शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

५२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील ५२४ ग्रामपंचायतींच्या एप्रिल ते जून दरम्यान मुदत संपली आहे. सदर ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया मार्च महिन्यात सुरू झाली होती. यासाठी १६ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज व छाननीची प्रक्रियादेखील पूर्ण झाली होती. परंतु, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. आयोगाने कोरोनाबाबतच्या सद्यस्थितीसंदर्भात ग्रामपंचायतनिहाय माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून मागविली होती.

ठळक मुद्देपडघम : २९ ग्रामपंचायतींमध्ये प्रभागरचना अंतिम करण्याची कार्यवाही

जितेंद्र दखनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील एप्रिल ते जूनदरम्यान मुदत संपलेल्या ५२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नोव्हेंबर अथवा डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवाय माहे जुलै ते डिसेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया निवडणूक विभागाने सुरू केली आहे.जिल्ह्यातील ५२४ ग्रामपंचायतींच्या एप्रिल ते जून दरम्यान मुदत संपली आहे. सदर ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया मार्च महिन्यात सुरू झाली होती. यासाठी १६ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज व छाननीची प्रक्रियादेखील पूर्ण झाली होती. परंतु, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. आयोगाने कोरोनाबाबतच्या सद्यस्थितीसंदर्भात ग्रामपंचायतनिहाय माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून मागविली होती. सदर माहितीचा अहवाल जिल्हा निवडणूक शाखेने आयोगाकडे सादर केला. त्यामुळे येत्या नोव्हेंबर महिन्यात दिवाळीनंतर ५२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्यता निवडणूक विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.याशिवाय जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या २९ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींसाठी प्रभागरचना आणि आरक्षण निश्चितीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. यानुसार उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावर प्रभागरचना आणि त्यातील प्रभागाच्या आरक्षणाची प्रक्रिया २७ ऑक्टोबरपूर्वी अंतिम केली जाईल. त्यानंतर तो अहवाल त्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार असून, पडताळणीअंती ते त्याच दिवशी त्यावर स्वाक्षरी करतील. पुढे २ नोव्हेंबर रोजी हा अहवाल म्हणजेच निवडणूक असलेल्या प्रभागांची रचना व आरक्षणांची स्थिती घोषित केली जाईल.जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या अहवालानुसार नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ७, चिखलदरा ६, अचलपूर ४, धारणी ३, दर्यापूर, भातकुली, धामणगाव रेल्वे, तिवसा तालुक्यांतील प्रत्येकी २, तर चांदूर रेल्वे तालुक्यातील १ याप्रमाणे २९ ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुका दिवाळीनंतर होण्याचे संकेत सूत्रांकडून प्राप्त होत आहेत.या ग्रामपंचायतींत प्रभागरचना सुरूजिल्ह्यातील जुलै ते डिसेंबर दरम्यान मुदत संपणाऱ्या २९ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींसाठी प्रभागरचना आणि आरक्षण निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यातील वझ्झर, पांढरी, मल्हारा, म्हसोना, धारणीमधील रंगुबेली, हिराबंबई व चेंडो, चिखलदरा तालुक्यातील काकादरी, खटकाली, अढाव, माखला, खिरपाणी व आमझरी, धामणगाव रेल्वे तालुक्यातील उसळगव्हाण व नायगाव, चांदूररेल्वे तालुक्यातील येरंड, दर्यापूरच्या रामतीर्थ व रुस्तमपूर, नांदगावमधील जळू, कंझरा, बेलोरा, हिरापूर, वडुरा, फुलआमला, पळसमंडळ व शिरपूर, तिवस्यामधील मार्डी व दिवानखेड आणि भातकुलीमधील विर्शी, बोरखडी आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत