शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

५० गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 22:18 IST

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींकडे ९६ लाखांची वीज देयक थकीत असल्यामुळे या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. वीज महावितरण कंपनीने तीन ते चार दिवसांपासून हा धडाकाच सुरू केल्यामुळे अर्ध्या तालुक्यात अंधाराचे सावट पसरले आहे.

ठळक मुद्दे९६ लाखांची थकबाकी

शिवणी रसुलापूर : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींकडे ९६ लाखांची वीज देयक थकीत असल्यामुळे या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. वीज महावितरण कंपनीने तीन ते चार दिवसांपासून हा धडाकाच सुरू केल्यामुळे अर्ध्या तालुक्यात अंधाराचे सावट पसरले आहे.जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना पथदिव्यांच्या देयकाचा निधी दिल्या जातो. मिळालेल्या माहितीनुसार नांदगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींना मार्च २०१७ पर्यंत थकीत असलेले पथदिव्यांचे देयक जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाकडून देण्यात येते. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून थकीत असलेल्या ९६ लक्ष रूपयांच्या देयकांचा भरणा महावितरणद्वारा वारंवार सूचना देऊनही ग्रामपंचायतींनी केलेला नाही. जिल्हा परिषदेद्वारा दुर्लक्ष केल्यामुळेच सध्या तालुक्यातील ५० चेवर गावे अंधारात आहेत. ग्रामपंचायतींनी महावितरणच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच महावितरणद्वारा ही कारवाई करण्यात आली आहे. महावितरण, जिल्हा परिषद व स्थानिक ग्रामपंचायती यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचा फटका नागरिकांना बसला आहे.पाच वर्षांपासून ९६ लक्ष रूपये थकीत असल्याने वीजपुरवठा खंडित केला. जि.प. संबंधित विभागाकडून वीज देयके अदा करण्याबाबत पत्र मिळाल्यास वीजपुरवठा सुरळीत करू.- व्ही.एन. शिंदे, उपकार्यकारी अभियंता, महावितरणवीज बिल भरण्याबाबत जि.प. प्रशासन तसेच पंचायत समिती प्रशासनाला माहिती दिली. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन त्वरेने पाठपुरावा करीत आहोत.- विजय बिसने,सरपंच, शिवणी रसुलापूर