शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

पश्चिम विदर्भातील ४९९ प्रकल्पांत ६३.६८ टक्के पाणीसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 16:27 IST

आठवड्याभरापूर्वी पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक प्रकल्पांच्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देयवतमाळ, अमरावती जिल्ह्याची स्थिती चांगलीबुलडाणा तहानलेलेच

संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पश्चिम विदर्भातील ४९९ प्रकल्पांत ६३.६८ टक्के सरासरी पाणीसाठा शिल्लक आहेत. यामध्ये नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. मात्र, बुलडाणा जिल्ह्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने या जिल्ह्यातील अनेक प्रकल्प हे तहानलेलेच असल्याने उन्हळ्यात या जिल्ह्यात पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. त्या कारणाने प्रशासनाचे व नागरिकांची चिंता वाढली आहे.आठवड्याभरापूर्वी पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक प्रकल्पांच्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.पाचही जिल्ह्यांतील नऊ मोठ्या प्रकल्पामध्ये सरासरी ६०.३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पांची स्थिती थोडी चांगली असून, २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ७१.१७ टक्के पाणीसाठा आहे. ४६६ लघू प्रकल्पांमध्ये सरासरी ६३.७३ टक्के पाणीसाठा आहे. यामध्ये सर्व प्रकल्पांची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा ३२८३.६३ दलघमी आहे, तर आजचा उपयुक्त पाणीसाठा हा २०९०.८८ दलघमी शिल्लक आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, व वाशिम जिल्ह्याच्या अनेक मध्यप प्रकल्पांची स्थिती चांगली असून, काही प्रकल्प हे शंभर टक्के भरले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्प मात्र ४० टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले नाहीत. त्या कारणाने चिंता वाढली आहे. पाचही जिल्ह्यांतील मोठ्या प्रकल्पांची स्थितीमोठ्या प्रकल्पातून त्या-त्या जिल्ह्यातील शहराला व परिसरातील गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. यामध्ये अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारे अप्पर वर्धा धरण यावेळीस पुरेसे भरले नाही. मध्य प्रदेश व काटोल परिसरात पाऊस हवा होता. तेथील नद्यांना पूर न आल्याने धरणात फक्त आजपर्यंत ५२.१० टक्के पाणीसाठा आहे. गेल्या आठवड्यात यामध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे.यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्प १०० टक्के, अरुणावती ९५.५० टक्के, बेंबळा ६०.७७ टक्के भरले आहेत, तर अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ९४.२७ टक्के, वान ९६.४४ टक्के भरले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती अतिशय नाजूक असून, नळगंगा प्रकल्पात १८.१० टक्के, तर पेनटाकळी प्रकल्पात १९.३८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई