शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
3
“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले
4
सावधान! फक्त एक फोन कॉल अन् गमावले तब्बल ३२ कोटी; महिलेसोबत नेमकं काय घडलं?
5
लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत
6
"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा
7
Eye Infections: मुंबईत वाढताहेत संसर्गाचे रुग्ण; डोळ्यांत डोळे घालाल तर पस्तावाल, 'अशी' घ्या काळजी!
8
१,२,३,४... बाप रे बाप...! एका ऑटोरिक्‍शातून बाहेर पडली तब्बल 22 मुलं! व्हिडिओ बघून धक्का बसेल
9
९४% रिटर्न दिल्यावर 'ग्रोव'ला १०% लोअर सर्किट! गुंतवणूकदारांनी शेअर विकायला का लावली रांग?
10
प्रशासकीय दिरंगाईमुळे बोनस रखडला; संतप्त कामगारांचे नायर रुग्णालयासमोर 'बोंबाबोंब' आंदोलन
11
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
12
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
“आता ‘प्रो बैलगाडा लीग’ लवकरच, महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा...”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
14
सरकारच्या 'या' स्कीममध्ये मिळवा विना गॅरेंटी व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन; केवळ एका डॉक्युमेंटची लागेल गरज
15
मुलांच्या भवितव्याशी खेळ! Noge, Eare, Iey... चुकीचं इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाचा Video व्हायरल
16
आरक्षण मर्यादेचं उल्लंघन, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी, सुप्रिम कोर्टात आज काय घडलं
17
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
18
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
19
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
20
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील ४९९ प्रकल्पांत ६३.६८ टक्के पाणीसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 16:27 IST

आठवड्याभरापूर्वी पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक प्रकल्पांच्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देयवतमाळ, अमरावती जिल्ह्याची स्थिती चांगलीबुलडाणा तहानलेलेच

संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पश्चिम विदर्भातील ४९९ प्रकल्पांत ६३.६८ टक्के सरासरी पाणीसाठा शिल्लक आहेत. यामध्ये नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. मात्र, बुलडाणा जिल्ह्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने या जिल्ह्यातील अनेक प्रकल्प हे तहानलेलेच असल्याने उन्हळ्यात या जिल्ह्यात पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. त्या कारणाने प्रशासनाचे व नागरिकांची चिंता वाढली आहे.आठवड्याभरापूर्वी पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने अनेक प्रकल्पांच्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.पाचही जिल्ह्यांतील नऊ मोठ्या प्रकल्पामध्ये सरासरी ६०.३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पांची स्थिती थोडी चांगली असून, २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ७१.१७ टक्के पाणीसाठा आहे. ४६६ लघू प्रकल्पांमध्ये सरासरी ६३.७३ टक्के पाणीसाठा आहे. यामध्ये सर्व प्रकल्पांची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा ३२८३.६३ दलघमी आहे, तर आजचा उपयुक्त पाणीसाठा हा २०९०.८८ दलघमी शिल्लक आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, व वाशिम जिल्ह्याच्या अनेक मध्यप प्रकल्पांची स्थिती चांगली असून, काही प्रकल्प हे शंभर टक्के भरले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्प मात्र ४० टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले नाहीत. त्या कारणाने चिंता वाढली आहे. पाचही जिल्ह्यांतील मोठ्या प्रकल्पांची स्थितीमोठ्या प्रकल्पातून त्या-त्या जिल्ह्यातील शहराला व परिसरातील गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. यामध्ये अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारे अप्पर वर्धा धरण यावेळीस पुरेसे भरले नाही. मध्य प्रदेश व काटोल परिसरात पाऊस हवा होता. तेथील नद्यांना पूर न आल्याने धरणात फक्त आजपर्यंत ५२.१० टक्के पाणीसाठा आहे. गेल्या आठवड्यात यामध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे.यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्प १०० टक्के, अरुणावती ९५.५० टक्के, बेंबळा ६०.७७ टक्के भरले आहेत, तर अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ९४.२७ टक्के, वान ९६.४४ टक्के भरले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती अतिशय नाजूक असून, नळगंगा प्रकल्पात १८.१० टक्के, तर पेनटाकळी प्रकल्पात १९.३८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई