शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

देशातील ५८५ बाजार समित्या ‘ई-नाम’ला जोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 11:10 IST

राज्यातील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी इतर राज्यातील बाजार समित्यांचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी देशभरातील ५८५ बाजार समित्या २०१८ अखेरपर्यंत ई-नाम (इलेक्ट्रॉनिक्स नॅशनल अ‍ॅग्रिकल्चर मार्केट) ला जोडण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देआॅनलाईन व्यवहारराज्यातील ४५ बाजार समित्यांचा समावेश

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यातील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी इतर राज्यातील बाजार समित्यांचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी देशभरातील ५८५ बाजार समित्या २०१८ अखेरपर्यंत ई-नाम (इलेक्ट्रॉनिक्स नॅशनल अ‍ॅग्रिकल्चर मार्केट) ला जोडण्यात येणार आहेत. या पोर्टलमध्ये राज्यातील ४५ बाजार समित्यांचा समावेश करण्यात आला असून १५ बाजार समित्यांमध्ये उपलब्ध संगणकाद्वारे गेट एन्ट्रीची प्रक्रिया सुरू आहे.केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाने राष्ट्रीय कृषी बाजार (नाम) कार्यान्वित केला आहे. त्याचे कामकाज ई-ट्रेंडिंग प्लॅटफार्मद्वारे सुरू आहे. देशात नामची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या लघु शेतकरी कृषी व्यवसाय (स्फाक) द्वारा होत आहे. या योजनेचे कामकाज तीन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात बाजार समिती स्तरावरील कामकाज, दुसऱ्या टप्प्यात एका बाजार समितीमधील शेतमाल राज्यातीलच इतर बाजार समितीतील खरेदीदार ई-नाम (ई-आॅक्शन) द्वारा खरेदी करू शकतील. तिसऱ्या टप्प्यात एका राज्यातील बाजार समितीमधील शेतमाल अन्य राज्यातील खरेदीदार खरेदी करू शकणार आहेत. राज्यात पहिल्या टप्प्यात वर्धा, दौंड, वरोरा, नागपूर, अहमदनगर, नंदुरबार, कोल्हापूर, मलकापूर, वणी, परभणी, लोणंद, अकोला, लातूर, औरंगाबाद, तुमसर, शिरूर, नेवासा, येवला, अर्जुनी मोरगाव, सेलू, अचलपूर, वसमत, मालेगाव, गेवराई, आटपाडी, सांगली, भोकर, अहेरी, बार्शी व धुळे बाजार समित्यांमध्ये हा प्रकल्प सुरू आहे.शेतमालाची गुणवत्ता तपासणीसाठी पहिल्या टप्प्यातील बाजार समित्यांमध्ये गुणवत्ता लॅबची उभारणी करण्यात आलेली आहे, तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ई-पेमेंट प्रणालीद्वारे सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. सर्व बाजार समित्यांमध्ये ई-नाम कार्यप्रणालीनुसार कामकाज सुरू झालेले आहे.

१४ राज्यांतील ४७० बाजार समित्यांची मान्यतासद्यस्थितीत १४ राज्ये व केंद्र शासित प्रदेशांतील ४७० बाजार समित्यांच्या ई-नामसाठी एकत्र येण्याच्या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता दिलेली आहे. यामध्ये हिमाचल प्रदेशातील १९, हरियाणा ५४, राजस्थान २५, गुजरात ४०, महाराष्ट्र ४५, मध्य प्रदेश ५८, छत्तीसगढ १४, आंध्र २२, तेलंगणा ४४, झारखंड १९, ओरीसा १०, तामिळनाडू १५, उत्तराखंड ५ व उत्तर प्रदेशातील १०० बाजार समित्यांचा समावेश आहे. २४ प्रकारच्या शेतमालांचा पारदर्शी स्वरूपात व्यापार यापूर्वीच सुरू झालेला आहे. सद्यस्थितीत १४ राज्यांमध्ये ९० प्रकारच्या शेतमालांचे ई-आॅक्शन होत आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान