शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

७०० कोटीच्या घोटाळ्याचे आरोप बिनबुडाचे ( सुधारित बातमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:13 IST

अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप काही दिवसांपासून विरोधकांकडून होत आहे. ते तथ्यहीन असून, ...

अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप काही दिवसांपासून विरोधकांकडून होत आहे. ते तथ्यहीन असून, आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून विरोधकांनी माजी संचालकांना बदनाम करण्याचा प्रयत्न याद्वारे चालविल्याचा आरोप बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख व माजी आमदार वींरेंद्र जगताप यांनी केला आहे.

उलट गत १० वर्षात कधी नव्हे एवढा नफा बॅकेला आमच्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात झाला आहे.ज्या ७०० कोटी संदर्भात आरोपकेले जात आहे.ते सर्व पैसे बॅकेकडे सुरक्षित असून या ७०० कोटीवर २७३ कोटी ८६ लाख रूपयाचे व्याज बॅकेकडे जमा झाले आहे.माजी संचालक मंडळाने गुंतवणूकी संदर्भात धोरण ठरविले होते.त्यानुसार अधिकाऱ्यांनी ७०० कोटीची गुंतवणूक केली होती.त्या गुंतवणूकीवर ऑडिट देखील करण्यात आले.परंतु ऑडिटमध्ये कुठल्याही प्रकारचे ऑब्जेशन नाही.तसेच नाबार्डचे देखील याबाबत ऑब्जेशन नाही.काही विरोधकांनी नाहकच संचालक मंडळासह बॅकेची दखेली बदनामी करण्याचा प्रयत्न चालविल्याने अशा लोकांविरूध्द आम्ही कायदेशीर कारवाई करू असा इशारा माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिला आहे.एकेकाळी डबघाईच्या वाटेवर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बॅकेवर गत १० वर्षापूर्वी सहकार पॅनेलच्या नेतु्त्वात बॅकेचा कारभार आमच्या संचालक मंडळाने हाती घेतला.शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत बॅकेमधील ठेवी २२०० कोटी पर्यत नेवून पोहविल्यात,शुभमंगल योजना,गृह योजना, सोने तारण कर्ज योजना,तसेच पगारी कर्मचाऱ्याना गृह कर्ज,वाहन कर्ज,वैयक्तीक कर्ज,शिक्षकांकरीता ओव्हर ड्रॉफ्ट वाहन कर्ज आदी सुविधा देत शेतकऱ्यासह बॅकेची देखील आर्थिक दुष्ट्या प्रगती केलेली आहे.हे दरवर्षी होणाऱ्या ऑडिटमध्ये आलेच आहे.त्यामुळे आज विदर्भात अमरावतीची सहकारी बॅकेचे नाव लौकीक आहे. बॅकेचा संपूर्ण व्यवहार संगणकीकृत झालेला आहे.या शिवाय आमच्या संचालक मंडळाने एटीएम सुविधा,आदिवासी भागासाठी मोबाईल व्हॅनची सुविधा असे कित्येक महत्वाचे निर्णय घेतले आहे.७०० कोटीचा घोटाळा झाल्याचा जो आरोप विरोधक करीत आहेत.तो पूर्णत: तथ्यहीन आहे.आमच्या कार्यकाळात बॅकेने सन २०१७ ते २०२१ या तिन वर्षात निप्पॉन म्युनिअल फंडात आरबीआयच्या नियमाप्रमाणे ७०० कोटीची गुंतवणूक केली होती.या गुंतवणूकी पोटी बॅकेला २७३ कोटी ८६ लाख रूपयाचा फायदा बॅकेला झालेला आहे.व त्याचे ऑडिट देखील झाले आहे.ऑडिट मध्ये कुठल्याही प्रकारचा आक्षेप नोंदविला नाही.असे असतांना विरोधकांकडून होत असलेले आरोप बिनबुडाचे असून आगामी निवडणूका लक्षात घेता विरोधकांचे हे षडयंत्र असून या मागे राजकीय किनार असल्याचे जगताप म्हणालेत. दरम्यान बॅकेच्या बदनामी केल्याबाबत प्रशासकांचे वतीने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.तर आम्हाला देखील बदनाम करणाऱ्या विरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करणार असल्याचे बबलू देशमुख यांनी सांगितले.यावेळी पत्रपरिषदेला प्रकाश काळबांडे,दयाराम काळे,अनंत साबळे, संजय वानखडे, रवींद्र गायगोले, प्रविण काशिकर,सुभाष पावडे,प्रदिप निमकर,बाळासाहेब अलोणे ,नितीन हिवसे आदी उपस्थित होते.