शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

पश्चिम विदर्भात आपत्तीमुळे ५५ व्यक्तींचा मृत्यू; ३७७ जनावरे मृत

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: September 10, 2024 18:37 IST

Amravati : अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भातील ७६७ गावे अन् २०३३ कुटुंबे बाधित

अमरावती : पश्चिम विदर्भातील सर्व तालुक्यांनी पावसाची सरासरी पार केलेली आहे. सततचा पाऊस, अतिवृष्टी या आपत्तीमुळे  ५५ नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. शिवाय लहान-मोठी ३७७ जनावरे मृत झालेली आहेत. ४३०८ घरांची पडझड झालेली आहे. विभागात ३७ तालुक्यांतील ३७ तालुके ७७० गावांना या आपत्तीचा फटका बसला. यामुळे २०३३ कुटुंबे बाधित झाल्याचा विभागीय आयुक्तांचा अहवाल आहे.

अमरावती विभागात १ जून ते १० सप्टेंबर या कालावधीत ६६२.५ मिली पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ७९१ मिमी पावसाची नोंद झाली. ही ११९.४ टक्के सरासरी आहे. गतवर्षी याच तारखेला ८६.२ टक्के पाऊस झाला होता. सततचा पाऊस, अतिवृष्टी यामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुरात ३९ व्यक्ती वाहून गेल्या आहेत. तर वीज कोसळून १० जणांचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय अंगावर भिंत कोसळल्याने ३ व इतर कारणांनी ३ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. यामधील ३४ प्रकरणांत आतापर्यंत १.३६ कोटींचे सानुग्रह अनुदान देण्यात आलेले आहे.

आपत्तीमुळे मोठी दुधाळ ८८, लहान दुधाळ २२४, ओढकाम करणारी ५५ व ओढकाम करणारी लहान १० असे एकूण ३७७ जनावरांचा मृत्यू झालेला आहे. याबाबत पशुपालकांना सानुग्रह अनुदान देण्यात आलेले आहे. 

४३०८ घरांची पडझडया आपत्तीमध्ये ६३ घरांची पूर्णत: पडझड झालेली आहे, तर ७८० घरांची अंशत: पडझड झाली. शिवाय ३४६० कच्च्या घरांची पडझड झालेली आहे. यामध्ये ५ झोपड्या, तर १३७ गोठे नष्ट झाले आहेत. याबाबत स्थानिक प्रशासनाद्वारा सर्व्हे करण्यात येत असून, पात्र प्रकरणात महसूल विभागाद्वारा सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पिकांचे सर्वाधिक नुकसान

  • अतिवृष्टीमुळे विभागात २,५२,८३९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले, तर नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे १४७९ हेक्टरमधील पिके खरडली गेली, तर पुरामुळे १६३ हेक्टरमध्ये गाळ साचल्याने पिकांचे नुकसान झालेले आहे.
  • अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यात १,७५,६२७ हेक्टर, अमरावती ५,८११ हेक्टर, अकोला ५१,०५६, वाशिम १०,४१२ हेक्टर व बुलडाणा जिल्ह्यात ९,९३३ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.
टॅग्स :floodपूरVidarbhaविदर्भAmravatiअमरावती