बँकांच्या ३५९ शेतकरी सभासदांनी २६७.०२ लाखांच्या कर्जाचा भरणा केला आहे.३१ मार्च २०१६ अखेर पीककर्जाची शिल्लक बाकी असणाऱ्या जिल्हा बँकेच्या २१४०५ शेतकरी सभासदांचे १२४०९.२३ लाखाचे व राष्ट्रीयकृत बँकांच्या ८३०७९ शेतकऱ्यांना ६०२६१.०० लाख व ग्रामीण बँकेच्या ७०३ शेतकरी सभासदांच्या ५४१.९३ लाख व खासगी बँकांच्या १६८२ शेतकरी सभासदांच्या १५८८.०० कोटींच्या पीककर्जाचे शेतकऱ्यांच्या संमतीने ५ वर्षांसाठी पुनर्गठन करण्यात येणार आहे.राज्य शासनाने कर्जाचे पुनर्गठन करून शेतकरी हिताचा निर्णय घेतल्यामुळे सतत नापिकी, दुष्काळात सापडलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळण्याचे हे संकेत आहे. बँकाना हे आदेश लागू करण्यात आल्याने विंवचनेत असलेला शेतकरी काही अंशी संकटातून सावरणार आहे.यंदा २६२.६९ कोटींचे पीक कर्जवाटपचालू वर्षी जिल्ह्यात सन २०१६-१७ करीता जिल्हा बँकेला ६९६.७५ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकांना १४३६.९३ कोटी व ग्रामीण बँकांना १२ कोटी असा एकूण २१४५.६८ कोटींच्या पीक कर्जवाटपाचा लक्षांक देण्यात आला होता. २२ एप्रिल २०१६ अखेर जिल्हा बँकेने २७३४१ शेतकऱ्यांना २३२.५७ पीककर्जाचे वाटप केले आहे. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांनी ३४८० शेतकऱ्यांना ३०.१२ कोटी असे एकूण ३०८२१ शेतकऱ्यांना २६२.६९ कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.