शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
4
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
5
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
6
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
7
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
8
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
9
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
11
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
13
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
14
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
15
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
16
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
17
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
18
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
19
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
20
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!

तीन महिन्यांत ७१ कोटींचे उद्दिष्ट

By admin | Updated: December 25, 2014 23:24 IST

महसूल विभागामार्फत राज्य शासनाच्या तिजोरीत सर्वाधिक भर ही महसुली उत्पन्नातून पडते. जिल्हा महसूल विभागाने मागील वर्षी ५८.७६ कोटी रूपयांचा महसूल गोळा केला होता.

संथगतीने प्रक्रिया : मागील वर्षीपेक्षा टक्का घसरलाअमरावती : महसूल विभागामार्फत राज्य शासनाच्या तिजोरीत सर्वाधिक भर ही महसुली उत्पन्नातून पडते. जिल्हा महसूल विभागाने मागील वर्षी ५८.७६ कोटी रूपयांचा महसूल गोळा केला होता. मात्र यंदा सुरूवातीला आठ महिन्यांत केवळ १५ कोटी ३४ लाख रुपयांची (१७.८४ टक्के) वसुली होऊ शकली. येत्या तीन महिन्यांत उद्दिष्टपूर्तीसाठी सुमारे ७१ कोटी रूपये वसुलीचे आवाहन जिल्हा प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.महसूल विभागातील राजस्व, खनिज उत्खनन व मनोरंजन आदी तीन विभागांमार्फत महसूल उत्पन्न सर्वाधिक मिळते. यामध्ये अकृषक जमीन, नझूल जमीन, पंचायत समिती, नगरपालिका व महानगरपालिका उपकर दुसऱ्या विभागात खनिज उत्खनन आणि तिसऱ्या विभागात मनोरंजन कराचा समावेश आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील १४ तालुक्यांतून एकूण ५८ कोटी ७६ लाख २९ हजार रूपये वसुली झाली आहे. आता आर्थिक वर्ष संपण्याच्या अखेरच्या तीन महिन्यांत महसूल विभागाकडे ८६ कोटीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी महसूल विभागाला सर्व तालुक्यातून ७१ कोटींची वसुली करावी लागणार आहे. त्यामुळे महसूल विभागात विविध कामांचा ताण लक्षात घेता महसूल वसुलीवर अधिक भर द्यावा लागणार आहे. महसूल वसुलीसोबतच कायदा, सुव्यवस्था राखणे, मंत्री व अन्य व्हीव्हीआयपींच्या दौऱ्याची जबाबदारी, याशिवाय पूर दुष्काळाचे सर्वेक्षण करून त्याची माहिती देणे आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडून प्रशासकीय कामे पूर्ण करावे लागते. जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात नोव्हेंबर अखेरीस १५ कोटी ३४ लाख २९ हजार रूपयांची महसूल वसुली झाली होती. यंदा मात्र महसूल वसुलीसाठी ८६ कोटींचे उद्दिष्ट आहे. तर मागील वर्षी ६५ कोटींच्या उद्दिष्टांपैकी ५८ कोटी ७६ लाख एवढा महसूल गोळा करण्यात महसूल विभागाला यश आले होते. (प्रतिनिधी)