शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जिल्ह्यात ६२ टक्के रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 05:01 IST

शहरात हैदरपुऱ्यातील चार संक्रमितांना १८ व्या दिवशी, तर त्याच कुटुंबातील एका महिलेला विसाव्या दिवशी कोरोनामुक्त करण्यात आले. त्यानंतर या कुटुंबातील एक महिला व दुसºयाच दिवशी एक तरुण कोरोनामुक्त झाला. या सर्वांचे १५ दिवसांच्या उपचारानंतरचे सलग दोन थ्रोट स्वॅब निगेटिव्ह आल्याची खातरजमा जिल्हा शल्यचिकित्सकांनी केल्यानंतर या रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात आले.

ठळक मुद्देआतापर्यंत ६२ रुग्णांना डिस्चार्ज। उपचारानंतर बरे की नव्या गाईड लाईनचा दिलासा?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात शहरासह ग्रामीणमध्ये कोरोनाचे १०१ रुग्ण निष्पन्न झाले. महिनाभरात ६२ रुग्ण कोरोनामुक्तही झाले. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ६२ टक्के असल्याची बाब दिलासा देणारी आहे. चार दिवसांच्या अवधीत ४१ जण कोरोना संक्रमणातून मुक्त झाले. त्यांना घरी क्वारंटाइन करण्यात आले. त्यामुळे हे रुग्ण उपचारानंतर बरे झाले की त्यांना आरोग्य विभागाच्या नव्या गाइड लाइननुसार मुक्त केले जात आहे, याविषयी मात्र नागरिकांमध्ये चर्चा झडत आहेत.शहरात हैदरपुऱ्यातील चार संक्रमितांना १८ व्या दिवशी, तर त्याच कुटुंबातील एका महिलेला विसाव्या दिवशी कोरोनामुक्त करण्यात आले. त्यानंतर या कुटुंबातील एक महिला व दुसºयाच दिवशी एक तरुण कोरोनामुक्त झाला. या सर्वांचे १५ दिवसांच्या उपचारानंतरचे सलग दोन थ्रोट स्वॅब निगेटिव्ह आल्याची खातरजमा जिल्हा शल्यचिकित्सकांनी केल्यानंतर या रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात आले. त्यानंतर ९ मे रोजी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठीच्या नव्या ‘गाइड लाइन’ जारी झाल्या आणि जिल्ह्यात चार दिवसांत ४१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना घरी सोडण्यात आले व तेथेच त्यांना सात दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले. याविषयीचे हमीपत्र त्यांच्याकडून लिहून घेण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले.कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेले आणखी काही रुग्ण नव्या गाइड लाइननुसार कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या माहितीनुसार, या रुग्णांना आता पाच दिवसांचा औषधांचा कोर्स व त्यानंतर पाच दिवस निरीक्षणात ठेवून कोणतीही लक्षणे न आढळल्यास त्यांना कोरोनामुक्त करण्यात येणार आहे. यामध्ये अतिजोखीम व आयसीयूमधील रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात येणार नाही. जिल्ह्यात एकूण संक्रमित १०१ रुग्णांच्या तुलनेत आतापर्यंत ६२ रुग्ण कोरोनामुक्त झालेत. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ६१.३८ टक्के आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अमरावती जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्य विभागाची नवी मार्गदर्शक तत्त्वे चर्चेत आलेली आहेत. रोज संक्रमितांची संख्या वाढती असताना, त्याप्रमाणात १० दिवसांत सौम्य व अतिसौम्य लक्षणांचे रुग्ण उपचारानंतर बरे होत असल्याने जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाची चिंता मिटू लागली आहे. त्याचवेळी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया दखलनीय ठरतात.संक्रमितांचा मृत्युदर १३ टक्क््यांवरजिल्ह्यात पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण ३ एप्रिल रोजी हाथीपुºयात निष्पन्न झाला. त्यांचा अहवाल मृत्यूपश्चात पॉझिटिव्ह आला. त्यानंतर येथील क्लस्टर झोनमध्ये पाच अशा सहा रुग्णांच्या होमडेथ झाल्यानंतर थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. उपचारादरम्यान कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाल्याने ही संख्या १३ वर पोहोचली. जिल्ह्यात निष्पन्न झालेल्या १०१ कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण १२.८७ टक्के आहे. सुरुवातीला हे प्रमाण विदर्भात सर्वात जास्त होते. मात्र, आरोग्य यंत्रणाद्वारे मृताचे थ्रोट स्वॅब घेणे बंद करून मृताच्या कुटुंबातील सदस्यांचे नमुने घेणे सुरू केल्यामुळे हे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत निष्पन्न रुग्णसंख्येच्या तुलनेत २५.७४ टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत.नव्या गाइड लाइन आयसीएमआरच्या नियमाधारित आहेत. आरोग्य यंत्रणेवर ताण आपल्याकडे कमी आहे. मात्र, मुंबई, पुणे आदी शहरांत तो वाढत आहे. सिस्टीम कधी ब्रेक होईल, सांगता येत नाही. या सिस्टीममध्ये एकवाक्यता पाहिजे. यासाठी शास्त्रीय कारण आहे व प्रोटोकॉलप्रमाणे प्रमाणित आहेत.- डॉ. अनिल रोहनकरअध्यक्ष, आयएमए, अमरावतीआरोग्य विभागाच्या नव्या गाइड लाइननुसार सौम्य लक्षणे असणाºया रुग्णांना १० दिवस, लक्षणे नाहीत अशा रुग्णांना पाच दिवस उपचार व पाच दिवस निरीक्षणात ठेवण्यात येते. त्यानंतर लक्षणे नसल्यास डिस्चार्ज दिला जातो. लेखी हमीपत्रावर ७ ते १४ दिवस गृह विलगीकरणात ठेवले जाते. आयसीयू रुग्णांना डिस्चार्ज देत नाही.- डॉ श्यामसुंदर निकमजिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या