शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

७४८ कोटींच्या पीककर्जाचे पुनर्गठन !

By admin | Updated: April 29, 2016 00:09 IST

खरीप हंगामात अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असणाऱ्या १ हजार ९६७ गावांमध्ये शेतीकर्जाच्या वसुलीस स्थगिती ...

३० एप्रिल 'डेडलाईन' : १ लाख ७ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

गजानन मोहोड अमरावतीखरीप हंगामात अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असणाऱ्या १ हजार ९६७ गावांमध्ये शेतीकर्जाच्या वसुलीस स्थगिती व सहकारी पीककर्जाचे पुनर्गठन करण्याचा निर्णय २६ एप्रिल रोजी शासनाने घेतला. या निर्णयाचा जिल्ह्यामधील १ लाख ६ हजार ६९ शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून त्यांच्या ७४८ कोटी १६ हजाराच्या पीककर्जाचे व्याजासह मध्यम मुदतीकर्जात ५ वर्षांसाठी पुनर्गठन करण्यात येणार आहे. खरीप पीककर्जाच्या पुनर्गठनाची कार्यवाही सर्व बँकांना ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करुन यंदाच्या खरीप हंगामासाठी पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी आवश्यक ती कारवाई करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. खरीप पीककर्जाच्या परतफेडीचा ३१ मार्च हा कालावधी असल्याने जिल्ह्यातील पैसेवारी ५० पैशांच्या आत असणाऱ्या १९६७ गावांमधील जे शेतकरी विहित मुदतीत पीक कर्जाची परतफेड करू शकरणार नाहीत, अशा शेतकऱ्यांची संमती घेऊन सन २०१५-१६ च्या खरीप हंगामातील पीककर्जाचे व्याजासह मध्यम मुदतीकर्जात पुनर्गठन करण्याचे निर्देश आहेत. पाच वर्षांसाठी पुनर्गठनअमरावती : सन २०१६ मध्ये जिल्ह्यात १ लाख ७८ हजार ४७६ शेतकऱ्यांना १४२३५८.५२ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले होते. यामध्ये जिल्हा बँकेने ५६३२७ शेतकऱ्यांना ३८९७०.५२ लाखांचे कर्जवाटप केले होते. राष्ट्रीयीकृत बँकांनी ११८६८४ शेतकऱ्यांना १००३३६.०० लाखाचे व ग्रामीण बँकांनी २४०३ शेतकऱ्यांना २२६८.०० लाखाचे कर्जवाटप केले होते. यापैकी जिल्हा बँकेच्या ३४९२२ शेतकरी सभासदांनी २६५६१.२९ लाखांचा ३१ मार्च २०१६ अखेर कर्जाचा भरणा केला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या ३५६०५ शेतकऱ्यांनी ४००७५.०० लाखांचा व ग्रामीण बँकांच्या ३५९ शेतकरी सभासदांनी २६७.०२ लाखांच्या कर्जाचा भरणा केला आहे.३१ मार्च २०१६ अखेर पीककर्जाची शिल्लक बाकी असणाऱ्या जिल्हा बँकेच्या २१४०५ शेतकरी सभासदांचे १२४०९.२३ लाखाचे व राष्ट्रीयकृत बँकांच्या ८३०७९ शेतकऱ्यांना ६०२६१.०० लाख व ग्रामीण बँकेच्या ७०३ शेतकरी सभासदांच्या ५४१.९३ लाख व खासगी बँकांच्या १६८२ शेतकरी सभासदांच्या १५८८.०० कोटींच्या पीककर्जाचे शेतकऱ्यांच्या संमतीने ५ वर्षांसाठी पुनर्गठन करण्यात येणार आहे.राज्य शासनाने कर्जाचे पुनर्गठन करून शेतकरी हिताचा निर्णय घेतल्यामुळे सतत नापिकी, दुष्काळात सापडलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळण्याचे हे संकेत आहे. बँकाना हे आदेश लागू करण्यात आल्याने विंवचनेत असलेला शेतकरी काही अंशी संकटातून सावरणार आहे.यंदा २६२.६९ कोटींचे पीक कर्जवाटपचालू वर्षी जिल्ह्यात सन २०१६-१७ करीता जिल्हा बँकेला ६९६.७५ कोटी, राष्ट्रीयीकृत बँकांना १४३६.९३ कोटी व ग्रामीण बँकांना १२ कोटी असा एकूण २१४५.६८ कोटींच्या पीक कर्जवाटपाचा लक्षांक देण्यात आला होता. २२ एप्रिल २०१६ अखेर जिल्हा बँकेने २७३४१ शेतकऱ्यांना २३२.५७ पीककर्जाचे वाटप केले आहे. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांनी ३४८० शेतकऱ्यांना ३०.१२ कोटी असे एकूण ३०८२१ शेतकऱ्यांना २६२.६९ कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.