शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

शहरात 10 महिन्यात 6,444 जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 05:00 IST

तीन वर्षाचा आढावा घेता, सन २०१८ मध्ये ४ हजार ९३३, सन २०१९ मध्ये ५ हजार २५२ नागरिकांचा मृत्यू झाला. यंदाच्या १० महिन्यांतच ही दोन्ही संख्या पार करीत ६ हजार ४४४ नागरिकांचा मृत्यू झालेला आहे.  यंदा एप्रिल महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे. यामध्ये जिल्ह्याच्या तुलनेत महापालिका क्षेत्रात आतापर्यंत १२ हजार कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे.

ठळक मुद्दे दररोज सरासरी २२ मृत्यूची नोंद, तीन वर्षातील सर्वाधिक आकडा

  गजानन मोहोड    लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आठ लाख लोकसंख्येच्या शहरात यावर्षी १० महिन्यांत तब्बल ६ हजार ४४४ नागरिकांचा मृत्यू झाल्याची बाब धक्कदायक आहे. या काळात शहरात दररोज सरासरी २२ मृत्यूची नोंद झाल्याची महापालिकेची आकडेवारी आहे. कोरोना संसर्गामुळे यंदा २५१ मृत्यूची भर पडल्याचे वास्तव यामध्ये समोर आले आहे. तीन वर्षाचा आढावा घेता, सन २०१८ मध्ये ४ हजार ९३३, सन २०१९ मध्ये ५ हजार २५२ नागरिकांचा मृत्यू झाला. यंदाच्या १० महिन्यांतच ही दोन्ही संख्या पार करीत ६ हजार ४४४ नागरिकांचा मृत्यू झालेला आहे.  यंदा एप्रिल महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे. यामध्ये जिल्ह्याच्या तुलनेत महापालिका क्षेत्रात आतापर्यंत १२ हजार कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. एकूण संक्रमितांच्या तुलनेत २.१० टक्के रुग्णांचा मृत्यू उपचारादरम्यान झाल्याने यंदा मृतांचा आकडा वाढल्याचे वास्तव आहे.

यंदा सर्वाधिक मृत्यू सप्टेंबर महिन्यातयंदा ऑक्टोबर महिन्यापर्यंत ६ हजार ४४४ नागरिकांचा मृत्यू झाला. सर्वाधिक ९२० मृत्यू सप्टेंबर महिन्यात झाले. या महिन्यात दररोज ३१ व्यक्ती दगावले. यामध्ये कोरोना संसर्गासह विविध आजार व नैसर्गिक मृत्यूमुळेही  या महिन्यात मृत्युदर वाढला असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. ऑक्टोबर महिन्यात ८७६ मृत्यू झाले आहेत.

काेराेना व इतर उपचार न मिळाल्याने वाढदोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी मृत्युसंख्या थोड्या प्रमाणात वाढली आहे. केवळ कोरोनाच नव्हे, तर अन्य कारणेदेखील मृत्यूसाठी कारणीभूत आहेत. या विविध कारणांचा आम्ही शोध घेत आहोत. - डॉ. विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या