शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

वांझोटे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी! कृषी विभागाकडे ७२ तक्रारी

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: July 23, 2023 15:49 IST

बियाणे कंपनीने भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

अमरावती : काही कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्याचे लॉट खराब असल्याने पेरणीपश्चात उगवण न झाल्याच्या ७२ तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत. या बोगस बियाण्यांमूळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे बियाणे कंपनीने भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

सद्यस्थितीत समितीद्वारा या तक्रारीची पाहणी करण्यात येत आहे व त्यानंतर बियाणे सदोष असल्यास कंपनीला बियाणे बदल करावा लागेल किंवा परतावा द्यावा लागणार आहे. यंदाच्या खरिपात सद्यस्थितीत अडीच लाख हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी झालेली आहे. यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करुन घरगुती बियाणे पेरणीसाठी वापरले. त्यामध्ये उगवण झालेली आहे. मात्र, काही कंपनीचे बियाणे पेरले असतांना उगवण झालेली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

यावेळी खरिपाचा हंगामच पावसाअभावी महिनाभर उशिरा सुरु झाला. त्यामुळे पेरणीला पहिलेच उशीर झालेला असतांना आता बियाण्यांची उगवण नसल्याने दुबार पेरणीचा व त्यासाठी पुन्हा खर्च करण्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे या बियाणे कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. 

टॅग्स :Amravatiअमरावती